तुझ्या अंतरीची (चारोळी)
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....
भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....
चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....
मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!
(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद
कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही
© कर्रोफर नमुरा
कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे..
प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे..
कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे..
काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे..
कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे..
मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे..
कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे..
कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी..
चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी..
कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे..
तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे..
कधी वाटते तिच्यासाठी जगावे..
तिच्या कुशीतच अलगद मरावे..
कधी वाटते तिची बडबड ऐकावी..
तिची स्वराक्षरे कानी ठसावी..
कधी वाटते तिचा सोबती व्हावे..
चांदण्या रातीत तीला चंद्रापाशी न्यावे..
कधी वाटते तिला खूप काही शिकवावे..
तिनेही प्रेमाने मला दोन शब्द ऐकवावे..
कधी वाटते माझ्या कवितेत ती असावी..
माझ्या प्रेमाची छबी तिच्या हृदयी फसावी..
कधी वाटते ती असावी माझी सोबती..
तिनेही स्वीकारावी माझी अल्लड प्रिती..
नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता
नजरेतही तूच दिसलास ,
स्वतः दुःख देऊन मला
असा दर्दभरा का हसलास ?
कधी व्हावे गुलाब असे मला वाटे
पण नंतर आठवी की जीवनात असती काटे
मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे
परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ..
एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात..
तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते..
तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....
सुख म्हणजे काय असते?
- निनाव (१६.०९.२०१६)
सुख म्हणजे काय असते?
ओंजळीत भरलेले पाणीच जणु!
जमवले तर बसते लहानश्या जागेत,
सोडले जर का सैल, जाते वाहून
नवीन काठ शोधत - न सापडणारे!
(१)
वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.
(२)
पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.
(३)
देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.
====================================
"सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा....
°°°°
झुडपात जाऊन तोंडाला
लय फासलाय साबण
चाललू हिरीत मुटका मारायला
तर आरची म्हणली " हु म्हागं"
- लंगडा प्रदीप
°°°°°°
केळीच्या बागा तुडवून
पाय दुखतात सारखे
आसं काय करती येड्यावणी
"घरची उठत्याल की आरचे"
- परश्या
==================================
"सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !! तुम्हाला?
•••••••••
तू