Skip to main content

९९ वर्ष्यानंतर

लेखक आंद्रे वडापाव यांनी बुधवार, 17/05/2023 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार) आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार).. तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%) तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली. ९९ वर्ष्यानंतर ऍसेट् हिं = ५७० रु ऍसेट्स मु = १५७ रु ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील. बाकी तुमचं चालू द्यात... National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml ##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32700
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

२१ आणि १९ मधील आणि +१ आणि - १ यातील गुणोत्तर यात जबरदस्त फरक पडत जातो.

In reply to by आंद्रे वडापाव

मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

१.९% व २.४% हे वार्षिक वृद्धीदर आहेत की दशवार्षिक? म्हणजे १ वर्षानंतर १०० चे १०१.९० होणार की १० वर्षांनंतर १०९ चे १०१.९० होणार?

In reply to by आंद्रे वडापाव

माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%2…. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-acr…

In reply to by कॉमी

हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-hig… पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.