पंचायत - २
लेखनप्रकार
टीप : पंचायत सीजन १ पहिला नसल्यास पुढे वाचू नये. सीजन दोन चे रसभंग इथे नाही दिले आहेत. त्यामुळे तो पहिला नसल्यास सुद्धा तुम्ही वाचू शकता.
गावच्या गजाली म्हणून मी एक लेखमाला इथे लिहिली होती. ग्रामीण भागांतील सर्वसाधारण जीवन आणि त्यातील सध्या सध्या गोष्टींतील मनोरंजन हि त्याची पार्शवभूमी होती. ऍमेझॉन च्या पंचायत ह्या सिरीज चे कथानक सुद्धा तेच आहे. त्यामुळे मला ती आवडणे अतिशय अपेक्षित होते. पण सर्वानाच हि सिरीज अत्यंत आवडली आहे.
ह्या सिरीज मध्ये काहीही वॊक पणा नाही. नेहमीच्या बॉलिवूड मध्ये जसे तोंडी लावायला सेक्युलॅरिसम किंवा इतर काही अजेंडे नाचवले जातायत तसले काहीही नाही. कुठलाही विवादास्पद मुद्दा नाही. शिवीगाळ नाही आणि सेक्स नाही. कुठेही सिरीज कसलाही प्रचार किंवा तुम्हाला काहीही शिकवायला जात नाही. एकदा इच्छा नसून सुद्धा मला एका घरी सत्यनारायणाला जावे लागले. तिथे यजमान वहिनींनी स्वतः सपाद (प्रसादाचा शिरा) केला होता. तो मला इतका प्रचंड आवडला कि मी थक्क झाले. नंतर अमेरिकेतून मी कधी गावी गेले कि वाहिनी मुद्दाम माझ्यासाठी तो सपाद करून आणायच्या. प्रत्येक वेळी तो शिरा मला इतका सात्विक आणि निर्भेळ आनंद द्यायचा जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्याची चव कि वाहिनीचे ते प्रेम ह्यांनी माझ्यावर गारुड केले होते ठाऊक नाही. पंचायत सिरीज त्याच प्रकारची आहे. सध्या सोप्या मनोरंजनात मनाला स्पर्श करणारे काही तरी आहे.
जितेंद्र कुमार, ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव , नीना गुप्ता सारखे अत्यंत उत्कृष्ट अभिनेते ह्यांत आहेतच पण ज्या कुणी कास्टिंग इथे केले आहे त्याला माझा साक्षात दंडवत. पंचायत सहायक विकास, उप प्रधान प्रल्हाद पांडे किंवा बनराक्षस सारखी जी काही पात्रे इथे उभी केली आहेत त्याला तोड नाही. कुठलेही पात्र हे ओढून ताणून केलेले वाटत नाही. असली माणसे माझ्या गांवात होती हीच भावना पाहताना मनात येत राहते.
गांवातील माणसे छोटी, कमी महत्वकांक्षा असलेली आणि थोडी सरळ वळणाची असतात असे अनेकांना वाटते आणि ते खरे सुद्धा आहे. पण ह्याचा अर्थ त्या माणसांच्या भावना, स्वप्ने खोटी ठरत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी गुपचूप मस्त पैकी थंड बियर झाडाच्या खाली बसून पिणे हि त्यांची पार्टीची संकल्पना कमी खर्चिक असली तरी त्यातून होणारे बॉण्डिंग हे इतर कुठल्याही मैत्रीपेक्षा कमी असत नाही. आपल्याही दारांत संडास असावा असे स्वप्न गांवातील एखाद्या मजुराचे असते. तो निर्माण झाला कि त्याच्या चेहेऱ्यावर जो अभिमान, जी तृप्ती येते त्याला विनोदाची झालर असली तरी कुठे तरी प्रेक्षक म्हणून आम्हाला ती भावना समजते. गांवातील भांडणे हि प्रेक्षक म्हणून आम्हाला साधी आणि विनोदी वाटली तरी त्या लोकांसाठी ती खरीखुरी आणि मोठी असतात. बिग बजेट चित्रपटात जे खलनायक असतात त्या प्रमाणे येथील खलनायक हे मोठे लार्जर देन लाईफ नाहीत. पण गांवावरील संकटांत त्यांची सुद्धा माणुसकी स्पष्ट दिसते.
सत्यजित रे ह्यांच्या पाथेर पांचालीवर तत्कालीन बॉलिवूड मंडळींनी "गरिबीचे उदात्तीकरण" असा आरोप केला होता पण प्रत्यक्षांत त्या चित्रपटानं गरिबी असली तरी चित्रपटाचे मूळ कथानक हे अत्यंत सर्वसामान्य असे होते. गरिबीपेक्षा सामान्य माणसाचे जीवन, त्याची अशा आणि त्याचे बदलते जीवन ह्याचे सुरेख चित्रण होते. गरिबी हि निव्वळ योगायोग होता. त्यामुळे आज सुद्धा पाथेर पांचाली पहावासा वाटतो. अपू आणि त्याची बहीण शेतांतून पळत जातात आणि त्यांना आगगाडी पाहायची असते. त्यांची ती हौस आणि मी गाडी चालवत असताना बाजूने गुगल ची वॉयमो गेली कि तिला पाहायची माझी हौस हि एकाच भावना आहे. त्यांत उणे दुणे नाही. त्याच प्रमाणे पंचायत मधील माणसे, त्यांच्या समस्या, त्याच्या भावना, काळाप्रमाणे एकमेकांत वाढणारी त्यांची भावनिक गुंतवणूक ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या "ग्रामीण" वाटल्या तरी ग्रामीण असणे हा निव्वळ योगायोग आहे. त्या भावनांना आपण कुणीही समजू शकतो.
सीजन २ च्या निमित्ताने फुलोरा गांवाची सैर पुन्हा एकदा घडून येते. सीजन १ मध्ये रिंकी दाखवली नव्हती जी आता जास्त दिसून येते. काही पात्रें जसे उप प्रधान प्रल्हाद वगैरे मंडळी मंडळी जास्त दिसून येतात. माननीय आमदार नावाचे सुद्धा प्रकरण दिसून येते. प्रधान आणि सचिव दोन्ही लोकांतील मैत्री जास्त वाढते आणि ती ठळक पणे दिसून येते. शेवटच्या भागांत एक अशी घटना दाखवली आहे ती हृदय हेलावून टाकते (अनपेक्षित पणे).
सीजन ३ यावा अशी मनापासून अपेक्षा आणि ऍमेझॉन ला शुभेच्छा !
अवांतर :
मागील आठवड्यांत दुर्दैवाने भूल भुलय्या २ नावाचा अत्यंत बाष्कळ आणि निर्लज्ज चित्रपट पाहण्यात आला. असल्या भिकार चित्रपटावर कुणी कसे पैसे गुंतवू शकतो हे समजत नाही. चित्रपटाचे नायक कार्तिक तिवारी (ह्या नटाने आपले आडनावं बदलून आर्यन ठेवले आहे) हा वरून धवन इतकाच अभिनय करण्यास नालायक अभिनेता आहे. त्याचे आई वडील सुद्धा ह्या इंडस्ट्रीत नाहीत त्यामुळे ह्याला नक्की कुणी का काम दिले समजत नाही. चेहेऱ्यावरून मठ्ठ वाटतो. नटी कियारा अडवाणी हिच्यावर पोते भरून मेकअप ओतला असला तरी कुठल्याही फ्रेम मध्ये हि "ठीक" सुद्धा वाटत नाही. अभिनयाच्या बाबतीत फार तर कतरिना ला मागे टाकू शकेल. तुलनेने हिच्या आईच्या (कि काकीच्या ) रोल मध्ये असलेली तब्बू प्रत्येक फ्रेम मध्ये भाव खाऊन जाते.
राजपाल यादव आणि संजय मिश्रा ह्या दोघांनाही नेहमीप्रमाणे फक्त अपमानित करून विनोद निर्मिती केली आहे. असले फुटकळ विनोद मारायला फक्त ह्याचा "छोटे पंडित" सारखी पात्रे का लागतात समजत नाही. एके ठिकाणी तर "चलो पंडितजी आपके गोमूत्र का समय हो गया" असले विनाकारण डायलॉग आहेत. तरी सुद्धा ह्या चित्रपटातून राजपाल आणि संजय मिश्रा काढले तर चित्रपट कुली नंबर १ इतका भिकार चित्रपट बनला असता.
वाचने
7696
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
पंचायत २ ... एक नंबर मालिका
...
सहमत
In reply to सहमत by कर्नलतपस्वी
अभावितपणे झालेला भन्नाट विनोद
चुक भूल
लेख आवडला
काहीही म्हणा पंचायत १ खूप छान
छान समीक्षण...
पहिला भाग आवडला.
एक नंबर मलिका
In reply to एक नंबर मलिका by सोत्रि
एका वार्याच्या झुळूकीसारखी
In reply to एक नंबर मलिका by सोत्रि
सोत्रि
खूप सुंदर, हलकीफुल सिरिज.
In reply to खूप सुंदर, हलकीफुल सिरिज. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
रच्याकने : माझ्या मोबाईलची
In reply to खूप सुंदर, हलकीफुल सिरिज. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सौंदाळा
एक पक्षाला चांगले मतदान करावे
In reply to एक पक्षाला चांगले मतदान करावे by चौकस२१२
???
पंचायत २
धागालेखिकेचे आभार
यातिल वाहिनी शब्द खूपच खटकला
पंचायत २ आज पाहून संपवलं.