दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....
लेखनप्रकार
कच्चा माल
एक स्पष्टीकरण....
प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा!
आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!!
:)
आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ....
सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!!
उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार. कुणाच्याही अंगातले चांगले गुण आम्हाला भावले तर सहाजिक आम्ही आमचं उघडं करतो (मन हो, मन!!!). ह्यात कुणीही परसात नळ नेऊ नये हे बरं....
खरं तर हे मिपावर लिहिण्याची काही आवश्यकता नव्हती पण काही वाचकांच्या (आणि काही प्रशासकांच्या!!) अतिचौकस स्वभावाची कल्पना असल्याने लिहायची गरज पडली.....
आता वय झालं म्हणून आम्ही सर्किट (ईश्वर त्या आयडीला सद्गती देवो!!! पण इथे तो शब्द विशेषनाम नसून विशेषण म्हणून वापरला आहे!!) झालो. वय झाल्यानंतर सर्किटपणा कुणालाही चुकत नाही. अणि किती सर्किट असावं हे काही कुणाच्या हातात नाही......
तेंव्हा कृपा करून लेख वाचून चिंतन करावं हीच वाचकाना विनंती आहे......
:)
शरू पहिलवानाला काळजी लागली होती की मी पंतप्रधान कसा होईन? त्याच्या पार्टीत जवळ जवळ कुणीच त्याला सिरियसली घेत नव्हतं!!! सगळे आपले राव आणि केसरींच्या मागे धावत होते....
शरूजवळ खर्च करायला शुगर लॉबीचा पैसा बख्खळ होता पण त्याच्याकडे किर्तीचं आणि देखणेपणाचं वलय नव्हतं. शेवटी केसरीला लाथांचा आहेर मिळाल्यानंतर शरू पहिलवानाच्या आशा पल्लवित झल्या.....
पण तितक्यात दुधात मिठाचा खडा पडला......
एकाएकी एक दिवशी सोनियानं, माझ्या माऊलीनं, पार्टीचं नेतेपद स्वीकारायला मान्यता दिली. ही देवता आणि तिच्या सर्व कुटूंबियांनी पार्टीवर चांगलीच भुरळ टाकली होती. जिथे शरूच्या सभेला जेमतेम चारपाचशे लोक (तेही, साखरकारखान्याचे खातेदार!!!) जमायचे तिथे तिच्या सभेला आता चाळीस-पन्नास हजार लोक ट्र्कमधून जमायला लागले.
शर्याची अशी जळजळ झाली की यंव रे यंव!!!! कितीही ईनो खाल्लं तरी पुरे पडेना!!!!
मग त्याने आपल्या बगलबच्च्यांना म्हणजेच पत्रकारांना हाताशी धरून सोनियावर राळ उडवण्याचा प्रयत्न केला. तिच्या भाषणावर, तिच्या दिसण्यावर आणि मुख्य म्हणजे तिच्या असण्यावर भयंकर असभ्य हल्ला चढवला...
तिला देशाची भाषाच येत नाही! ती रोमन लिपीत हिंदी भाषणं दुसर्या लोकांकडून लिहून घेते. ती भाडोत्री भाषणंही तिला सभेत नीट वाचूनही दाखवता येत नाहीत, सत्रांदा अडखळते वगैरे वगैरे!!! जसा काही स्वतः शरू भाषणं करण्याच्या बाबतीत अटलबिहारीच होता. शरूला तर स्वतःच्या मातृभाषेतूनही व्यवस्थित भाषण करता येत नसे! आणि पहिलवानी शरीराचा हा माणूस पैशाच्या जोरावर क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होऊन बसला होता!!!!
हे सर्व सांगण्याचं कारण असं की सुरवातीला शरूच्या टीकेला माना डोलावणारी लोकं हळू हळू ओसरू लागली. मग शरूने तिच्या जन्मस्थळाचा मुद्दा उकरून काढला....
ही परक्या देशात जन्मलेली, हिला इथली भाषाही येत नाही. लग्न होऊन या देशात आली काय, सरळ आमच्यावर राज्य करायला बघते. आम्हाला ही पुन्हा गुलाम करून ठेवणार, असा तो विखारी प्रचार करायचा. माऊली त्याच्याकडे लक्षच देत नव्हती. ती या टीकेला मुळीच उत्तर देत नसे. शरूच्या अंगात निवडणूकीचं वारं भरलं होतं. आपणच पंतप्रधान म्हणून निवडून येणार याची त्याला खात्री वाटत होती. पण तो तसं कधीच बोलून दाखवत नव्हता. प्रथमच मराठी पंतप्रधान निवडून येणं तितकं सोपं नव्हतं.
आणि हो, इथे मराठी माणासाला मराठी असंच म्हणतात. "निवासी, अनिवासी, निर्वासित"असली आंतरजालीय विशेषणं लावत नाहीत. उलट देशप्रेमी किंवा देशद्रोही असं सरळ सरळ संबोधलं जातं!!!!
शालेय शिक्षण आटोपून माझी माऊली, सोनिया, आपला विठ्ठली देश सोडून कॉलेजच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. यातून तिची उच्च शिक्षणाविषयीची आस्थाच दिसून येते. मूळची गरीब असल्याने तिथे ती चरिथार्थ चालवण्यासाठी हॉटेलांमध्ये टेबलांवर फडका मारायची कामे करायची. यावरून ती कोणतेही काम हलके मानत नसे हेच नजरेला पडतं. इंग्लंडला कॉलेजचं शिक्षण घेत असतांना तिची एका भारतीय राजबिंड्या मुलाशी गट्टी जमली आणि तिने त्याच्यावरही फडका मारला. आता तो राजबिंडा मुलगा हा भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा होता हा केवळ योगायोग!!! विठ्ठ्लीमध्ये आजीआजोबाकडे लाडात वाढल्यानंतर इंग्लंडमधल्या हलाखीच्या जीवनाचाही अनुभव घेऊन ती आपलं जीवन परिपक्व करीत होती....
तितक्यात एके दिवशी त्या राजबिंड्या मुलाने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. तिला दूर पूर्वेकडल्या देशातली उच्च भारतीय संस्कृती खुणावू लागली. भगवद्गीगीता आणि एकूणच हिदू-बुद्ध धर्माबद्दल तिला विलक्षण आकर्षण होतं. तिने लग्नाला होकार दिला. पण तिच्या सासूची खूप कडक शिस्त असायची. म्हणून सासूला प्रसन्न करण्यासाठी ती फर्रऽऽकन झगा काढून टाकून झर्रऽऽकन साडी नेसायला शिकली. तिचं चापूनचोपून साडी नेसणं इतकं परफेक्ट होतं की खुद्द अनेक मूळच्या भारतात जन्मलेल्या स्त्रियांनाही ते जमत नाही. खोटं वाटत असेल तर तिचा आणि तिच्या जावेच फोटो शेजारीशेजारी ठेऊन बघा....
तिची सासू भारतातल्या गरीब लोकांच्या हाल-अपेष्टा पाहून खूप दुख्खी व्हायची, आणि रडायची देखील! आणि ते बघून सोनियाही खूप खूप दुःखी व्हायची.....
हिंदू,बुद्ध धर्माबद्दल तिने खूप पुस्तकं जमवली होती. ती अजून तिच्या लायब्ररीत आहेत. भगवत गीतेतले काही श्लोक तिने पंडित कामाला लावून कडून त्यांच्याकडून म्हणवून घेतले होते. महात्मा गांधीबद्दल (आणि एकूणच गांधी या शब्दाबद्दल) तिला खूप आदर आहे. कुराणा मधून पण तिला खूप गोष्टी ऐकून कळल्या आहेत.
ह्या नंतरची माहिती दुसर्या भागात.....
आणि तो भाग लिहिण्याचं आवाहन आम्ही श्री. मिसळभोक्त्यांना करीत आहोत!!!!:)
माऊलीचा चरणरज,
पिवळा डांबिस
:)
वाचन
7553
प्रतिक्रिया
0