मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

वडगावकर · · जनातलं, मनातलं
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... ) वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की... भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये. त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत... कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात. त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात. पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की... हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"

वाचने 22892 वाचनखूण प्रतिक्रिया 105

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Wed, 05/08/2024 - 15:19
बाय द वे, सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय रूपया, यांच्यातील विनिमय दर काय आहे?

In reply to by मुक्त विहारि

+१ ह्या करता की डॉ. साहेबही वयक्तिक टीका करतात. ज्यांचे घर काचेचे असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत मुवीकाकाका जानी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अथांग आकाश Wed, 05/08/2024 - 19:00
हाच न्याय सर टोबीनाही लागू होऊ शकतो.
थोडा फरक आहे! वादासाठी डॉ. खरे मोदीभक्त आहेत आणि सर टोबी नेहरु गांधी परिवाराचे गुलाम आहेत असे गृहीत धरू. देव भक्ताला पावला नाही तर भक्त त्याला शिव्या देतो. नास्तिक बनू शकतो. उद्या अपेक्षाभंग झाल्यावर डॉ.खरे मोदींना शिव्या शाप देतील. पण सच्चा गुलाम तसे करणार नाही. तो कटप्पा सारखा महिष्मतीच्या राजा राणीप्रति आजन्म निष्ठावान रहातो. सर टोबींचे तसेच आहे!! ते नेहरूंनंतर त्याच्या पोरीची मग तीच्या पोराची मग त्याच्या बायकोची मग तीच्या पोराची पिढ्यानपिढ्या इमानाने गुलामी करताना दिसतात. त्या नालायक लोकांनी कितीहि मूर्खपणा केला तरी ते गुलामीची घेतलेली शपथ मोडत नाहीत. उद्या रेहानसाठी वेळ आली तर अमरेंद्र बाहुबली सारख्या भल्या राजपुत्राच्या पाठीत तलवार खुपसून त्याचा मुडदा पण पाडतील. पण वैचारिक गुलामी शेवटपर्यंत सोडणार नाहीत!!! कृ.ह.घ्या. :-) .

In reply to by अमर विश्वास

कांदा लिंबू Sun, 05/05/2024 - 13:28
अहो रूपं अहो ध्वनि
सहमत. पण त्यांना या अवतरणाचा मतितार्थ काय कळणार आहे? त्यांना कळला तर ते हे पूर्ण अवतरण इथे लिहितील, पाहू. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by कांदा लिंबू

आग्या१९९० Tue, 05/07/2024 - 23:34
पण त्यांना या अवतरणाचा मतितार्थ काय कळणार आहे? लय मजा येते मला बुक्कीने कांदा फोडायला. अंगेन गात्रं नयनेन वक्त्रं, न्यायेन राज्यं लवxन भोज्यम्॥ ह्या श्लोकाचा अर्थ उच्चारासहित विगुंना विचारला होता का?