Skip to main content

धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

लेखक वडगावकर यांनी गुरुवार, 02/05/2024 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... ) वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की... भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये. त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत... कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात. त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात. पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की... हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"
लेखनविषय:

वाचने 22979
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by सर टोबी

भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे. भारतीय जनतेच्या अकलेची काळजी तुम्ही कशाला करताय? बाकी अकलेचा मक्ता फक्त आपल्याकडेच असतो आणि आपल्यालाच काय ती अक्कल आहे असे समजणारे लोक डाव्या पिलावळीत भरभरून आहेत. पण त्यांची स्थिती आजकाल केविलवाणी झाली आहे. भारतीय जनतेने त्यांना कालबाह्य केल्यामुळे केवळ जळफळाट सोडून दुसरं काहीच करता येत नाही. अवघड जागी दुखणं आहे ते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. चालायचंच

In reply to by सुबोध खरे

बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत दक्षिणेतील मतदार सुशिक्षित असल्याने तिथे मोदी आणी भाजपला कुत्र विचारत नाही. येडीअप्पाच्या जातीय राजकारणामुळे कर्नाटकात भाजप आहे. शेणपट्टयातील अशिक्षित मतदारात मोदी हीट आहेत म्हणजे मोदी भारतातील सुप्रसिद्ध नेते होत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय? (तुमच्याच तर्काप्रमाणे ) बाप रे बाप स्वतःसाठी किती खोल खड्डा खणताय !

In reply to by चौकस२१२

महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या मागे मोदींची प्रसिद्धी नव्हती तर ईडी लावुन, घोटाळे मॅनेज करुन, तोडीपाणी करुन, पक्षफोडी करुन स्थानिक प्रबळ नेते पक्षात घेतले हे कारण होते. असे नेते स्वतःच्या नावावर जिंकले होते ना की मोदींच्या. शिवाय १०५ मिळवायला शिवसेनेचीही साथ होती. नाहीतर कसबा झाला असता. त्यामुळे शेणपत्त्यामुळे १०५ मिळाल्या हे म्हणू शकत नाही.

In reply to by चौकस२१२

त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय?
फक्त महाराष्ट्रच नाही; भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे; म्हणून त्यांच्या तर्काने, अख्खा भारत देश म्हणजे शेण पट्टा!

In reply to by कांदा लिंबू

त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
आपल्या पक्षाच्या समर्थनाच्या प्रयत्नात कुठे थांबावे हे कळले नाही की माणूस किती रसातळाला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे!

In reply to by कांदा लिंबू

भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे भारताच्या एकूण एक मतदाराने?? भाजपचे मतदार म्हणजे संपूर्ण भारत नाही. मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा! >>>>>>> शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.
I rest my case!

In reply to by गवि

अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि. मिपावरील एक जण सोडल्यास सारे डु आयडी. मज्जाच मजा !!

In reply to by कांदा लिंबू

१ नंबर. कंपाईल होईल पण एक्क्जीकुशनला रनटाईम एरर नको यायला... सेम इन्स्टन्स आलरेडी रनिंग...

In reply to by गवि

अहो हेच शब्द मी आत्ताच ख फ वर वापरले. Great minds think alike... or may be, fools seldom differ!

In reply to by मुक्त विहारि

काय गडबड आहे रे मुलांनो !! किती छळाल एखाद्याला !! शोभतं का तुम्हाला हे? चला जा अभ्यास करा नीट क्लास आणि इनहेरीटन्सचा...

In reply to by सुबोध खरे

वैचारिक मतभेद करणे जमले नाही की, काही माणसे वैयक्तीक पातळीवर उतरतातच...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाय द वे, सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय रूपया, यांच्यातील विनिमय दर काय आहे?

In reply to by मुक्त विहारि

+१ ह्या करता की डॉ. साहेबही वयक्तिक टीका करतात. ज्यांचे घर काचेचे असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत मुवीकाकाका जानी.

In reply to by मुक्त विहारि

मग?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हाच न्याय सर टोबीनाही लागू होऊ शकतो.
थोडा फरक आहे! वादासाठी डॉ. खरे मोदीभक्त आहेत आणि सर टोबी नेहरु गांधी परिवाराचे गुलाम आहेत असे गृहीत धरू. देव भक्ताला पावला नाही तर भक्त त्याला शिव्या देतो. नास्तिक बनू शकतो. उद्या अपेक्षाभंग झाल्यावर डॉ.खरे मोदींना शिव्या शाप देतील. पण सच्चा गुलाम तसे करणार नाही. तो कटप्पा सारखा महिष्मतीच्या राजा राणीप्रति आजन्म निष्ठावान रहातो. सर टोबींचे तसेच आहे!! ते नेहरूंनंतर त्याच्या पोरीची मग तीच्या पोराची मग त्याच्या बायकोची मग तीच्या पोराची पिढ्यानपिढ्या इमानाने गुलामी करताना दिसतात. त्या नालायक लोकांनी कितीहि मूर्खपणा केला तरी ते गुलामीची घेतलेली शपथ मोडत नाहीत. उद्या रेहानसाठी वेळ आली तर अमरेंद्र बाहुबली सारख्या भल्या राजपुत्राच्या पाठीत तलवार खुपसून त्याचा मुडदा पण पाडतील. पण वैचारिक गुलामी शेवटपर्यंत सोडणार नाहीत!!! कृ.ह.घ्या. :-) .

अ बा आणि आग्या यांचे अपापसातले प्रतिसाद पाहून इतकच म्हणतो .. अहो रूपं अहो ध्वनि

In reply to by अमर विश्वास

अहो रूपं अहो ध्वनि
सहमत. पण त्यांना या अवतरणाचा मतितार्थ काय कळणार आहे? त्यांना कळला तर ते हे पूर्ण अवतरण इथे लिहितील, पाहू. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by कांदा लिंबू

पण त्यांना या अवतरणाचा मतितार्थ काय कळणार आहे? लय मजा येते मला बुक्कीने कांदा फोडायला. अंगेन गात्रं नयनेन वक्त्रं, न्यायेन राज्यं लवxन भोज्यम्॥ ह्या श्लोकाचा अर्थ उच्चारासहित विगुंना विचारला होता का?