सहज उडण्याचा भ्रम
- डॉ. सुधीर रा. देवरे
- डॉ. सुधीर रा. देवरे
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
माझे खळाळणारे हसू
अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून
सुशांत जलाशयातल्या
शांत स्मितासारखे
तुझ्या ओठांशी येऊन थांबेल......
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......
तुझ्या एवढी होईन तेव्हा
शब्दांची झोळी बाहेर खुंटीला टांगेन
अर्थाच्यामागे धावणे थांबेल आणि,
उंच झाडांच्या गहन जंगलातून
निवांत चालत तुझ्या डोळ्यांच्या
वाटेशी थांबेन .......
नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही.
म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात
….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात.
मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात.
मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो.
जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो.
त्यांच्यातले हितगुज अत्तर होते.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.
मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात. पण आपल्याला जे दिसतं ते सारंच खरं नसतं, अश्याच राजेशाही चेहऱ्यांची करुण कहाणी म्हणजे मीना प्रभूंचं 'मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स' हे पुस्तक !
हळू हळू एकेक करत
हरवत चालले आहे...
ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो ताराच आकाशातून
नाहीसा झाला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं बघत बघत
आम्ही निश्चिंत झोपी जायचो...
नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी
खिडकीतून पहात राहतो
आणि मनातल्या मनात चरकतो
उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर!
आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
कुठेच दिसत नव्हते
ना ही कुठला पक्षी
या पृथ्वीवरून
हळूहळू एकेक गोष्टी
हरवत चालल्याचे दिसत आहे
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये