मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.

सरनौबत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
.

वाचने 4837 वाचनखूण प्रतिक्रिया 20

वामन देशमुख 13/01/2024 - 16:34
एकाकी बिंदूने सजलेला हा अभ्यासपूर्ण लेख, विरामचिन्हांच्या सीमा ओलांडून बौद्धिक शोधाचा लेखपट बनतो. तो आपल्याला शैक्षणिक संवादाच्या मूलतत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतो. एक बिंदू खरोखर हजार शब्दांपेक्षा शक्तिशाली असू शकतो असा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून, प्रिय वाचकहो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला विद्वान साहित्याच्या विशाल विस्तारामध्ये असाच एखादा एकाकी बिंदू आढळेल तेव्हा तो केवळ विरामचिन्ह म्हणून नाकारू नका. त्याऐवजी, त्यामागे लपलेल्या गहन रहस्यांच्या शोधासाठी कालातीत प्रवास सुरू करा.

सरनौबत 14/01/2024 - 11:51
अनेक महिन्यांनी मिपावर लेख डकवताना काहीतरी गडबड झाली आणि नुसते टिम्ब पडले. मात्र ह्या वरील प्रतिक्रिया वाचताना हसून हसून पुरेवाट झाली आणि गेला बाजार परत एकदा मिपाकरांचे सखोल ज्ञान समजले. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ प्रमाणे अणूरेणूच्या लेखावर आकाशाएवढ्या प्रतिक्रिया केवळ मिपाकर देऊ जाणे

In reply to by मुक्त विहारि

सरनौबत 14/01/2024 - 13:08
मुक्त विहारी: भोगी आणि संक्रात आहे त्यामुळे हे दोन टिम्ब मी तीळगुळातले तीळ ह्या अर्थी स्वीकारतो

In reply to by सरनौबत

इकडून तिकडून, आपण टिंबच असतो... बॉस पुढे पण, टिंबच.. आणि घरी पण टिंबच... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, "पुरुषांचा प्रवास हा, टिंबा पासून टिंबा कडे.. आणि जाता जाता प्रवासात, भेटतील तितकी टिंबे गोळा करत जायची आणि वेळ प्रसंगी देत रहायची..."

नठ्यारा 20/01/2024 - 02:33
मी वर टाकलेला प्रतिसाद https://www.misalpav.com/comment/1174232#comment-1174232 व विषय पूर्णपणे कोरे आहेत. कोणास काही दिसले का त्यात? -ना.न.