मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारखानिसांची वारी

देशपांडे विनायक · · जनातलं, मनातलं
  मला हा सिनेमा आवडला याचे कारण या सिनेमात एक वाक्य आहे. हे वाक्य ऐकून ४८ वर्षापुर्वी मला मिळालेला सल्ला  आठवला. सल्ला न मागता मिळालेला नव्हता त्यामुळे न ऐकण्याचे कारण नव्हते. मी तो अमलात आणला आणि सुखी झालो.        त्या काळी कुटुंब नियोजनावर खूप चर्चा होत असे. फॅमिली प्लॅनींग बद्दल कुतूहल होते. कॉपर टी बद्दल ,मी कटिंग ला गेलेल्या सलून मधे चाललेली चर्चा ऐकणे अशक्य झाल्याने ती थांबवण्याची विनंती करावी लागली. '' त्या '' साधनाबद्दल समजून घेणे सभ्येतेला सोडणे समजले जात होते. अशा परिस्थितीत माझे लग्न ठरले. आणि फ्यामिली प्लॅनींग ची जाहिरात बघून आता आपली वेळ आली असे वाटले. [" काही पुस्तके" वाचून झाली होती. बेळगाव मधून प्रसिद्ध होणारे यलो लिटरेचल डोळ्याखालून गेले होते. परंतु हे सारे फ्यामिली प्लॅनींग समजण्यास उपयोगी नाही हे समजत होते. ] आणि मी आमच्या फ्यामिली डॉक्टकडे गेलो. त्यांना सांगितले मला तुमच्याशी बोलावयाचे आहे. माझा चेहरा पाहून ते म्हणाले दवाखाना बंद होण्याच्या वेळेला ये.     मी गेलो आणि दहा एक मिनिटात सगळे पेशंट गेलेले पाहिले . पण या दहा मिनिटात डॉक्टरांशी कसे बोलायचे याचे टेन्शन अनुभवले. आधार एका वाक्याचा होता '' डॉक्टरपासून काही लपवून ठेऊ नये. " केबिन मधे गेल्यावर आमच्या फ्यामिलीबद्दल त्यांनी थोडी चौकशी केली आणि डोळ्यांनी मी आता बोलावे असे सुचवले. नाटकात पहिल्यांदा काम करणारा ,नर्व्हस असणारा नट कधी एकदा डायलॉग म्हणून टाकतो आणि यातून सुटतो या विचारात असतो. मी त्याच विचाराने पटकन सांगितले " माझे लग्न तीन महिन्यांनी आहे आणि मला फ्यामिली प्लॅनींगची माहिती हवी आहे . "डॉक्टरांनी कौतुकाने माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले योग्य वेळी आलास. ते म्हणाले नीट समजून घे. फ्यामिली प्लॅनींग याचा संबंध फक्त मुले होण्याशी संबंधित नाही. आपल्याला कशा प्रकारचे जीवन  जगावयाचे आहे त्याबद्दल आहे. मुले कधी जल्माला घालावयाची, किती मुले असली पाहिजेत हा त्याचा एक भाग आहे. आणि सर्वात महत्वाचे सध्या चाललेली चर्चा मुले न होण्याबद्दल आहे. त्या करिता वापराव्या लागणाऱ्या साधनाबद्दल आहे. परंतु मूल होण्याबद्दल हमखास उपाय नाही हे लक्षात घेऊन निर्णय घेणे योग्य ठरेल.     सिनेमा बद्दल आणखी काही लिहिण्याचे मला ज्ञान नाही. माझे  सिनेमा आणि गाणे यांचे वर्गिकरण फार सोपे आहे. मला सिनेमा आवडतो किंव्हा आवडत नाही. हा सिनेमा मला आवडला. 

वाचने 2785 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान किस्सा लिहिलेला आहे. सिनेमाच्या चर्चेत ऐकलं होतं " प्रत्येक सामान्य माणसाला या सिनेमाच्या कथेशी, पात्रांशी रिलेट करता येइल" आणि हेच या सिनेमाच्या यशाचं गमक आहे. https://youtu.be/v1uh3Kh6MgM या सिनेमाच्या दिगदर्शकाची लेथ जोशी ही कलाकृती मी पहिली होती आणि हा सिनेमा बेहद्द आवडला होता ! सिनेमाच्या फ्रेम अन् फ्रेम च्या मी प्रेमात पडलो होतो, लेथ जोशी या मुख्य पात्राचा मुखदुर्बळ पणा प्रचंड प्रभावित करून गेला होता. अभिनेता चित्तरंजन गिरी याने या पात्राला जबरी न्याय दिला होता. या पार्श्वभूमीवर मला वरी पहायचाच होता, पण अर्रर... एका आठवड्यातच थिएटर्स मधून गायब झाला (पुण्यात) आता *वरचा मंच"वर पाहणं होईल असं काही वाटत नाही !