Skip to main content

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर आफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली. विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलयं म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले. ‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागातील घरी पोहोचलो. पत्निने आल्या आल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून, ‘ओ आय सी’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’ कानडीतून प्रयोग ‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला. आविर्भावावरून बॉस, 'हा काय फालतूपणा चालवलाय?' म्हणत असावेत. पण पत्नीच्या आग्रहाखातर गप्प बसून तो (मी) सांगतोय ते करायला काय हरकत आहे? असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे असावे. शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’. ‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’ ‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले. सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते! मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निर्वाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत.अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्या फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला. त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले. शेवटी डेंटिस्टच झाला! असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. किस्सा होता मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या तेंव्हा कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (मी तिसऱ्यांदा श्रीनगरच्या पोस्टींगला असताना ते कारगीलच्या युद्धाच्या प्रसंगी 15 कोअरचे कमांडर होते. २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी पुण्यात पुन्हा संपर्क आला!) एकदा आम्ही त्यांच्या गुपकार रोड वरील बंगलेवजा घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्यांची पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे त्या फार खट्टू झाल्या होत्या, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो. ..... प्रचिती द्या तर मानू.... आणखी एक घरगुती किस्सा... पुढे कधीतरी सादर करेन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22594
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

पल्यांचेट, सुंदर मुली ह्याचबरोबर हवाई दलाबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, हवाई दलाने बजावलेल्या विविध युद्ध आणि इतर परिस्थितीमध्ये - उदा. पूरसदृश्य स्थिती वगैरे - बजावलेली कामगिरी ह्याबद्दल वाचायला अधिक आवडेल. अशावेळी तुमचेही योगदान असेल, त्याबद्दल वाचायलाही आवडेल.

In reply to by यशोधरा

सहमत आहे. ओककाकांनी असले काही पाचकळ लिहीत बसण्यापेक्षा त्यांचे हवाईदळातील युद्धविषयक किंवा तत्सम अनुभव लिहावेत. वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by टवाळ कार्टा

.....प्राचीन भारतीय तंत्रविद्येबद्दल-----
तथाकथित तंत्रविद्या 'प्राचीन भारतीय' असल्या बद्दल कोण कोणते संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत , ते कृ. सादर करावेत आ. न. माहितगार

In reply to by प्रचेतस

पाचकळ
ठार निषेध ! दुत्त दुत्त ! पुढल्यावेळेस प्लँचेटाकरुन दर्पणसुंद्री ची मुर्ती बनवताना जिला मॉडेल म्हणुन उभी केलेली तिला बोलवुन तिच्याकरवी तुमचा णिशेध करण्यात येईल !

धाग्याचे नाव वाचून कदाचित काहीतरी चांगलं वाचायला मिळू शकेल अशा हेतूने धागा उघडला होता. मात्र दुर्दैवाने या धाग्यातही धागा लेखकांनी आपल्या ख्यातीला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. धाग्याचं शिर्षक काय आणि आपण त्यात लिहीतोय काय याचे धागा लेखकांस मुळीच भान राहिलेलं नाही. :(

In reply to by सतिश गावडे

मंत्रालयात एवढे शिर्षक वाचून उघडावे आणि उंदीर मारल्याची बातमी वाचावयास मिळावी असे होते कधी कधी ;) धिस टाईम हार्ड लक, बेस्ट लक पुढच्यावेळी :))

In reply to by सतिश गावडे

"
काहीतरी चांगलं वाचायला मिळू शकेल
" ... "
धाग्याचं शिर्षक काय आणि आपण त्यात लिहीतोय काय
" मित्रा, हवाईदलातील पोस्टींग्ज मधील आठवणीत राहिलेल्या घटना वेळ मिळेल तसे लिहित असतो. त्यातील श्रीनगरच्या पोस्टींग मधील काही संक्षिप्त भाग सादर केला आहे. तो आपल्याला असंबद्ध वाटला... कदाचित पूर्ण लेखन सलग वाचायला शक्य झाले तर ते असंबद्ध वाटणार नाही... हवाईदलातील रेल्वे प्रवासातील किस्से, आणि दरवाजा तोंडावर बंद झाला..., Cpl Pandey GS..., वगैरे कथाभाग तुकडे यातील आहेत..

In reply to by सतिश गावडे

+१ "गानकोकिळेला चटणी वाटताना बघण्यात काय हशील?" असं काहीसं पुल म्हणाले होते. त्याची आठवण झाली.

सुंदर मुली नाहीत कसं काय? मिस वल्ड/युनिवस इत्यादी स्पर्धेसाठी येणाय्रा बय्राच स्पर्धक सेनाविभागातल्या कर्मचाय्रांच्या मुलीच असतात. तुमच्या पोस्टिंग जागेचं ब्याडलक.

In reply to by कंजूस

फिल्म जगतात चमकतात... फरीदाबादला माझ्या मुलाच्या केंद्रिय विद्यालयात शिकणारी सुश्मिता सेन, माझे पहिले इन्स्ट्रक्टरांची तेंव्हा जन्मलेली मुलगी, आएशा जुल्का, तर दुसर्‍या एका सरदारांच्या जुळ्या मुली झाल्या महाभारत सिरीयल मधे कलाकार. याच श्रीनगरच्या पोस्टींगच्या पुढील कथनातून येथे ती स्क्वाड्रन लीडर अमरीक सिंगांची चुलबुली मुलगी. ती व मी गुलमर्गच्या गंडोल्यात एकत्र बसताना मस्त वाटले. तीच पुढे 'नूरी' सिनेमात काश्मिरी तरुणीच्या रोल मधे 'पुनम धिलौं' म्हणून श्रीनगरच्या लालचौकातील पॅलाडियम थिएटरमध्ये बसून पाहताना मजा वाटली... असो... वो किस्सा फिर कभी...

नमस्कार, पकाकाका आणि त्यांच्या स्वर्गवाशी मित्रांनी जे केले नाही ते इतरांना परस्पर भरीला घालायला आवाहन करताना मजा वाटली. तोंड देखले नाडी केंद्रांमध्ये गेलो म्हणायला जातात पण पट्टी शोधून त्यावर लिहिलेली नावे व अन्य माहिती मिळवली होती का यावर उत्तर देताना दिसत नाहीत. 1) https://shashioak.weebly.com 2) https://play.google.com/store/apps/details?id=naadi.project.com.rationalist blockquote>हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल काही लिहीत नाहीत का? या धाग्यावर तो विषय नाही. पण विचारले म्हणून वरील लिंकवरून काम काय सुरू आहे ते कळेल.

In reply to by Ram ram

प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे.
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे.
१. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव २. परदेशातील एक दाखला ३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी 4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला! 5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला! 6. भारतीयांचे अनुभव 7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार 8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग 9. प्लँचेटवर खरोखर कोण येते? 10. काल्पनिक भूत देहधारी बनले! 11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग 12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग 13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते. प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे. * Ref. Journal of the Society for Psychical research 1966, 4the** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3