एका सुफी संताचा जाहीरनामा आणि इन्क्विझिशन -
...मुसलमानांनी त्यांची ओळख एवढा काळ कशी टिकवली हे सहज समजण्यासारखे आहे. काफिर जेजे करत होते त्याच्या विरुद्धच करायचे असे त्यांचे धोरण असते. काफिरांना टाचेखाली ठेवणे हाच त्यांचा धर्म झाला. काफिरांचे सतत हनन करणे, त्यांचा सतत उपमर्द करणे, त्यांना जगणे असह्य करणे असा एक कलमी कार्यक्रम इस्लाम राबवत असे. अर्थात तुम्हला हे माहीत आहे, की काफिर म्हणजे जे इस्लामधर्मिय नाहीत ते. अरबस्थानात आणि इराणमध्ये यात मुख्यतः ख्रिश्चन, ज्यु आणि पारशी प्रजा येत असे. हिंदुस्थानात अर्थातच हिंदू, जैन, बौद्ध इ.इ. धर्मीय मोडत असत. त्यांच्या या कामात ज्यांचे हिंदूही गुणगान गातात त्या सुफी संतांनी भरपूर योगदान दिले आहे. असाच एक सुफी संत होऊन गेला त्याचे नाव आहे, सय्यद अलि हमदानी. हा माणूस काश्मीरमध्ये कसा आला ते पाहुया. तो सय्यद होता म्हणज तो प्रेषिताच्या रक्ताचा असणार. हा सुफींच्या कुब्रविया पंथाचा होता. त्याचा जन्म झाला इराणमधील हमादानमध्ये. त्याने मध्य ॲशियामध्ये इस्लाम धर्माच्या प्रसाराला बराच हातभार लावला. स्वातमधून मक्केला जाताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. त्याने इस्लामच्या प्रसारासाठी भरपूर प्रवास केलेला आढळतो. त्याने अफगाणिस्थान, उझबेगिस्थान, चीन, सिरिया, काश्मीर आणि तुर्कस्थान एवढ्या देशात धर्मप्रसाराचे काम केले. तैमुरने जेव्हा इराणवर तिसरे आक्रमण केले, तेव्हा जीव वाचवण्यासाठी हमदानीने आपल्या ७०० सय्यदांबरोबर हमादान सोडले आणि तो काश्मीरात दाखल झाला. त्या काळात काश्मीरचा सुलतान कुतुबुद्दीन शहा आणि दिलीचा सुलतान फिरोझ शाह तुघलक यांच्यात युद्ध चालू होते. नेहमीप्रमाणे मुसलमानांच्या कुठल्याही युद्धात हिंदूंचा जीव जातो, त्याप्रमाणे येथेही तेच झाले. हमदानीने या दोन सुलतानात तह घडवून आणला. यानंतर हमदानी मक्केला गेला आणि १३८० साली काश्मीरला परत आला. एक वर्ष काश्मीरमध्ये इस्लामचा प्रसार करताना त्याने बरेच उद्योग केले. त्यानंतर तो लडाखमधून तुर्कस्थानला गेला. १३८८४ साली तो परत काश्मीरला परतला. काश्मीरला परतण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. त्याला यावेळी काश्मीरमध्ये जास्त काळ राहायचे होते, पण आजारपणामुळे त्याला ते जमले नाही. सध्या पाकिस्तानात असलेल्या मन्शेरामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही झाली त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती.
त्याने इस्लामवर बरेच ग्रंथही लिहिले.
ज्याप्रमाणे हिटलरने ज्यूंवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले तसेच निर्बंध हिंदूंवर घालावेत असा सल्ला त्याने सुलतानाला दिला. त्याने त्यासाठी एक जाहीरनामाच काढला.. हा जाहीरनामा नमुनेदार आहे, कारण पुढे असेच निर्बंध भारतभर हिंदूंवर घातले गेले. एवढेच नाही तर ख्रिश्चन इन्क्विझिशनने घातलेले निर्बंध आणि या जाहीरनाम्यात काडीचाही फरक आढळत नाही. किंबहुना मला तर वाटते इन्क्विझिशनने जे निर्बंध हिंदूंवर घातले त्याचा पाया स्पेन आणि येथे भारतातील गोव्यात असावा. असो.. काय होता हा जाहीर नामा?
१ हिंदूनी मुर्तींची नवीन मंदिरे बांधू नयेत.
२ ज्या मंदिरांना दुरुस्तीची गरज आहे ती दुरुस्त करू नयेत. ( ती तशीच नष्ट होऊ द्यावीत)
३ मुस्लीम प्रवाशांना मंदिरात राहण्याची परवानगी असावी
४ मुस्लीम प्रवाशांना झिम्मींनी ‘‘अतिथी देवो भव’’ अशी वागणूक देण्यात यावी. (म्हणजे हिंदूंनी द्यावी)
झिम्मी : हा शब्द झिम्मा या अरेबियन शब्दावरून आलाय. झिम्मा म्हणजे संरक्षण. ज्याचे संरक्षण केले जाते ते झिम्मी. झिम्मी म्हणजे गैरमुस्लीम ज्यांचे रक्षण पैसे घेऊन केले जायचे. म्हणजे ठार मारणारे हेच आणि मरायचे नसेल तर ठराविक कर दिला की अभय मिळे. हा कर गोळा करणारे हेच. त्या काळी हिंदूंवर असा अत्याचार होत असे. झिझिया हाही जिम्मींकडून संरक्षणासाठी घेतला जायचा.
५ झिम्मींनी मुस्लीम प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरात तीन दिवसापर्यंत आसरा द्यावा आणि त्यांचे आगतस्वागत करावे.
६ झिम्मींनी हेरांचे काम करू नये आणि हेरांना आश्रय देऊ नये.
७ जर एखाद्या झिम्मीच्या नातेवाईकाला इस्लाम धर्माचा ओढा वाटत असेल तर त्याल इस्लाम धर्म स्विकारण्यास इतर झिम्मींनी मदत करावी.
८ झिम्मींनी मुसलमानांचा मान राखला पाहिजे
९ झिम्मींच्या बैठकींना जर एखादा मुसलमान आला तर त्याचे झिम्मींनी स्वागत केले पाहिजे.
१० झिम्मींना मुसलमानांसारखा पोशख घालण्यास बंदी आहे.
११ त्यांनी मुसलमानांची नावे त्यांच्या मुलांना ठेऊ नये.
१२ त्यांनी घोड्यावर खोगीर टाकून घोड्यावर बसू नये.
१३ झिम्मींनी तलवारी, धनुष्यबाण किंवा किठल्याही प्रकारची शस्त्रे बाळगू नयेत.
१४ झिम्मींना सहीशिक्याची अंगठी घालण्यास मनाई आहे.
१५ त्यांना उघडपणे मद्य पिण्यास किंवा विकण्यास मनाई आहे.
१६ झिम्मींनी त्यांचा पारंपरिक पोषाखाचा त्याग करू नये. कारण तो पोषाख त्यांच्या अडाणीपणाचा द्योतक आहे आणि ते मुसलमानांपासून वेगळे आहेत हे ओळखता येते.
१७ त्यांनी मुस्लिमांसमोर स्वतःचे रितीरिवाज पाळू नयेत.
१८ त्यांनी मुस्लीम वस्तीमध्ये घरे बांधू नयेत
१९ त्यांनी मुस्लीम दफनभूमिच्या आसपास त्यांच्या मृतांचा अंत्यविधी करू नये.
२० ते मृतांचा शोक मोठ्या आवाजात करणार नाहीत.
२१ ते मुस्लीम गुलाम विकत घेणार नाहीत.
सय्यद अथर अब्बास रिझवी हा एक मुसलमान इतिहासकार नजिकच्या काळात होऊन गेला (१९२१-१९९४) त्याच्या एका लेखात लिहितो, ‘‘हमदानीने जेव्हा हा जाहीरनामा लिहिला तेव्हा तो अलीम म्हणून जाहीर केला. एक सुफी संत म्हणून नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की सुफींचे जे तत्त्वज्ञान आहे, ज्याचे आपण गोडवे गातो ते किती बेगडी आहे हे समजते. तुम्ही तत्त्वज्ञान सांगता आणि स्वतः ते पाळत नाही आणि त्यासाठी अत्यंत भिकारडी कारणे देता. हा सुफी संत जी प्रवचने द्यायचा तो चबुतरा पूर्वी प्रसिद्ध कालीमंदिर पाडून उभा केला होता. हे मंदिर पाडण्यासाठी या सुफी संताने स्वतः मदत केली होती. हमदानीच्या जाहीरनम्यात जे, मंदिरात मुस्लीम प्रवाशांना जागा नाकारू नये हे कलम होते त्याचा या विध्वंसासाठी आधार घेतला गेला. आजही त्याच कालीमंदिराच्या जागेवर त्याचा दर्गा उभा आहे.
असा असावा संत!
संभलमध्ये मुसलमानांनी हा जाहीरनामा तंतोतंत पाळलेला दिसतो. त्यांनी हिंदूंच्या वस्तीत स्वतःची घरे बांधून त्यांना तेथे अल्पसंख्यांक केले आणि हाकलून लावले. याबद्दल जास्त लिहिण्याची गरज नाही. ते तुम्हाला माहीत असेलच...
वर दिला आहे सुफी संताने काढलेला जाहीर नामा. आता सेंट झेव्हियरने गोव्यात आणलेल्या गोवा इन्क्विझिशननने काढलेला जाहीरनामा पाहू -
गोवा इन्क्विझिशनचा आदेश -
“गोव्यात, बार्देश आणि सालसेटी येथे राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना, स्थानिक आणि इतर देशांतून येथे स्थायिक झालेल्या नागरिकांना कळवण्यात येते, की सर्व नागरिक, मग त्यांचा दर्जा काहीही असो, त्यांचे पद काहीही असो, त्यांची परिस्थिती कशीही असो, त्यांनी प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे या आदेशाचे पालन केले पाहिजे. या आदेशाचा उद्देश प्रास्ताविकात दिले आहेच.
इंडियातील सर्व स्थानिक नागरिक, गोव्याचे नागरिक आणि सालसेटी आणि बार्देश या प्रदेशातील सर्व उपविभागातील नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की त्यांच्या लग्नसमारंभात किंवा त्या समारंभाच्या संबधित असलेल्या कार्यक्रमात त्यांनी गैतास-पाईप (सनई) किंवा इतर हिंदू वाद्ये वाजवू नयेत.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येतो आहे, की त्यांनी विवाह ठरवतांना कोणालाही आमंत्रण देऊ नये. तसेच हुंडा देऊ नये, विवाहानिमित्त भेटवस्तू वाटू नयेत, विवाह प्रसंगी मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांना निमंत्रण देऊ नये. (यांना दाजी किंवा गोत्री असे संबोधले जाते.) जर एखादा आमंत्रण नसताना तेथे उपटला, तर त्याने महत्त्वाच्या गोष्टीत भाग घेऊ नये. सर्व महत्त्वाच्या बाबी या मुलगा आणि मुलीच्या आई वडिलांनी किंवा पालकांनी किंवा मुलाने आणि मुलीने मान्यता दिलेल्या सद्गृहस्थांनी (ख्रिश्चन) कराव्यात.
नागरिकांना आदेश देण्यात येत आहे, की जेव्हा हुंडा मुलाच्या घरी पोहोचवण्यात येतो, किंवा भेटवस्तू देण्यात येतात त्यावेळी, किंवा इतर कुठल्याही संबंधित समारंभात मग ते केव्हाही साजरे केलेले असोत, त्यावेळी फुले, हार, विड्याची पाने, सुपारी पाठवू नयेत.
नागरिकांना आदेश देण्यात येत आहे, की त्यांनी विवाह समारंभात किंवा कुठल्याही संबंधित समारंभात त्यांनी उपस्थितांना (नवरदेवाच्या घरी किंवा नववधूच्या घरी) खाजगीत किंवा सगळ्यांसमोर पानाचे व्हिरोज आणि सुपारी वाटू नयेत. (विडा) जर त्यांना या वस्तू वापरायच्याच असतील तर त्यांनी त्या एका टेबलावर ठेवाव्यात, पण वाटू नयेत आणि जमलेल्यांनी त्या टेबलावरून मानाप्रमाणे घेऊही नयेत. सगळ्यांनी रांगेत त्या वस्तू घ्याव्यात.
या नागरिकांना आदेश देण्यात येत आहे, की विवाहानिमित्त नवरदेवाच्या घरच्यांनी किंवा नववधूच्या घरच्यांनी गावात नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची भेटवस्तू वाटू नये (विडे, सुपारी, लाडू )
या नागरिकांना असा आदेश देण्यात येतो आहे, की विवाह प्रसंगी किंवा इतर कुठल्याही समारंभात, आनंद साजरा करताना त्यांनी खाजगीत किंवा इतरांसमोर “वोविऑस” म्हणू नयेत ( ओव्या). आनंदाच्या प्रसंगी म्हणण्यात येणाऱ्या गाण्यात आणि या ओव्यांमध्ये कुठलेही साम्य असू नये. नवरदेवाच्या आणि नववधूच्या दाजींनी आणि नातेवाईक स्त्रियांनी कुठलीही गाणी म्हणू नयेत.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की त्यांनी त्यांच्या घरात कुठल्याही कारणाने ओव्या म्हणू नयेत जेणेकरून या ओव्यांचा वापर श्रद्धावान ख्रिश्चन नागरिकांमध्ये नष्ट होईल.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की विवाह, मग तो नवरदेवाच्या घरात होत असो किंवा नववधूच्या घरात, किंवा कुठेही होत असो, त्याच्या आधी ठरलेल्या मुहूर्तावर तांदूळ कांडणे, मसाले कुटणे, पीठ दळणे, गोडधोड पदार्थ तळण किंवा मेजवानीसाठी कुठलेही पदार्थ तयार करू नयेत. मुलाच्या किंवा मुलीच्या नातेवाईकांच्या घरीही ही तयारी करू नये. विवाहाआधी ही तयारी जास्त माणसे लावून करावी. त्यात कुठल्याही परंपरा पाळल्या जाऊ नयेत.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की विवाहप्रसंगी किंवा इतर कुठल्याही संबंधित प्रसंगी नवरदेव व नववधूला हळद लावू नये किंवा केशर, तेल, दूध, तांदुळाची पिठी, अबोलीच्या पानांचा, किंवा कशाचाही लेप लावू नये. विशेष करून विवाहाच्या दिवशी, किंवा आदल्या दिवशी, किंवा दुसऱ्या दिवशी, किंवा पुढचे आठ दिवस किंवा विवाहाआधी आठ दिवस हा कार्यक्रम करू नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की नवरा नवरीला इतरांसमोर अंघोळ घालू नये. जरूर भासल्यास त्यांनी एका माणसाच्या समोर, (जो त्यांना आडातून पाणी काढण्यास मदत करेल) करावी. हा माणूस कोणी नातेवाईक किंवा मानाचा नसावा.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की त्यांनी पानांनी सजलेले मांडव नवरदेवाच्या घरासमोर किंवा नववधूच्या घरासमोर उभे करू नयेत.
याच नागरिकांना असाही आदेश देण्यात आहे, की विवाहाच्या दिवशी जेव्हा नवरा नवरी चर्चमधून विवाहानंतर वधूच्या घरी येतील, किंवा वधूच्या घरून ते स्वतःच्या घरी जातील, तेव्हा त्यांच्या स्वागतास त्यांच्या नातेवाईकांनी जमू नये. त्यांना घराबाहेर टाकलेल्या मांडवात बसवू नये. त्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठवावे. नातेवाईकांनी नवविवाहितांवर किंवा त्यांच्या बरोबर आलेल्या पाहुण्यांवर फुले उधळू नयेत, अत्तर शिंपडू नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे की. सगळे विवाह दुपारच्या आत उरकावेत. नवविवाहित त्यांच्या घरी सूर्यास्ताआधी पोहोचले पाहिजेत याची काळजी घ्यावी.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की ज्या पलंगावर नवविवाहित झोपणार आहेत त्या गादीखाली विड्याची पाने, सुपारी किंवा इतर कुठलीही वस्तू ठेवू नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की नवविवाहितांना विवाह झाल्यावर लगेचच त्यांना त्याच्या शयनगृहात कोणीही (त्यांच्या नातेवाईकांने) नेऊ नये. त्यांच्यावर कुठलेही कापड पांघरू नये. त्यांना एकाच पेल्यातून काहीही पिण्यास देऊ नये वा त्यांना एका ताटातून खाण्यास देऊ नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात आहे, की विवाहप्रसंगी वाढणारे नवविवाहितांचे नातेवाईक असू नयेत आणि वाढणाऱ्यांना जर पादत्राणे घालण्याची सवय असेल त्यांनी ती पादत्राणे काढण्याची सक्ती करू नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की विवाहानंतर चर्चमधून परत आल्यावर त्यांने नवरदेवाच्या घरातून आलेले कपडे नववधूने परिधान करू नयेत किंवा नवरदेवानेही वधूकडून आलेले पोषाख परिधान करू नयेत. नवविवाहितांनी इतरांसमोर लग्नातील कपडे बदलू नयेत.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की लग्नात किंवा त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही समारंभात कपाळाला तांदूळ लावू नयेत किंवा तत्सम पूजाअर्चा करू नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की विवाह झाल्यावर एक महिन्यापर्यंत त्यांनी नातेवाईकांना किंवा ज्येष्ठांना भेट देऊ नये. एकदा का नववधू नवऱ्याच्या घरी गेली, की तिने महिनाभर आपल्या माहेरी जाऊ नये. जर विवाहाच्या दिवशी नववधू सासरी गेली नाही, तर तिने पुढील महिनाभर सासरी जाऊ नये. तसेच या नवविवाहितांना कोणी जेवण्याचे निमंत्रण देऊ नये. जर नवरदेव आणि नववधू एकमेकांच्या घरी गेले, तर त्यांच्याबरोबर जाणाऱ्यांनी बरोबर तबकात तांदूळ, सुपारी, नारळ, इत्यादी खाण्याचे पदार्थ नेऊ नयेत. नवरदेवाच्या घरून जर काही पोषाख नववधूला देण्यात आले तर तिने ते परिधान करू नयेत.
नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की विवाहाआधी किंवा नंतर त्यांनी मुल्लाला किंवा त्याच्या जागी काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला काहीही देऊ नये. कुठल्याही मुल्लाने कुठल्याही विवाहास हजेरी लावू नये. याला अपवाद फक्त त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचा असेल. लग्नात शिजवलेल्या अन्नाचा कुठलाही भाग नंतरसाठी विशिष्ट दिवसासाठी किंवा कारणांसाठी बाजुला ठेवण्यात येवू नये. विवाहाच्या काळात नवरदेव आणि नववधूच्या घरात टोपली, सूप, मातीचा हंडा, तांदूळ, शेंगा, नारळ, विड्याची पाने, सुपारी इत्यादी खाण्याच्या वस्तू ठेऊ नयेत. (विशिष्ट दिवशी वापरण्यासाठी) जर नवदांपत्यासाठी नवी चूल करायची असेल, तर त्यात विड्याची पाने इ. अर्पण करू नयेत. अपत्याचा जन्म झाल्यावर त्याला तांदुळांवर ठेऊ नये. अपत्याच्या जन्मानंतर सहा दिवसांनंतर होणारा सण खाजगीत किंवा समाजात साजरा करू नये. हा आदेश इतर जमातींच्या नागरिकांना आणि पोर्तुगीज नागरिकांनाही लागू आहे. कारण पोर्तुगीज नागरिकही हा सहाव्या दिवशी होणारा कार्यक्रम साजरा करतात असे आमच्या लक्षात आले आहे. त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की त्यांच्या स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात त्या ज्या खोलीत राहतील ती खोली शेणाने नीट सारवून घ्यावी. त्यानंतर दोन महिन्यापर्यंत त्यांनी विहिरीजवळ अंघोळ करू नये. करायचीच असेल तर दुसऱ्या जागेवर करावी, पण तेथे विड्याची पाने, सुपारी इ. वस्तू ठेवू नयेत. अपत्याचा जन्म झाल्यावर एक वर्षापर्यंत त्या अपत्यास त्यांच्या ज्येष्ठांच्या घरी पाठवू नये. विवाहानंतर नवविवाहितेची मासिक पाळी सुरू झाल्यावर कुठलाही समारंभ करू नये व त्या काळात, या कारणासाठी फुले, केळी किंवा इतर भेटवस्तू त्या स्त्रीला पाठवू नयेत.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की एखाद्याचा मॄत्यू झाल्यावर जेथे त्याचा मृत्यू झाला आहे ती जागा सारवू नये. जर घर स्वच्छ करायचे असेल, तर दुसऱ्या मार्गाने स्वच्छ करावे. मृत पावलेल्या माणसाचे कपडे, त्याची गादी नदीत किंवा समुद्रात फेकू नये. संसर्ग होऊ नये म्हणून या वस्तू जाळून टाकाव्यात. माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा अकरावा, बारावा साजरा करू नये. त्यासाठी गरीबांना जेवण्यास बोलावू नये. त्यांना जर मृत माणसासाठी दानधर्म करायचा असेल, तर तो साधेपणाने करावा त्यासाठी जेवणावळी घालू नयेत. श्राद्धावेळी जेवणावळी घालू नयेत आणि घरी जेवण्याचे आमंत्रण देऊ नये.
कापणीच्या हंगामात त्यांनी त्यांच्या घरात सण साजरा करू नये. त्याऐवजी नोव्हिदाद साजरा करावा. असाही आदेश देण्यात येत आहे, की घरात घरातील प्रमुख स्त्रीने किंवा कुठल्याही स्त्रीने ओलेत्याने स्वयंपाक करू नये, त्यांनी स्वयंपाकघरात शिरण्याआधी अंघोळ करू नये. ही पद्धत हिंदूंच्या घरात प्रचलित आहे. नागरिकांनी मीठ न घालता शिजवलेला भात खाऊ नये. नंतर जेवताना वरून मीठ घेऊ नये.
या स्थानिक नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की त्यांनी पोर्णिमेनंतर किंवा अमावास्येनंतर उपवास करू नयेत. जर ख्रिश्चन धर्मानुसार त्याच दिवशी उपास करावा लागला, तर त्यांनी तो ख्रिश्चन पद्धतीनुसार करावा. फक्त रात्रीच आन्नग्रहण करावे. उपवास सोडताना कुठलाही सण साजरा करू नये. चंद्रग्रहणाच्या दिवशी उपवास करू नये आणि ग्रहण सुटल्यावर कसलाही सण साजरा करू नये, दानधर्म करू नये. हिंदूच्या प्रथेप्रमाणे पुरुषांनी घरात धोतर वापरू नये तसेच स्त्रियांनी चोळी वापरू नये.
गोव्यातील नागरिकांनी त्यांच्या अंगणात किंवा परसात किंवा बागेत तुळशीचे रोप लावू नये. जर कुठे हे रोप उगवले असेल तर ते ताबडतोब उपटून टाकावे.
सर्व नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की कुठल्याही ख्रिश्चन माणसाला हिंदू नावाने किंवा आडनावाने हाक मारू नये. हा नियम पोर्तुगीज नागरिकांनाही लागू आहे.
पोर्तुगीज राज्यातील कुठल्याही भागात मुल्लाला मान्यता देऊ नये. व त्याला कुठल्याही प्रकरणात काहीही देऊ नये. त्याला कसलाही मान देऊ नये. त्याला लागवडीचा पहिला मान देऊ नये. तसेच कौले टाकताना त्याच्या हस्ते पहिले कौल चढवू नये. ही कामे करावीत, पण त्यासाठी मुल्ला मौलवींना निमंत्रण देऊ नये.
या नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की “एंट्रुडो”च्या उत्सवात पुरुष व मुलांनी नाचगाणी करत गावातून मिरवणूक काढू नये आणि समजा मिरवणूक न काढता ते वेगवेगळे नाचत फिरले तर त्यांना अन्न, नाणी किंवा इतर काही वस्तू देऊ नयेत.
पोर्तुगीज आणि स्थानिक नागरिकांना असा आदेश देण्यात येतो आहे, की कॅमिसादेस उत्सवात किंवा तत्सम उत्सवात ज्या मिरवणुका निघतील त्यात कुठल्याही ख्रिश्चन माणसाने हिंदू पोषाख परिधान करून सामील होऊ नये. तसेच या मिरवणुकीत हिंदू वाद्ये वाजवू नयेत, कारण हिंदू ही वाद्ये त्यांच्या पवित्र देवळात वाजवतात. सेंट पॉलने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या दिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या नृत्यात हिंदू पोषाख वापरण्यास हरकत नाही. (किंवा तत्सम कारणासाठी वापरण्यास हरकत नाही.) तसेच कुठल्याही मिरवणुकीत चर्चच्या फादर किंवा इतर अधिकाऱ्याचे सोंग वठवू नये किंवा ख्रिश्चन चर्चची कर्मकांडे दाखवू नयेत. लेंटच्या काळात मिरवणुकीत (पॅसोस) ज्यात आपल्या जिझस ख्राईस्टच्या दयेची कथा दाखवली जाते त्यात येशूशिवाय इतर मूर्ती असू नयेत. इतर संतांच्या मूर्ती वास्तववादी चित्र उभे करण्यासाठी वापरल्या तरी हरकत नाही, पण कुठल्याही परिस्थितीत पिलॅटोस, ज्युडास, ॲनाझ, कैफॅक्ष, हिरोडेस किंवा फॅरिसीझ (ज्यूंचा एक प्राचीन पंथ) यांच्या मूर्तींचे प्रदर्शन करू नये. कारण ती मूर्तिपूजा होईल. हीच काळजी चर्चमध्ये किंवा इतर ठिकाणे घ्यावी.
गोवा, बार्देश आणि साष्टी या प्रांतातील पोर्तुगीज आणि स्थानिक ख्रिश्चन नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे, की वर उल्लेख केलेल्या कुठल्याही गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, त्याला कुठल्याही प्रकारचे साहाय्य करू नये.”
हे दोन्ही आदेश वाचल्यावर यातील साम्य आपल्या लक्षात येईल. सुदैवाने इन्क्विझिशन पोर्तुगिजांनीच बंद केले. हमदानीचा आदेश मात्र आजही मुल्ला मौलवी पाळत असावेत अशी शंका आहे...
हिंदूंना जगणे कसे अशक्य केले गेले होते हे यातून दिसून येते. या धर्मच्छळाला तोंड देत ज्यांनी आपला धर्म जिवंत ठेवला त्यांना वंदन करायलाच पाहिजे.
हा जाहीरनामा माझ्या ‘‘एका धर्मच्छळाचा इतिहास’’ या पुस्तकातून घेतला आहे.
आता हे झाले इतर धर्मियांनी हिंदूंना जगणे अशक्य केले त्या विषयी, पण हिंदूही यात मागे नाहीत. हिंदू आपल्याच धर्माच्या बांधवाना जगणे असहय्य करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. दोन वर्षापूर्वी घडलेली एक घटना मला आठवते. आम्ही भिगवणला पक्षी निरिक्षणासाठी चाललेलो असताना एका टपरीवजा हॉटेलमध्ये थांबलो. तेथे टेबलावर बसल्यावर टेबलावर पडलेली काही ख्रिस्ती प्रचारकी साहित्य पडलेले मला दिसले. मी ते उचलले आणि मित्राला म्हटले, हे बघ काय चालले आहे इथे. आम्ही त्यावर चर्चा करतोय हे पाहून मालक तेथे आला आणि म्हणाला, ‘‘काय साहेब काय झाले?’’ मी त्याला विचारले, तुम्ही ख्रिस्ती झालाय का? त्याने दिलेले उत्तर -
अजून नाही, पण विचार करतोय. हिंदू धर्म गावात पाळायची भानगड फार म्हणजे फारच महागडी आहे. मुल जन्मले, गावजेवण घाला. माणूस मेला, गाव जेवण घाला. इथे आम्हालाच दोन वेळचे जेवण मिळायची मारामार. हे कसे परवडायचे?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही नाही जेवणे घातलीत तर गावकरी काय करतील?’’ तो : साहेब हे तुम्हाला म्हणणे सोपे आहे. गावात असं चालत नाही. लगेच तुम्हाला बाजूला टाकतात. (त्याने वाळीत हा शब्द टाळला हे माझ्या लक्षात आले.’’ पण तुम्हाला सांगतो साहेब ख्रिस्ती झाल्यावर मात्र हा सगळा ससेमिरा संपतो. आमच्या गावातील एक कुटुंब ख्रिस्ती झाले, त्यांना हा सगळा त्रास नाही... (अर्थात त्याला पैसे मिळाले असतील किंवा इतर प्रलोभने दाखवली गेली असतील, पण त्याने हे जे कारण सांगितले त्यात थोडेफार तरी तथ्य असावे.)
मला काय बोलावे कळले नाही. दुर्दैव, हिंदू अजूनही शहाणे होत नाहीत... यात ब्रिटिशांना दोष देण्यात अर्थ नाही असे माझे स्पष्ट मत आहे. आता शिक्षण सगळीकडे पोहोचले आहे, या परंपरा, कर्मकांडे जर एखाद्याला पाळायच्या नसतील तर त्याला गावकऱ्यांनी उदारपणे तसे करू द्यावे.. त्याच्या जगण्याआड येऊ नये..
- जयंत कुलकर्णी.
वाचने
371
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सर्वच भयानक आहे. अजूनही…
हे सर्वच भयानक आहे. अजूनही धर्मप्रसाराचे प्रयत्न चाललेले आजूबाजूला दिसून येतात.
सुफींनी तर मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार केलाय.
बापरे
बापरे फारच भयानक आहे सगळ सगळंच. बाकी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मांतराच्या बाबतीत एकजात नीच आहेत.
ह्म्म
धर्मांतर गावखेड्यात, जास्त करुन आदिवासी विभागात जोरदार आहे. डहाणु, पालघर पासुन ते खालपर्यंत आणि डोंगरा दऱ्यातील गावात. दर रविवारी दारु आणि फुकट जेवण ईतक्या भांडवलावर सुद्धा. आश्रमशाळेत मुलांना फुकट शिक्षण, दवाखाने वगैरे सोयीमागे सुद्धा हेतु हाच.
आणि ज्यांना २ वेळ जेवणाचीच भ्रांत त्यांना धर्म कुठला कळायला? जो पोटाला देईल तो आपला असा सोपा हिशोब.
हिंदू प्रजाती अशीच वेगाने…
हिंदू प्रजाती अशीच वेगाने नष्ट होत जाणार आहे.
अर्थात
पण हिंदूही यात मागे नाहीत. हिंदू आपल्याच धर्माच्या बांधवाना जगणे असहय्य करतात
.
अगदी अगदी,
बौध्दसनातन, सनातनजैन, शैववैष्णव अशा अनेक लढ्यांचा अनुभव असता धर्म, जात, उपजात, गोत्र आणि त्याच्याशी अनुसरुन असणारे मतभेद, उच्चनीचता आणि माणूसपणालाच लावायचे फिल्टर बघता शिक्षणाने येणारे शहाणपण कशाला म्हणायचे हा प्रश्नच आहे.
या परंपरा, कर्मकांडे जर एखाद्याला पाळायच्या नसतील तर त्याला गावकऱ्यांनी उदारपणे तसे करू द्यावे.. त्याच्या जगण्याआड येऊ नये..
तसेच धर्म, वर्ण, व्यवसाय, विधी बाबत असायला हवे खरेतर पण पण पण परत माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे आलेच. तेंव्हा कुठल्या गोष्टी मनाच्या आत, कुठल्या गोष्टी घराच्या उंबऱ्याच्या आत ठेवायच्या ह्याचे भान हेच शहाणपण सर्वांना यावे इतकीच इच्छा...
याला म्हणायचे तम्बूत उंटाला…
याला म्हणायचे तम्बूत उंटाला आश्रय देणे.
शांती प्रेमीक धर्माने सर्वत्र अशांतता पसरवलेली आहे.
न्यूयॉर्क चा मेअर त्याम्चाच आहे.
फ्रान्स मधे रस्ते नमाजासाठी अडवले जातात.
ब्रिटन चे तर आता ब्रिटनिस्तान मधे रुपांतर होत आहे. इंग्रजानी सहिष्णूता दाखवली त्याना त्याचे फळ मिळतेय.