मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्ण जन्मभूमी आंदोलन

निनाद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
-इतक्यातच हे विकिवर लिहिले तोच लेख येथे पुनरुक्तीचा दोष पत्करून घेतो आहे.- कृष्ण जन्मभूमीची इतिहास कृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर हा मल्लापुरा, मथुरा, उत्तर प्रदेश, येथील हिंदू मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. हे मंदिर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. जन्माष्टमी, दिवाळी आणि होळी हे प्रमुख हिंदु सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. संपूर्ण इतिहासात मंदिरे अनेक वेळा नष्ट झाली, अगदी अलीकडे १६७० मध्ये क्रूरकर्मा औरंगजेब या मुस्लिम आक्रमकाने तिथे ईदगाह मशीद बांधली जी अजूनही उभी आहे. २०व्या शतकात, मशिदीला लागून असलेले नवीन मंदिर संकुल, केशवदेवाचे मंदिर, जन्मस्थानावरील गर्भगृह मंदिर आणि भागवत भवन असलेल्या उद्योगपतींच्या आर्थिक मदतीतून बांधले गेले. कितीवेळा नष्ट झाली तरी हिंदुं मंदिरे परिस्थिती बदलताच परत बांधली आहेत. या चिवटपणा मुळे हिंदु भारतातून नष्ट होऊ शकले नाहीत. मध्ययुगीन काळ इ.स.१०१८ मध्ये गझनीच्या महमूदने महाबनवर हल्ला करून लुटले. पण त्याला येथे हिंदुंच्या कडव्या विरोधामुळे राज्य करता आले नाही आणि पळून जावे लागले. अल उत्बीने त्याच्या तारिख-इ-यामिनी शेजारच्या पवित्र मथुरा शहराचे वर्णन केले आहे ज्याची ओळख मथुरा म्हणून आहे. त्यांनी लिहिले, "शहराच्या मध्यभागी एक मोठे आणि भव्य मंदिर होते, जे लोकांचा असा विश्वास होता की ते मनुष्यांनी बांधले नाही तर देवदूतांनी बांधले आहे. गझनीच्या महमूदने लिहिले, "जर कोणाला तितकीच इमारत बांधायची असेल, तर तो शंभर दशलक्ष दिनार खर्च केल्याशिवाय करू शकणार नाही, आणि काम दोनशे वर्षे चालेल. १६व्या शतकात दिल्लीचा क्रूर इस्लामिक सुलतान सिकंदर लोदी याने मथुरा आणि तेथील हिंदू मंदिरांचा नाश केल्याचा उल्लेख तारीख-इ-दौदीमध्ये केला आहे. पण् १६१८ मध्ये ओरछा येथील राजा वीरसिंग देवा बुंदेला यांनी तेहतीस लाख रुपये खर्चून मंदिर परत बांधले होते. फ्रेंच प्रवासी तॅव्हर्नियरने १६५० मध्ये मथुरेला भेट दिली आणि लाल वाळूच्या दगडात बांधलेल्या अष्टकोनी मंदिराचे वर्णन केले. मुघल दरबारात काम करणारा इटालियन प्रवासी निकोलाओ मानुची यांनीही मंदिराचे वर्णन केले आहे. मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशानुसार मथुराचे प्रशासक अब्दुन नबी खानाने हिंदू मंदिरांच्या अवशेषांवर जामा मशीद बांधली. याचा राग मनात असल्याने १६६९ मध्ये मथुरेतील जाट बंडाच्या वेळी हिंदूंनी अब्दुल नबी खान याला शोधून मारले गेले. औरंगजेबाने मथुरेवर हल्ला करून ते केशवदेवाचे मंदिर १६७० मध्ये उद्ध्वस्त केले आणि त्या मंदिराच्या जागी शाही ईदगाह बांधला. आधुनिक काळ १८०४ मध्ये मथुरा ब्रिटीशांच्या ताब्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने कटरा येथील जमिनीचा लिलाव केला आणि बनारसचा एक श्रीमंत राजा पटनिमल यांनी ती विकत घेतली . राजा पटनिमल यांना मंदिर बांधायचे होते पण ते करू शकले नाहीत. कटरा ही जमीन त्याच्या वंशजांना मिळाली. त्यावर मुस्लिमांनी अतिक्रमण केले होते. हे काढण्यासाठी त्यांचे वंशज राय कृष्ण दास यांना मथुरेच्या मुस्लिमांनी दोन दिवाणी खटल्यांमध्ये १३.३७ एकर जमिनीच्या मालकी हक्कासाठी आव्हान दिले होते.,अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमध्ये राज कृष्ण दास यांच्या बाजूने निर्णय दिला होता. पण ताकदीच्या बळावर स्थानिक मुस्लिमांनी अतिक्रमण काढू दिले नाही. जुगल किशोर बिर्ला यांनी श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला, ज्याची नंतर श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संस्थान म्हणून नोंदणी झाली, २१ फेब्रुवारी १९५१ रोजी आणि जमीन संपादित केली. जुगल किशोर बिर्ला यांनी नवीन मंदिराचे बांधकाम दुसरे उद्योगपती आणि परोपकारी जयदयाल दालमिया यांच्याकडे सोपवले.. ऑक्टोबर १९५३ मध्ये जमिनीचे सपाटीकरण करून मंदिर संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि फेब्रुवारी १९८२ मध्ये ते पूर्ण झाले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र विष्णू हरी दालमिया हे त्यांच्यानंतर आले आणि त्यांनी मृत्यूपर्यंत ट्रस्टवर काम केले. त्यांचे नातू अनुराग दालमिया हे ट्रस्टचे संयुक्त व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. या बांधकामाला रामनाथ गोएंका यांच्यासह इतर व्यावसायिक कुटुंबांनी निधी दिला होता. बेकायदेशीर जमीन देणगी १९६८ मध्ये, श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाह समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एक तडजोड करार झाला ज्यामध्ये ट्रस्टला मंदिराची जमीन आणि शाही ईदगाहचे व्यवस्थापन ईदगाह समितीला दिले तसेच श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघाचा कोणताही कायदेशीर दावा नाही असेही परस्पर लिहून दिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गणेश वासुदेव मावळणकर हे श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघाचे पहिले अध्यक्ष होते ज्यांनी तडजोड करारावर स्वाक्षरी केली. ट्रस्टवर विश्वस्त ते अथवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नसल्याने करारावर स्वाक्षरी करण्याचा त्यांचा कायदेशीर अधिकार वादग्रस्त आहे. असे प्रकार काँग्रेसच करू शकते! त्यांच्यानंतर एमए अय्यंगार , त्यानंतर अखंडानंद सरस्वती आणि रामदेव महाराज आले. नृत्यगोपालदास हे विद्यमान अध्यक्ष आहेत. पण आता या प्रकरणाने वेग घेतल्यावर येथील मंदिरे परत त्याच वैभवास प्राप्त होतील का यावर चर्चा करण्यासाठी या लेखाचे प्रयोजन. (घाईत लिहिल्याने झालेल्या चुका माफ कराव्यात अशी विनंती)

वाचने 5776 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by कंजूस

सुरिया 13/03/2022 - 17:21
हो ना, तसेही प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन अ‍ॅक्ट १९९१ म्हणजेच उपासना स्थळ विशेष अधिनियम १९९१ ह्या संसदेत पारित झालेल्या अ‍ॅक्टान्वये स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट १९४७ ची स्थिती कायम ठेवावी म्हणते. ह्या कायद्यातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमीला वगळण्यात आलेले आहे. राज्यात लागू होणार्‍या कायद्याला तेथील विधानसभेने मान्यता दिली पाहिजे. लोकसभेत भाजपाचे सरकार, उत्त्र प्रदेश विधानसभेतही भाजपा नुकतेच पुनःश्च विराजमान आहे तेंव्हा ह्या डबल इंजिनाला कायदे बदलण्यात काही प्रॉब्लेम नसावा. तेंव्हा तसेही लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने संबधित पूजास्थलाचे काही रुपांतरण करावयाचे असल्यास चांगलेच आहे की.

In reply to by सुरिया

आनन्दा 14/03/2022 - 09:08
मुळात धागाकर्त्याचे असे म्हणणे आहे की ही जमीन कायदेशीर रीत्या हिंदूंचाच मालकीची आहे. मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे. म्हणजे जो करार 1968 साली झाला त्याच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. आणि जर फास्ट ट्रॅक खटला चालला तर योगीच्या काळात कृष्णजन्मभूमी मुक्त पण होऊ शकते.. काय हा दैवदुर्विलास.. बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे..

In reply to by आनन्दा

आता, ही एक प्रकारे, हिंदूंची परिक्षाच आहे... तेंव्हा, त्याचे वडील जबाबदारी घेऊन वागले आता जबाबदारी, हिंदूंनी घ्यायला पाहिजे.... कृष्णाची साथ आहेच. एकजूट असेल तर, पर्वत देखील उचलल्या जातो... पण, खोडा घालणार ते उदारमतवादी हिंदूच ...

In reply to by आनन्दा

सुरिया 14/03/2022 - 14:41
कराराच्या वैधतेला आव्हान देणे हे योग्यच आहे, त्यासंबधित न्यायालय फास्ट ट्रॅक चालवून जो काही निर्णय देते तेही मानणे प्राप्यच आहे पण आपणच म्हणताय प्रतिसादात की कृष्णजन्मस्थान मुक्त करणे आवश्यक आहे तेंव्हा मला एक सांगा सध्या जे मंदीर आहे ते कुणाच्या ताब्यात आहे? जी जागा कृष्णजन्मस्थान म्हणून संबोधिली जाते ती कुणाच्या ताब्यात आहे? सध्या जो इदगाह आहे तो मंदीराला लागूनच आहे आणि ती जागा मावळंकराच्या अखत्यारीत इदगाहला दिली असेल तर त्या स्थानी त्यावेळी काय होते? कॄष्णजन्मासंबंधित काही जागा त्या दर्ग्याला दिलेली आहे का? तसे काही असले तर ह्या लढ्याला आपण कृष्णजन्मस्थानमुक्ती म्हणू शकतो अन्यथा हा एक दिवाणी दावा आहे आणि इदगाह किंवा ट्रस्टची जी काही कायदेशीर पूर्तता असेल त्यानुसार न्यायालय निवाडा देण्यास सक्षम आहेच. ह्या सर्व विवादात "मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे." अशा विधानांना कायदा, पोलीस अशा भाषेत उत्तर देता येतेच आणि "बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे" अशी भावनिक आवाहने करुन आपण काय साध्य करु इच्छिता आहात?

In reply to by सुरिया

आनन्दा 15/03/2022 - 08:41
लेख पूर्ण वाचलात तर तुम्हाला मी काय म्हणालो ते कळेल. एकदा वाचून नाही कळले तर लेख परत वाचा. मी वरती लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला लेखाचा आधार आहे. नसेल समजत, तर तुमच्या पुरोगामी अजेंड्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, तुमच्या भावना कशाला दुखावल्या जातायत?

In reply to by कंजूस

निनाद 14/03/2022 - 08:35
आशावादी रहा! येईल ना परत. जर हिंदू आपले मंदिर तोडणार्‍याला शोधून मारू शकतात. ते नाही जमले तर पाचशे वर्षांनी तरी परत मिळवतात मग हे का नाही होणार? आपली विचार धारा या डाव्यांनी पोचट केली आहे. ती कणखर केली पाहिजे.

चौथा कोनाडा 14/03/2022 - 11:57

आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ न करता कृष्ण जन्मभूमी मुक्त झाली तर जास्त आनंद होईल ! KDTFGh

In reply to by चौथा कोनाडा

खरं तर, अशा गोष्टी सामंजस्यानेच व्हायला हव्यात. पण, एकूण इतिहास बघता, सामंजस्याने सर्वमान्य तोडगा निघणे, कठीण वाटते...

sunil kachure 14/03/2022 - 14:35
जे भगवान श्री कृष्णाचे भक्त आहेत त्यांची आर्थिक ,सामाजिक स्थिती सुधारेल का? हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबूत करायची योजना आणा. यूपी मधील २५, करोड जनता कृष्ण मंदिराचे बघतील

sunil kachure 14/03/2022 - 14:48
आणि त्या वरील अतिक्रमण हा यूपी सरकार चा प्रश्न आहे योगी सरकार तिथे बहुमत मध्ये आहे ते योगी हा प्रश्न सोडवतील. महाराष्ट्र किंवा बाकी राज्याचा काय संबंध. त्यांचे बेरोजगार लोक पण सांभाळा आणि . आणि त्यांच्या अडचणी पण स्वतःच्या डोक्यावर घ्या. हा मूर्ख पना आहे ह्या असल्या फालतू विषयात दक्षिण भारत पडत पण नाही महाराष्ट्रातील काहीच लोकांस खूप चरबी आहे. त्यांनी यूपी मध्ये जावून स्वतःचे बलिदान द्यावे.