Skip to main content

आता, 'न्याय' ही संतापला..!

आता, 'न्याय' ही संतापला..!

Published on 11/12/2017 - 16:35 प्रकाशित मुखपृष्ठ
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीप्रधान देशात विचारवंतावर हल्ले केले जातात, कलाकारांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे देशाची प्रतिमा मालिन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दाभोळकर -पानसरे प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेत असलेली संतापाची भावना न्यायालयाने मांडल्याने आता, 'न्याय' ही संतापला..! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा हा संताप आजचाचं नाही. यापूर्वीही न्यायालयाने अनेकवेळा तपासयंत्रणांना धारेवर धरले आहे. सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं..दाभोळकर नंतर पानसरे त्यांच्यानंतर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी तर आता सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. एकाच 'मोडस ऑपरेन्डीने' प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, सीबीआय, सीआयडी सारख्या नामवंत तपास यंत्रणांनाही या प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. त्यामुळे यावर न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा संताप व्यक्त होणे सहाजिकच.. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी चळवळीचे आधारवड डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन तपासाला लागल्याचे वरकरणी दिसले, परंतु पोलिसी तपासाची ढिसाळ कार्यपद्धती पदोपदी समोर येत राहिली. सुरवातीचा काही काळ प्राथमिक तपासात गेला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी ‘प्लँचेट’ चा वापर करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला. २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांवर डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयात नागोरीने एटीएसवर गुन्हा काबुल करण्यासाठी २५ लाखाची ऑफर दिल्याचा आरोप केला. ९ मे २०१४ ला दाभोळकर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. तीन वर्षानंतर म्हणजे १० जून २०१६ ला सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतेले. फरार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवत तावडेला मुख्य आरोपी करून ७ सप्टेंबर २०१६ ला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु आजून आरोप निश्चित झालेले नाही. संशयित अटक झालेले नाही. लंडन वरून येणाऱ्या बॅलेस्टिक अहवालाचा घोळ सुरूच आहे. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला. याही प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली. सुरवातीला कोल्हापूर एटीएस आणि नंतर सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. दाभोळकर प्रकरणातील आरोपींशी पानसरे हत्याप्रकरणाचे धागे दोरे आढळले. समीर गायकवाडला हत्येच्या ८ महिन्यानंतर अटक झाली. बॅलिस्टिक अहवाल अगोदर स्कॉटलंड यार्ड कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले, नंतर त्याला परवानगीच नसल्याचे समोर आले. मुंबई आणि गुजरातच्या लॅबमधून बॅलेस्टिक अहवाल मागविण्यात आला. मात्र त्यात पराकोटीची विसंगती आढळून आली. तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपांतर दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..! दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास रेंगाळला. परंतु, बंदुकीच्या गोळीने विचार संपविन्याचे सत्र मात्र थांबले नाही. कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांनाही समाजकंटकांनी गोळ्या घातल्या. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही त्याच पद्धतीने हत्या झाली. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. चार वर्षात प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. म्हणूनच न्यायालयाने यावरून तपास यंत्रणांना धारेवर धरले. विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. बंदुकीच्या गोळीने विचार संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तीला नेहमीच कठोर प्रतिउत्तर दिल्या गेले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या निधनानंतरही चळवळ थांबली नाही, उलट ती फोफावते आहे. परंतु तरीसुद्धा माणुसकीचा प्रकाश देणाऱ्या या 'पणत्या' विझवण्याचे कुकर्म कुणाचे ? याचा शोध लागणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या ताशेऱ्यांना गांभीर्याने घेऊन तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे. न्यायालयाने व्यक्त केलेला संताप लोकांनाही रस्त्यावर मांडला तर, परिस्थती हाताबाहेर जाईल याची जाण तपास यंत्रणा आणि सरकारने ठेवायला हवी..!!!
लेखनप्रकार

याद्या 16206
प्रतिक्रिया 89

अधिवक्ते हरिदास उंबरकर, हिंदू दहशतवादाच्या भाकड आरोपांखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना ९ वर्षं तुरुंगात डांबून ठेवलं होतं. याच भारतद्रोही शक्ती दाभोलकरादिंच्या हत्यांच्या तपासांत अडथळे उत्पन्न करत आहेत. या प्रकरणांशी सनातन संस्थेचा काडीमात्र संबंध नसतांना डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांना अटक करण्यांत आली. गायकवाड यांना जमीन मिळाला पण डॉक्टर तावडे आरोपांविना आजूनही तुरुंगात आहेत. निरपराध्यांच्या या अटकांची संगती कशी लावायची? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सनतान संस्था किंव्हा अन्य कोणत्याच् संस्थेवर आरोप नाही.. तपास यंत्रणा तपासात कमी पड़त असल्याच वैषम्य आहे.. गायकवाड़ यांना जामिन मिळाला आहे.. तावड़े यांचा सुद्धा जामिन होईल अशी शक्यता दिसतेय.. अर्थात न्यायालय जामिन देते म्हणजे पुरावे नसनार म्हणुन च ना..माझा तो मुद्दा मुळीच नाही..प्रश्न फ़क्त इतकाच Who Killed Dabholkar??

तुम्हाला काय वाटतय? तपास यंत्रणा खरच काम करीत नाहीत? की त्यांना करु दिले जात नाही? या हत्या ज्या काळात झाल्या त्या काळात कोणता मेंदु कार्यरत होता? झारीतील शुक्राचार्य कोण झालेत? असे काय गुपीत आहे की जे सापडत नाही, माहित नाही? खरच गुपित आहे का नुसते साप साप म्हणुन भुई धोपटणे? तपास यंत्रणेपेक्षा सक्षम खुनी असतील तर मग आपण फुकटे का पोसायचे? कलबुर्गी आणि लंकेश तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात पानसरे आणि दाभोळकर, मग दोन तपास यंत्रणा खरच अकार्यक्षम आहेत का? थोडा वेळ समजुया की यात हिंदु संघटनांचा हात आहे. आजवर याबाबत काय पुरावा पोलिसांनी न्यायालयाला दिलाय? पुरावा दिला तर त्यावर न्यायालय काही आदेश न देता पोलिसांवर का राग काढतय? जर आपण म्हणता मेंदु माहित आहे, ते कोणत्या आधारावर? न्यायालयात कसे सिध्द करणार? मेंदुवर कशी कार्यवाही करावी? याप्रकारानेच, अतिरेकीपणाने सर्व सामान्य सरळ हिंदु कट्टर होत चाललाय.....

In reply to by जानु

तेच तर.. नेमके काय कारण आहे.. का लागत नाही तपास? कुणी करू देत नाही की काय? नेमकं काय सुरु आहे हेच माझेही प्रश्न आहेत.

ह्यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ताहिर हुसेन नावाच्या माणसाला अटक केली आहे. आता ताहिर हुसेन हा सनातन चा कार्यकर्ता होता असा शोध अडव्होकेट साहेबांनी लावला नाही म्हणजे मिळवलं........

In reply to by समीर वैद्य

समीर वैद्य जी, गैरसमज नको.. मी कुठेच् कोणतीच संस्था म्हटलेली नाही.. आरोप ही नाही.. फ़क्त आरोपी का सापडत नाही.. हा कोर्टाने उपस्थित केलेला प्रश्न थोडासा विश्लेषित करण्याचा प्रयत्न केला आहे.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

समस्त सरकारांनी हत्येच्या दोन तासातच ह्या विचारसरणीच्या लोकांनी खून केला असे जाहीर केले अन तपास यंत्रणेवर तशाच अँगलनं तपास करायचा बोजा वाढला. मीडिया किंवा खून झालेल्यांच्या संबंधितांनी तपासाची दिशा सनातन संस्थेकडे वळवली. त्यामुळं इतर बाबी निसटल्या अन मारेकरी कुठच्या कुठं निघून गेले. तपास निष्पक्ष झाला नाही हेच तपास निष्फळ ठरल्याचे मुख्य कारण.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मुद्दा पटन्यासारखा वाटतो.. तपास यंत्रनेवर दबाव आल्याने कदाचित त्यांची दिशा भरकटली असेल. वरिष्ठ आणि मिडियाचा प्रचंड दबाव, यात तपास अधिकारी यांना योग्य त्या पद्धतीने सर्व बाजू हाताळत्या आल्या नसतील. पण सिबिआय, सीआइडी, स्पेशल पथक यासारख्या नामवंत तपास संस्था असताना एक साधा दुवा सुद्ध हाती लागू नये..? दोभळकर प्रकरणी जे झाले तेच पानसरे यांच्या बाबतीतही व्हावं.. म्हणूनच कुठेतरी दिरंगाइ झाली अशी शंका येते. पानसरे केस मधे तपास संस्थेने न्यायालयात आधी सांगितले की, गोळ्या फॉरेन्सिक टेस्टसाठी स्कॉटलंडला पाठवण्यात आल्या. पण नंतर आठ महिन्यांनी म्हटले की, स्कॉटलंडला पाठवण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या लॅबमध्ये पाठवल्या आहेत. अर्थात गुजरात आणि मुंबई लॅबचे अहवालही वेगवेगळे आहेत. गुजरातचा अहवाल म्हणतो की, एकाच पिस्तुलाने पानसरेंवर गोळीबार करण्यात आला होता; तर मुंबईच्या अहवालानुसार, दोन वेगवेगळ्या देशी पिस्तुलांतून गोळीबार झाला. हे काय सुरु आहे..? अर्थातच, तपास निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने झाला नाही.. त्यामुळेच ही विसंगती दिसते.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

ऍडव्होकेट साहेब दोन्ही हत्याकांडे झाली तेंव्हा त्या त्या राज्यात काँग्रेसची सरकारे होती. त्यांचे आणि सनातन संस्थेचे विळ्याभोपळ्यासारखे सख्य आहे असे असूनही मारेकरी सापडत नाहीत. जे सापडले त्यांच्या विरुद्ध सकृतदर्शनीही ठोस पुरावा सापडला नाही. केवळ कायद्यातील लफडी कुलंगडी करून त्यांना अडकवून ठेवलेले आहे. तरी बरं या दोन्ही राज्यात हत्या झाली "त्या"वेळेस भाजपचे सरकार नव्हते. अन्यथा सर्व डावे, पुरोगामी, उदारमतवादी इ इ लोकांनी केवढा धुराळा उडवला असता. नशीब कोणत्याही उजव्या संस्थेने यात काँग्रेसचे साटे लोटे आहेत असा आरोप केल्याचे निदान मी तरी वाचले नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि हत्या करणारे किंवा करविणारे हे पोलिसांच्या चार पावले पुढे आहेत. केवळ राजकीय वजन वापरले म्हणून १०० टक्के गुन्ह्यांची उकल होत नाही. उलट दबावाखाली निरपराध माणसे गोवले जाण्याची शक्यता जास्त असते. जे झाले ते अतिशय चूक आहे परंतु डावे, पुरोगामी, उदारमतवादी इ इ लोक केवळ त्यांच्या हातात पत्रकारिता आहे म्हणून त्याचा "राजकीय फायदा" उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत हि हि वस्तुस्थिती.

In reply to by सुबोध खरे

दोन्ही हत्याकांडे झाली तेंव्हा त्या त्या राज्यात काँग्रेसची सरकारे होती. पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी २०१५ मधे काँग्रेसचे सरकार नव्हते..

दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे?
असं विचारणं न्यायालयाच्या अधिक्षेत्रात येत नाही.

In reply to by arunjoshi123

पण हा प्रश्न न्यायाल्यानेच उपस्थित केला आहे.. माझ्या माहिती प्रमाणे न्यायालय अशी विचारणा करू शकते.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

इथे न्यायलयापेक्षा शहाणे सदस्य आहेत हे आपणाला बहुतेक माहिती नसावे. इथे सर्वोच्च न्यायायलयाची अक्कल काढणारे हुषार पन आहेत . येइल तुम्हाला अनुभव

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

न्यायालयाने असा प्रश्न विचारला आणि आतापर्यंत काय प्रगती झाली हे ते विचारू शकतात हे मान्य. पण पोलिसांना खरोखरच( राजकीय हस्तक्षेप सोडून द्या) काही धागा दोरा लागला नसेल तर ते काय उत्तर देणार? एखादी सर्वसामान्य व्यक्ती हरवली आहे म्हणून कोर्टाने पोलिसांना तिला शोधून काढा म्हणून हुकूम दिला पण प्रत्यक्षात पोलिसांना तपास करून काहीच हातास लागले नसेल तर पोलीस काय करतील. आणि असे शपथपत्र जर पोलीस महासंचालकांनी न्यायालयात दाखल केले तर न्यायालय काय करू शकेल? पोलीस महासंचालकांना बडतर्फ करा म्हणून हुकूम देऊ शकेल? शक्य नाही. न्यायालयांना पण आपली मर्यादा आहे. हे सर्वच लोक विसरतात. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे पण स्खलनशील नाही-- सोली सोराबजी, पूर्व महाधिवक्ता, भारतीय संघराज्य

सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे
पानसरे यांनी केलेल्या सुधारणा कोणत्या?

In reply to by arunjoshi123

त्यांनी "शिवाजी कोण होता" या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यातील काही पाने मी वाचली होती. भारतातील मुस्लिम आक्रमकांनी देवळे वगैरे पाडलेली नाहीत, ते लुटीच्या उद्देशाने भारतात आले होते, धर्मप्रसार त्यांचा हेतू नव्हता असा टिपीकल जनेविछाप इतिहास त्यात लिहिलेला आहे. हेमंत करकरे, साळसकर इ. ची हत्या संघाने केली, संघानेच २६/११ चा हल्ला केला होता असले हास्यास्पद दावे करणारे एक पुस्तक कोल्हापूरच्या मुश्रीफने लिहिले आहे. त्याच्या प्रकाशन समारंभास कोळसेपाटील, पानसरे इ. तथाकथित विचारवंत उपस्थित होते व त्यांनी भाषणे ठोकून संघावर जोरदार टीका केली होती.

अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं
कोणत्या विचारसरणीच्या? यांच्यात काहीतरी साम्य होतं का? काय साम्य होतं? फक्त यांचीच का लिस्ट बनवली आहे?

जागतीक पातळीवर अनेक हत्यांच्या मागचा खुनी मिळत नाही. तुम्ही विदा काढुन बघा. नॉर्मली जेंव्हा नातेसंबंधातुन किंवा प्रेमप्रकरणातुन/आर्थिक फसवणुकीतुन हत्या होतात त्यांचे खुनी सापडणे जमते. पण सुपारी घेउन कोणी बंगाल बिहार मधला माणुस आणुन खुन करुन गेला तर सापडणे अशक्य आहे. तुम्ही स्वताला पोलिसांच्या जागी कल्पुन बघा.

पानसरे यांनी केलेल्या सुधारणा कोणत्या?
माहिती नाही, पण ते शरद पवांरांच्या बरोबर अनेक वेळेला व्यासपीठावर असायचे कोल्हापुर भागात.

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला
पानसरे कम्यूनिस्ट होते. त्यावेळी महाराष्ट्रात प्रतिगामी भाजपचे सरकार होते. मग "पुरोगामी महाराष्ट्र" कुठून आला?

संघाचे लोक रांडेची पोरे आहेत म्हणणार्‍या गौरी लंकेशचे जीवनकार्य काय आहे? खूनाचा तपास व्हावा नि आरोपिंना शिक्षा व्हावी हा भाग वेगळा, प्रत्येकाला न्याय मिळावाच, पण मेली आहे म्हणून फालतूची स्तुती करू नये. -------------------------------------- असल्या लोकांना दाभोळकरांसोबत बसवून चांगल्या पुरोगामीपणाचा अपमान होत आहे.

सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. एका विशिष्ट दिशेनेच तपास केल्यानेच या प्रकरणांचा छडा लागलेला नाही. दाभोळकरांच्या खुनानंतर काही मिनिटांतच "ज्या विचाराच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली त्यांनीच दाभोळकरांची हत्या केली आहे" असे उद्गगार पृथ्वीराज चव्हाणांनी काढून तपासाचा लंबक सनातनच्या दिशेने फिरविला होता. त्यामुळे जे खरे खुनी होते त्यांना पळून जाण्यास व पुरावे नष्ट करण्यास भरपूर वेळ मिळाला. कलबुर्गी व लंकेश यांच्या खुनानंतरसुद्धा तेथील सत्ताधार्‍यांनी याचाच कित्ता गिरविला. त्यामुळे तेथील तपासही भरकटलेला आहे. तपासाला विशिष्ट दिशा देणे हे अजाणता घडले होते का जाणूनबुजून तपास भरकटविलेला होता हे एक गुढच आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार सनातनवर बंदी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. अशा परिस्थितीत हा खून झाल्यानंतर सनातनला यात अडकवून त्या संस्थेवर बंदी घालता यावी व भाजपला बॅकफूटवर ढकलून त्याचा फायदा २०१४ च्या निवडणुकीत उठवावा हा त्यामागचा मूळ हेतू असावा. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटानंतर याच पद्धतीने कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, दयानंद पांडे, स्वामी असीमानंद यांना याच पद्धतीने या प्रकरणात अडकविण्यात आले होते. नंतर त्यांना समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातही अडकवून मोका लावून तब्बल ९ वर्षे विनाजामीन, विना आरोपपत्र, विना खटला तुरूंगात डांबून ठेवण्यात आले. २००९ मधील निवडणुकीत याचा फायदा खांग्र्सला मिळाला होता. तोच विचार २०१३ मध्ये दाभोळकरांच्या खुनानंतरही खांग्रेसींनी केला असावा त्यामुळेच त्यांनी जाणूनबुजून तपास भरकटला जाईन अशी विधाने केली असावीत. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं. यातील फक्त दाभोळकरांना काही अंशी विचारवंत म्हणता येईल. बाकीचे निव्वळ ढोंगी होते. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. असे असेल तर डॉ. वीरेंद्र तावडेंना १८ महिने विनाजामीन का तुरूंगात ठेवले आहे? एकीकडे म्हणतात की खुनी विनय अकोलकर व सारंग पवार आहेत आणि दुसरीकडे कोणताही पुरावा नसताना डॉ. तावडेंना पकडून ठेवले आहे. समीर गायकवाडलाही असेच २१ महिने तुरूंगात ठेवले होते. एकीकडे म्हणतात खरे खुनी अजून मोकळेच आहेत आणि दुसरीकडे डॉ. तावडे व समीरच्या जामिनाला मात्र विरोध. या लोकांना काहीतरी करून या प्रकरणाचा संबंध सनातनशी जोडायचा आहे व त्यासाठीच ही धडपड सुरू आहे. त्यांच्या दुर्दैवाने या प्रकरणासंबधांत जंगजंग पछाडूनसुद्धा सनातनविरूद्ध कणभरही पुरावा मिळालेला नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. खून झालेल्या चौघांचे विचार पटत नसल्याने त्यांना मारण्यात आले हा जावईशोध कसा काय लावला? खून कोणी केला, का केला, सर्व खून एकाच व्यक्तींनी केले आहेत का प्रत्येक खुनामागे वेगवेगळी माणसे आहेत याविषयी काहीही माहिती नसताना खुनामागचा हेतू तुम्हाला कसा काय समजला? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे हे सांगता का. आणि हे तुम्हाला कसे समजले तेसुद्धा सांगा. ज्या गोष्टी ४ वर्षानंतर सुद्धा तपास यंत्रणांना समजलेल्या नाहीत त्या तुम्हाला अशा काय समजल्या हे सांगा. जी माणसे खुनी म्हणून सापडावीत अशी तुमची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्षात हे खून केलेलेच नसतील तर तपास यंत्रणांना ते कसे सापडतील? विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. काहीही. काही अंशी दाभोळकरांचा अपवाद सोडला तर उर्वरीत तिघांचा व विवेकवादाचा कणभरही संबंध नाही. ते धारातीर्थी पडले, बलिदान असले काही तरी अलंकारिक शब्द वापरून त्यांचे उदात्तीकरण करू नका. त्यांचा खून झाला आहे. ते धारातीर्थी वगैरे पडलेले नाहीत व त्यांनी बलिदान वगैरेसुद्धा दिलेले नाही. ते गुन्ह्याचे बळी आहेत. भारतात व जगात रोज हजारो माणसे अशा गुन्ह्याचे बळी होतात. डोळ्यावरील धुरकटलेला लाल चष्मा उतरवून या गुन्ह्यांकडे पहा.

In reply to by श्रीगुरुजी

"ज्या विचाराच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली त्यांनीच दाभोळकरांची हत्या केली आहे" असे उद्गगार पृथ्वीराज चव्हाणांनी काढून तपासाचा लंबक सनातनच्या दिशेने फिरविला होता. हे विधान तपासाचा लंबक सनातनकडे कसे काय फिरवते म्हणे ? म्हणजे गांधीहत्येचा अन सनातनचा संबंध आहे ?

श्रीगुरुजी,
तपासाला विशिष्ट दिशा देणे हे अजाणता घडले होते का जाणूनबुजून तपास भरकटविलेला होता हे एक गुढच आहे.
आजिबात गूढ नाही. पृथ्वीराज चव्हाणाच्या दोन मुस्कटांत भडकावल्या की तो पोपटासारखा बोलू लागेल. मात्र मांजराच्या गळ्यांत घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न आहे. आ.न., -गा.पै. वि.सू. : १. बोलतांना बोलतात, पण प्रत्यक्षांत मुस्कट फोडायची जरुरी नाही. फक्त खोपच्यात घेतला तरी चालेल. २. मांजर कोण हा प्रश्न कृपया विचारू नये!

मला तर जाम शंका आहे की टनाटनचा आठवलेच दाभोळकरांच्या हत्येमागे असावा.पण भाजपसारख्या भुक्कड पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही.या उजवाविचारसरणीच्या कट्टरवादी आठवलेच्या सनातन संस्थेच्या बंदीवर काँग्रेस सरकार वेळकाढूपणा करत होते त्याचं परिणीती दाभोळकर यांच्या हत्येत झाली. आता तर हिदुत्ववाद्यांचेच सरकार आहे,त्यांच्याकडून तपासाची अपेक्षा म्हणजे चोरालाच पोलिस करण्यासारखे आहे.अजून हत्या होतील व पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी गरीबांचा जीव ही घेतील व त्याला राजमान्यता देण्यात संघोटे मागे कशाला राहतील.

In reply to by सिंथेटिक जिनियस

सिंथे जिनी २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ दाभोलकर यांची हत्या झाली. भाजपचे सरकार ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी आले. या सव्वा वर्षात काँग्रेसचेच पुरोगामी सेक्युलर सरकार होते या कालावधीत एकही आरोपी काय, साधा धागा दोराही सरकारला मिळाला नाही? का उगाच आपला भाजपद्वेष असा उघडा करताय? मोराची कहाणी माहित आहे ना? काही सबळ पुरावा असेल तर बोला. चोरालाच पोलिस,संघोटे, पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी उगाच शिव्या देऊन आपलं हसं करून घेण्याची हौस आहे का?

In reply to by सुबोध खरे

उगाच शिव्या देऊन आपलं हसं करून घेण्याची हौस आहे का? >>> कुटं शिव्या दिल्यात डॉक्टर? पण आहे हिंदुत्वावादी हे पराकोटीचे क्रुर असतात असे आपले माझे मत आहे.कारण एकलव्याचा अंगठा कापून घेण्यापासून यांचा इतिहास सुरु होऊन गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.आपण" खरे" आहात,त्यामुळे तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही,नमस्ते सदा वत्सले ची नागपुरी ची कॅसेट लावून बसाल

In reply to by सिंथेटिक जिनियस

जास्तीत जास्त क्रुरपणा ते कमीत कमी क्रुरपणा या क्रमाने खालील धर्मांचा क्रम लावून देता का? हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, ज्यू

In reply to by टवाळ कार्टा

पुरोगामी लोक नसतील तर जगातले सर्व धर्म अत्यंत सलोख्याने एकत्र राहू शकतात. राहिलेत. राहतील. धर्मांमधे १९-२० असेल, पण ते मॅनेज करता येईल. =================== कोणत्याही धर्मात क्रूरपणा नसतो. ======================== सर्वात क्रूर पुरोगामी धर्म आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

काय हो सिंजि, एकलव्य आणि हिंदुत्ववाद्यांचा संबंधच काय मुळातून? उद्या औरंग्याचा क्रूरपणा हिंदूंवर खपवाल. आ.न., -गा.पै.

In reply to by सिंथेटिक जिनियस

कारण एकलव्याचा अंगठा कापून घेण्यापासून यांचा इतिहास सुरु होऊन गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.
एकलव्याचा अंगठा काँग्रेसचे पहिले पंतप्रधान लफडेश्री नेहरू यांनी (सर्वात लायक आंबेडकर असताना त्यांना पंतप्रधान बनायचा प्रस्तावही कुठे आला नाही) आंबेडकरांचा मुंबईत एका चाटूकाराकडून सर्व मेहनत घेऊन, प्रचंड सभा घेऊन, खोटारडे आरोप करून, फालतू मंत्रालय देऊन, पक्षातून बाहेर निघायला मजबूर करूचा, आंगठा कापला. ======================== बाकी गांधी नावाच्या अपरिपक्व माणसाने राजकारणात जो आंधळेपणा केला त्यासाठी ईश्वर त्याला कधीच क्षमा करणार नाही. एक गांधी मेला तर लोक एवढे बोंबलतात, आमच्या पंजाब, बंगाल आणि हैदराबाद मिळून १०-२० लाख लोक मेले त्यांचं रक्त पातळ होतं का? त्यांना मारणारांपैकी कुणाला फाशी द्यायला नेहरूला का वेळ नव्हता?

In reply to by सिंथेटिक जिनियस

नमस्ते सदा वत्सले ची नागपुरी ची कॅसेट लावून बसाल
प्रत्येकाची संगीताची आवड वेग्वेगळी असते. तुम्हाला राग जेएनयू तुकडे आवडत असेल.

In reply to by सिंथेटिक जिनियस

गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.
गांधीहत्येमुळे निजाम संस्थान आज शांतीपूर्वक भारतात आहे. याचं श्रेय नथुराम गोडसेंना द्यायला हवं.

In reply to by सिंथेटिक जिनियस

मला तर जाम शंका आहे की
तुम्ही नॅचरल जिनियस नाहीत ना. म्हणून अशा शंका येतात.मला १००% शंका आहे की दाभोळकरांचा खून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ==================
सनातन संस्थेच्या बंदीवर काँग्रेस सरकार वेळकाढूपणा करत होते त्याचं परिणीती दाभोळकर यांच्या हत्येत झाली.
माझी शंका खरी ठरवलीत. पण मला इतक्या अप्रत्यक्ष अपेक्षित म्हणायचं नव्हतं. ====================================== एखाद्या कट्टर डाव्या माणसाने, डोके फिरलेल्या पुरोगाम्याने पण दाभोळकरांची हत्या केलेली असू शकते. त्यामुळे फटकन तो कायदा पास झाला. ===================================
त्यांच्याकडून तपासाची अपेक्षा म्हणजे चोरालाच पोलिस करण्यासारखे आहे.
अगोदर स्वतःकडून अपेक्षा करायला शिका. =======================
आता तर हिदुत्ववाद्यांचेच सरकार आहे.
याची सवय करून घ्या. ================================
उजवाविचारसरणीच्या कट्टरवादी आठवलेच्या सनातन संस्थेच्या बंदीवर
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त पुरोगामीपणा नावाचाच मूर्खपणा करायला स्वातंत्र्य नाही. सर्व प्रकारचा मूर्खपणा अलाउड आहे. बंदी का घालायची म्हणे सनातन वर? ज्या नियमांनी सनातनवर बंदी घालाल, त्या नियमांनी पुरोगाम्यांना १०० मी जमिनीत पुरावे लागेल. ========================
पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी गरीबांचा जीव ही घेतील व त्याला राजमान्यता देण्यात संघोटे मागे कशाला राहतील.
तुमच्या काँग्रेसने नेल्लीत मारलेले मुस्लिम आणि दिल्लीत मारलेले शीख फार समाजशोषक, समाजकंटक धनदांडगे होते वाटतं!!

माझा आणि रा स्व संघाचा काहीही संबंध नाही. गांधी हत्या करणारे नथुराम गोडसे हे एके काळी हिंदू महासभेचे सदस्य होते. हिंदू महासभा म्हणजेच हिंदुत्ववादी हा मूळ गैरसमज काढून टाका. पुरोहित यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांना जमीन दिला आहे आणि लष्कराने त्यांना सन्माननीय रित्या नोकरीत सामावूनही घेतले आहे. उगाच पुराव्याअभावी एखाद्या लष्करी अधिकाऱ्यावर आरोप करणे आपल्याला शोभत नाही. काँग्रेसच्या सव्वा वर्षात काहीच पुरावा का मिळाला नाही याबद्दल आपण मूग गिळून गप्प आहात. तुमच्या कडे सज्जड पुरावे असतील तर बोला. अन्यथा फालतू बडबड म्हणून आम्ही सोडून देऊ. उगाच वैयक्तिक पातळीवर उतरू नका.

In reply to by सुबोध खरे

उगाच पुराव्याअभावी एखाद्या लष्करी अधिकाऱ्यावर आरोप करणे आपल्याला शोभत नाही. >> पुरावा नव्हता तर कोर्टाने त्याला इतक्या वर्षं का डांबला होता म्हणे ,नऊ वर्ष ना? आहे का उत्तर? न्यायव्यवस्था काँग्रेस चालवत होती असा आरोप करुन टाका ,नागपुरी कुजबुज कशी चालते हे माहीत आहे आम्हाला.काय नवीन नाय त्यात.

In reply to by गामा पैलवान

नितीन आगेचे मारेकरी पुराव्याअभावी सुटले हे श्रीगुरुजी एका धाग्यावर रेटून सांगत होते,आता इथे येउन पुरोहीतला पुराव्याअभावी कसे डांबुन ठेवले याच्या सुरस कथा सांगत द्राविडी प्राणायाम ते करतीलच. बघा उद्या गंमत त्यांची.

In reply to by सिंथेटिक जिनियस

https://www.dailyo.in/politics/lt-col-prasad-shrikant-purohit-bail-malegaon-blasts-army-nine-years-jail-supreme-court/story/1/19137.html आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेत बसत असेल तर चष्मा काढून वरील दुवा वाचून पहा.

In reply to by सिंथेटिक जिनियस

पुरावा नव्हता तर कोर्टाने त्याला इतक्या वर्षं का डांबला होता म्हणे ,नऊ वर्ष ना? आहे का उत्तर?
उत्तर असं आहे कि घटनेत स्वातंत्र्य इ इ बोलाचाच भात बराच शिजवला असला तरी सरकार कोणत्याही माणसाला काही कायद्यांनुसार अकारण विनापुरावा कितीही काळ अटक करू शकते (वा कायद्याला खोटे सांगून एनकांउंटर करू शकते.). यात फार मोठी गोश्ट नाही. =============== हे जंड्रली फक्त देशहितासाठीच वापरले जाते. पण काँग्रेसचे सरकारच शत्रू देश चालवत होता. म्हणून हा सगळा मेकॅनिझम देशहितवादी लोकांना खच्ची करायला वापरला गेला.

In reply to by arunjoshi123

पुरोहीतसारख्या लोकांना देशहितवादी ठरवणार्या लोकांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे.२०१४ नंतर यांचा माज आणि मुजोर्या भलत्याच वाढलेल्या दिसत आहेत. (संपादित) सभासदांनी सभ्य, अप्रक्षोभक आणि अवैयक्तित भाषेत संवाद साधणे अपेक्षित आहे. : संपादक मंडळ

In reply to by सिंथेटिक जिनियस

संपादित
त्याला गांधीहत्या कशाला पाहिजे? काश्मिरमध्ये देखील या दहशतवादी नागपुरी प्रवृत्तीला मार बसला. हे सगळे जे पुरोगामी आहेत ना, त्यांच्या आणि नागपुरी दहशतवाद्यांच्या लुक्स आणि आडनावांत फार फरक नाही. आंगलट आल्यावर हे एत्तद्देशीय नॉन-दहशतवादी फटके त्यांनाही पडणार आहेत. ============== पुरोहीत देशप्रेमी आहे की देशद्रोही हे इथल्या संस्था ठरवतील. कदाचित काही हिंदूत्ववादी लोकांनी ब्लास्ट केले असतील. नाहीच्च असं म्हणायला तितकी १००% फूलप्रूफ माहिती नाही. यात राजकीय कट असेल तर सामील झालेल्या कितीतरी अधिकार्‍यांना शिक्षा होइल, जे पुन्हा चांगले नसेल. ============== बाकी अफजल गुरु देशहितवादी आहेतच, नै का? ==========================
पुरोहीतसारख्या लोकांना देशहितवादी ठरवणार्या लोकांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे.
असं काही ठरवलेलं नाही. मोदी २००२ चे गुन्हेगार, राहुल गांधी बलात्काराचा गुन्हेगार, सर्व मुसलमान पाकप्रेमाचे गुन्हेगार, हिंदु दहशतवादाचे गुन्हेगार असं सगळं जग नाही. ज्यांना सगळे गुन्हेगार, ईंटॉलरन्स दिसतात ... ======================== बाय द वे, मराठी एत्तदेशीय अब्राह्मण लोकांना उत्तर भारतात गांधीहत्येनंतर गोडसेबांधव समजून लोकांनी चोपलेला. तेव्हा चोपाचोपी फाळणीछाप न करता काळजीपूर्वक करावी, किमान आपले बांधव सुरक्षित राखावेत. तशी चोपाचोपीची लालसा वाईट. ==================== पण तरी, जालमित्र म्हणून अशा मच अवेटेड कयामत दिनासाठी शुभेछा.

In reply to by सिंथेटिक जिनियस

संपादित याच शूर, पराक्रमी एत्तदेशीयांनी मराठवाड्यात १९७८ मध्ये गरीब दलितांना असेच ठेचून महापराक्रम गाजविला होता आणि हेच शूर, पराक्रमी आता राखीव जागांची भीक मागत आहेत.

In reply to by सिंथेटिक जिनियस

न्यायव्यवस्था काँग्रेस चालवत होती असा आरोप करुन टाका
नाय नाय नाय. पोलिस व्यवस्था काँग्रेस चालवत होती. =============== आम्हाला मुक्तपणे योग्य ते आरोप तरी करू द्या ना राव. मूर्खासारखे आरोप करायचे (मश्रूम - गोरा रंग) इटलीतल्या तालमीत शिकवले जाते.

हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्यावर हे पुरोहीत वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे.

In reply to by babu b

मग आधी का नव्हते सुटले ?
आणिबाणीत अटक केलेले लोक आणिबाणी नंतर का सुटले? तसेच. ============================ आधीच्या सरकारला भारतीय विरोधी पक्ष, सेना, संघ, हिंदू धर्म, इ इ पासून देशाला असलेला धोका माहित होता. अतिरेक्यांचे देशप्रेम माहित होते. ================================= चांगले मास्तर आले मनून सनी पोरगं पास झालं. मंग इचारायचं आदि काबर पास झाल्नवतं. ह्येला काय अर्थ आहे का?

In reply to by गामा पैलवान

सरकारचा मुर्खपणा पुढच्या सरकारने कोडगेपणाने चालू ठेवला असता तर तेही यांच्या लेखी "जिनीयस"ठरले असते असा सिंथेटिक विचार करून पहा गामाजी

In reply to by सिंथेटिक जिनियस

आरोप करायच्या आधी थोडा अभ्यास केला असतात तर बरं झालं असतं. मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यावर हिंदू दहशतवाद ही नवी संज्ञा उदयास आली. मग त्याप्रमाणे या आरोपींना TADA लावायला पाहिजे होता. पण पुरोहित आणि इतर आरोपींवर Maharashtra Control of Organised Crime Act or MCOCA लावला गेला कारण MCOCA लावलेल्या आरोपीला जामीन मिळत नाही. आता मोक्का कधी लावतात हे बघू. The Act is imposed in cases of organised crime syndicates, and requires two previous chargesheets against at least one accused within six months of the application of MCOCA. त्यामुळे फक्त एका मालेगाव प्रकरणात त्यांना गोवून चालणार नव्हतं. म्हणून त्यांना २ गुन्ह्यात उगाच गोवण्यात आलं. २००८ च्या शेवटी अटक केली आणि जर सज्जड पुरावे आहेत असा दावा होता, तसेच २००९ ते एप्रिल २०१४ एवढी वर्षे पुरोगामी सरकार सत्तेत असताना, कोर्टात ग्राह्य मानतील असा एकही पुरावा का सादर करता आला नाही? जरा वाचन करायची आणि अभ्यास वाढवायची इच्छा असेल तर इथे आणि इथे अधिक माहिती मिळेल.

In reply to by सिंथेटिक जिनियस

https://www.thequint.com/news/india/pathankot-jem-handler-shahid-latif-was-freed-by-upa-govt-in-2010 https://www.hindupost.in/politics/sonia-gandhi-led-upa-2-free-dreaded-jihadis-2010/ पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे काश्मिरी अतिरेकी वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे. =========================== http://www.espncricinfo.com/india/content/story/640911.html पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे बेटींग करणारे इ इ वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे. =========================== http://www.thehindu.com/news/national/kerala/balakrishna-pillai-released-from-jail/article2588236.ece पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे भ्रष्टाचारी राजकारणी इ इ वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे.

त्यामुळे फक्त एका मालेगाव प्रकरणात त्यांना गोवून चालणार नव्हतं. म्हणून त्यांना २ गुन्ह्यात उगाच गोवण्यात आलं. >> तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी.पण काय हो ,पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना काँग्रेस सरकारने बरे लष्करातल्या माणसालाच अटक करुन लष्कराचे मॉरल कमी करण्याचा प्रयत्न केला.चेरी पिकिंगला दादच द्यायला हवी यांच्या ,आणि बरा पुरोहीतच सापडला .महाराष्ट्रातला एक बेडेकर नावाचा तथाकथित इतिहासकारही या कटात सामिल असल्याचा संशय होता कारण तसे परीस्थीतिजन्य पुरावे होते,पण थोडक्यात निसटला.

In reply to by सिंथेटिक जिनियस

पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना
अहो अहो, जागे व्हा. तो २६/११ हिंदूंनी केला हे सिद्ध करायचा मुश्रिफचा, दिग्गीचा, सोनियाचा प्रयत्न कसाब अटक झाल्यामुळं फसला आहे. असं काहीही बरळू नका. पुरोगामी पकडले जातील. ================= जगात धर्माने हिंदू असलेले अतिरेकी आहेत. पण ते हिंदू धर्म प्रेरित अतिरेकी नाहीत. असलेच तर हिंदू धर्माच्या विरोधातच आहेत. ============================ जगात हिंदू धर्माने प्रेरित हत्या करणारे दंगेखोर जरूर आहेत. पण दंगा शांत झाला कि सर्व धर्माचे लोक शांतपणे राहतात.

In reply to by सिंथेटिक जिनियस

पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना
हिंदू अतिरेकी तुमच्याइतकेच विद्वान आहेत कि त्यांच्या काही मागण्या देखील आहेत? का शौक म्हणून लोक मारतात? कुठे त्यांची काय मागणी आहे हे कळेल? त्यांच्या संघटनेचे नाव? नेत्याचे नाव? उद्दिष्टे?

In reply to by सिंथेटिक जिनियस

पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना पायलीला पंचवीस हिंदू दहशतवादी तयार होणं हे पायलीला पंचवीस डूआय तयार करून प्रत्येक आयडी मार्फत पंचवीसशे पिंका टाकण्याइतकं सोपं वाटतं का?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, गोंदवल्याला जाऊन या .इथे जिलब्या टाकण्यापेक्षा तिथे जाऊन प्रसादभोजनात यथाशक्ती मदत करा.

In reply to by सिंथेटिक जिनियस

डूआयची जिलबी आवडलेली दिसत नाही. साहजिकच आहे. पिंका टाकणार्‍यांना जिलबी कशी आवडणार? बादवे, तुमच्या "ह्यांचं" मत सांगा.

In reply to by सिंथेटिक जिनियस

काँग्रेस सरकारने बरे लष्करातल्या माणसालाच अटक करुन लष्कराचे मॉरल कमी करण्याचा प्रयत्न केला.
पुरोगाम्यांना नेहमी अतिरेक्यांसोबतच राहिल्याने काँग्रेस आणि लष्कराचे मॉरल यांचे गणित माहित नाही. जरा लष्कराच्या अधिकार्‍यांसोबत बोला. निवृत्त अधिकार्‍यांसोबत बोला. काँग्रेसचा एक दिवटा विद्यमान लष्करप्रमुखाबद्दल एक दगडफेक्याच्या बाजूने बोलताना काय म्हटला ते बघा. http://www.huffingtonpost.in/2017/06/11/congress-leader-sandip-dixit-calls-army-chief-sadak-ka-gunda_a_22137158/ भारताचे लष्करप्रमुख रस्त्यावरचा गुंडा म्हणे तुमच्या काँग्रेसचे खासदार. ================= बाटला हाऊस, कर्नाटक टेररिस्ट ट्रेनिंग सेंटर, .... ================ पुरोगाम्यांचे मित्र समाजवादी - http://www.dailypioneer.com/state-editions/lucknow/sp-defends-release-of-youth-arrested-on-terror-charges.html

वरील बर्‍याच प्रतिसादांना एकत्रित उत्तर - मालेगावची केस बघूया. ऑगस्ट २००८ मध्ये मालेगावमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी सप्टेंबर २००८ मध्ये ९ स्थानिक मुस्लिमांना अटक करून चौकशी सुरू केली. कालच हॅप्पी बर्थडे झालेल्या बर्थडे बॉयने ऑक्टोबरमध्ये अचानक जाहीररित्या सांगितले की "कोणताही मुसलमान इतर मुसलमानांना मशिदीमध्ये, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी कधीही मारणे शक्य नाही. हे मुस्लिमांचं काम नाही.". वास्तविक पाहता पाकिस्तान, सिरिया, इराण, इराक, इजिप्त अशा अनेक ठिकाणी मुस्लिमांना मारणारे मुस्लिमच आहेत व त्यातील कित्येक बॉम्बस्फोट शुक्रवारी नमाजाच्या वेळी मशिदीपाशी झाले आहेत. त्यावेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत बर्थडे बॉयचा पक्ष सत्तेत होता. बर्थडे बॉयने तपासाची सुई १८० अंशांनी फिरविल्यानंतर कुठेतरी काहीतरी चक्रे फिरली आणि ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आणि इतर ९ जणांना या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना जामीन मिळू नये यासाठी त्यांच्यावर मोक्का लावायचा निर्णय झाला. यातील कोणावरही भूतकाळात एकही गुन्हा दाखल नव्हता. मोक्का लावण्यासाठी किमान दोन गुह्यांमध्ये संशयित असणे आवश्यक होते. त्यामुळे यांची नावे २००६ मध्ये झालेल्या समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा संशयित म्हणून घुसडण्यात आली. त्याचबरोबर २००६ मध्ये मालेगावमध्येच अजून एक बॉम्बस्फोट झाला होता. यांची नावे त्या प्रकरणातही गुंतविण्यात आली. त्यात भर म्हणून हैद्राबादमधील २-३ बॉम्बस्फोटातही यांची नावे संशयित म्हणूण टाकली गेली व नंतर त्यांच्यावर मोक्का लावला गेला. मोक्का लावल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकला नाही. ते सुटू नयेत म्हणून आरोपपत्र दाखल करण्याची टाळाटाळ करण्यात आली. त्यांना पकडल्यावर सुरवातीला स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. नंतर हेमंत करकरेंच्या नेतृत्वाखाली एटीएसने चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग महाराष्ट्र सीआयडीने चौकशी केली. तरीही काही मिळाले नाही. मग एक एसआयटी नेमून त्यांनी चौकशी केली. तरीही पुरावे मिळाले नाहीत. मग एकदा नव्हे तर तब्बल ४ वेळा या सर्वांची नार्को चाचणी केली. तरीही पुरावे नाहीत. मग सीबीआयला चौकशीसाठी पाचारण केले. सीबाआयला पुरावे जमविण्यात अपयश आल्यावर पुन्हा एक दुसरी एसआयटी नेमून चौकशी केली. त्यांनाही काही मिळाले नाही. आता शेवटी एनआयए चौकशी करत आहे. त्यांनाही अजून कणभरही पुरावा मिळाल्याचे दिसत नाही. पुरावे असते तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला केव्हाच सुरू झाला असता. प्रत्येकवेळी आरोपींनी जामिन मागितला किंवा आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्याची मागणी केली की सरकारी वकील एक ठरलेले छापील उत्तर देत होते. "आम्हाला अजून नवीन पुरावे सापडले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे जामिन देऊ नये.". मोक्काखाली अटक केली असल्याने न्यायालय सरकार पक्षाच्या संमतीशिवाय जामिन देऊ शकत नाही. दरम्यान अगदी याच आरोपाखाली अटक केलेल्या ९ मुसलमानांना न्यायालयाने जामिन दिला (कारण सरकार पक्षाने त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही), पण साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. ना जामिन देण्यास तत्कालीन सरकारने विरोध केला. तुरूंगवासात असताना या आरोपींचा प्रचंड छळ करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंगला जेवणात मांसाहार देणे, अश्लील फिल्म्स दाखविणे, कर्नल पुरोहितांना उलटे टांगून मारहाण करणे इ. प्रकार केले. पण तरीही कोणीही कबुलीजबाब दिलेला नाही. महिला आयोग या अत्याचारांबद्दल मूग गिळून गप्प बसला. साध्वी प्रज्ञासिंहच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी व अंतिम संस्कारांसाठी उपस्थित राहण्यासाठी तिला २-३ तास तुरूंगाबाहेर काढायला सुद्धा सरकारी वकीलांनी विरोध केल्याने तिला वडीलांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मिळू शकले नाही. तुरंगवासाच्या काळात साध्वी प्रज्ञासिंगचे पाय निकामी झाले (ती आता व्हीलचेअर वापरते) व तिला कर्करोग झाला. परंतु तिला उपचारासाठी सोडण्यात आले नाही. २००६ साली समझोता एक्सप्रेसमद्ये बॉम्बस्फोट झाल्यावर तत्कालीन फॉरेन्सिक प्रयोगशाळेने चाचणी करून न्यायालयात असे सांगितले होते की त्यात आरडीएक्स नव्हते. पण नंतर कर्नल पुरोहितला २००८ मध्ये पकडल्यावर चौकशी करणार्‍या समितीने न्यायालयात सांगितले की समझोता प्रकरणात आरडीक्स वापरले होते व ते पुरोहितने पुरविले होते. लष्कराने पुरोहितला ६ टन आरडीक्स तामिळनाडूहून काश्मिरला नेऊन तेथील लष्कराच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. पण त्याने ते तिथे न पोचविता बॉम्बसाठी वापरले. हा तद्दन खोटा आरोप वाचल्यावर दुसर्‍या दिवशी लष्करप्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की लष्कराने पुरोहितला असे काहीही सांगितले नव्हते. लष्करात प्रत्येक बुलेटचा हिशोब ठेवला जातो. जर पुरोहितने तब्बल ६ टन आरडीक्स गडप केले असते, तर ते केव्हाच लक्षात आले असते. हे ऐकल्यावर चौकशी समितीने न्यायालयात जाऊन आरडीक्सबद्दलचे आपले निवेदन मागे घेतले. असीमानंदची वेगळीच कहाणी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार असीमानंदला पकडून तुरूंगात ठेवल्यावर, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटासाठी आरोप लावलेल्या एका मुस्लिम तरूणाला असीमानंदच्या सेवेसाठी ठेवले होते. त्याच्या सेवेमुळे असीमानंदला पश्चाताप झाला व उपरती होऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तुरूंगात असलेल्या एका आरोपीच्या सेवेसाठी दुसरा आरोपी अधिकृतरित्या नियुक्त केला जातो हे बहुधा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे. हा चौकशी समितीच्या खोटारडेपणाचा कळस होता. नंतर लगेचच असीमानंदने पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी छळ करून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतला. आपल्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने आपल्याला जामिनावर सोडावे यासाठी सर्वजण अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावरील मोक्का हटविण्यात आला व त्यानंतर २०१७ मध्ये जवळपास ९ वर्षे तुरूंगात विनाजामीन राहिल्यानंतर यातील बहुतेकांना जामीन मिळाला आहे. त्यांच्याविरूद्ध पुरावे शून्य आहेत. जोपर्यंत ते तुरूंगात होते व खटला सुरू होत नव्हता तोपर्यंत भाजपला व संघपरिवाराला झोडपण्यासाठी हत्यार म्हणून काँग्रेस व देशातले इतर निधर्मांध त्यांचा वापर करीत होते. खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटणार याची खात्री असल्याने आरोपपत्र दाखल न करता चौकशीचा निव्वळ फार्स केला जात होता. २००९ मधील निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांना अडकविण्यात आले. त्यांना अडकवून मुस्लिमांना खूष करणे व भगवा दहशतवाद असा प्रचार करून भाजपला बॅकफूटवर ढकलणे या युक्तीला २००९ मध्ये चांगलेच यश मिळाले होते. याचीच पुनरावृत्ती २०१३ मध्ये करण्याचा प्रयत्न झाला. बर्थडे बॉयने ज्याप्रकारे २००८ मध्ये तपासाची दिशा फिरविली होती, तसाच प्रयत्न २०१३ मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी दाभोळकरांच्या खुनानंतर केला. खुनानंतर संशयाची सुई सनातनच्या दिशेने वळवून पुन्हा एकदा २०१४ च्या निवडणुकीसाठी हिंदू दहशतवाद असा प्रचार करून भाजपला बॅकफूटवर ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र पूर्ण फसला. मालेगाव व समझोता प्रकरणामध्ये दहशतवादी मुस्लिमांना क्लीन चिट देऊन व त्यात निरपराध हिंदूंना गोवून काँग्रेसने देशद्रोहीपणाचे अत्यंत नीच कृत्य केले आहे. समझोता प्रकरणामध्ये पाकिस्तानचाच हात होता असा सीआयएने अहवाल दिला होता. हा बॉम्फस्फोट आमच्याच देशातील लोकांनी केला याची कबुली एका पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष कृत्य करून त्यात निरपराध हिंदूंना गोवण्याचे नीच कृत्य खांग्रेसींनी केले. २००८ नंतर जेव्हा जेव्हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तान या दोन प्रकरणांकडे बोट दाखवून तुमचेच लोक यामागे आहेत असे दाखवून भारताच्या आरोपातील हवा काढून घेतात. पक्षीय स्वार्थासाठी देशहिताचा बळी देण्याचे जे अधम कृत्य खांग्रेसींनी केले त्यांना क्षमा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सगळे लिहिले , पण साध्वीच्या स्कूटरबद्दल नाय लिहिले ! बाँबस्फोटातील स्फोट ज्या स्कूटरच्या सहाय्याने केला ती साध्वीच्या मालकीची होती ना ?

In reply to by babu b

http://www.livemint.com/Politics/HwVVdPXpl0RKoNt4MMUWeL/Malegaon-blasts-case-Bombay-HC-grants-bail-to-Sadhvi-Pragya.html
Sadhvi Pragya’s lawyer said, “There were two allegations against her. One was that her scooter was used in the blast, although there was evidence that the scooter was sold off in 2004 and the blast happened in 2008. The second allegation was that she was part of two meetings in Bhopal and Faridabad. In the Faridabad meeting, the entire conspiracy of Malegaon blast was planned. However, there was no evidence of her participating in the meeting, and there was no such conspiracy in the Bhopal meeting. Barring that there was nothing absolutely against her.”
तुम्ही विकलेल्या गाडीच्या ड्रायवरने अ‍ॅक्सिडेंट केला तर पोलिसात सरेंडर कराल का?

In reply to by arunjoshi123

साध्वीने स्कूटर विकली होती तर स्कूटर नव्या मालकाच्या नावाने झाली असती व अटक नव्या मालकाला केली गेली असती. ... असो , सध्या साध्वी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने तिच्याबद्दल इतर चर्चा करण्यात अर्थ नाही. आधिदैविक , आधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीतीन्ही द्:खातून तरुन जाण्यास हिंदुधर्म तिला शक्ती देवो.

In reply to by babu b

बाँबस्फोटातील स्फोट ज्या स्कूटरच्या सहाय्याने केला ती साध्वीच्या मालकीची होती ना ?
पुरोगाम्यांच्या मते हो, कायदेशीरपणे नो.

In reply to by babu b

ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे,मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. http://indianexpress.com/article/india/india-others/pracharak-killed-after-he-made-sexual-advances-on-sadhvi-nia/

In reply to by सिंथेटिक जिनियस

ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे, ९/११ आणि २६/११ च्या हल्ल्यात तसेच दुसर्‍या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबच्या प्रकरणात सुद्धा या साध्वीचा हात होता असा संशय आहे. मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. साध्वी, कर्नल पुरोहित इ. ना काहीतरी करून या प्रकरणात अडकविण्यासाठी एनआयएने असे अनेक बिनबुडाचे आरोप केले होते. हा आरोप त्यातलाच अजून एक. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेकवेळा हाकलून लावूनसुद्धा कोडगेपणे नवीन आयडी घेऊन परत येऊन त्याच त्याच ओकार्‍या परत काढणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे . . .

In reply to by सिंथेटिक जिनियस

ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पुरोगामी पंडित नेहरूंची प्रेरणा, दुसरं काय. गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. https://blogs.timesofindia.indiatimes.com/the-interviews-blog/gandhi-was-obsessed-with-sex-while-preaching-celibacy-to-others-kusoom-vadgama/

In reply to by arunjoshi123

गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. >> एक कविमनाचा "अटळ "विचारांचा भाजपेई पंतप्रधान होऊन गेला ,तो दिल्लीतील संघ मुख्यालयात पोरी आणून कसा अय्याशी करायचा ह्याचे सुरस किस्से तेव्हा राजधानीत चर्चीले जात होते .

In reply to by सिंथेटिक जिनियस

हे मी देखील ऐकलं आहे. याला किती खरं मानावं देव जाणो. -------------------- पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे.

In reply to by arunjoshi123

मै शादीशुदा नही हू इसका मतलब ये नही की मै ब्रह्मचारी हू .... असे सोत्ता तेच सोत्ताबद्दल बोलले होते ना ?

In reply to by babu b

पण ते गांधीजीं इतका विकृत प्रकार करत नसावेत. मी दिलेली लिंक वाचलीत का? =============== आरोप करणारे आणि भाजप / संघ यांचा संबंध नाही. ============================== माझे सत्याचे प्रयोग वाचले आहे का? त्यात आहे.

In reply to by arunjoshi123

पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे. >> कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? तशी अफवा तर मग हिंदू महासभेच्या एका मोठ्या मराठी नेत्याबाबतही आहे,त्याचे आणि गोडसेचे समलिंगी संबंध असल्याचे तत्कालीन तपास् अधिकार्यांनी जाहीरपणे कोर्टात सांगितले होते हे विसरलात काय.?

In reply to by सिंथेटिक जिनियस

कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? एका पुस्तकात कन्फेशन आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे.
कटात तो स्वतः होता तर माहीती पोलिसांना कळल्यावर त्याला काय सोडणार होते का? ======================== लैंगिक अ‍ॅडवान्सेस करणे क्रिमिनल आहे, त्यासाठी साध्वीने त्याचा खून करणे क्रिमिनल आहे. पण इंडीयन एक्सप्रेसने आणि एन आय ने ओढून ताणून तिचे हात पाय तोडून याचा संबंध ब्लास्टशी लावला आहे. ========================= केरळच्या मंदिरात सोने सापडले तेव्हा काँग्रेसच्या मुख्यालयातूने दोन जहाजे इटलीतून मागवली गेली (ते सोनं घेऊन जायला) तसं साध्वीला शंकराचार्य आणि संघप्रमुखांचं मार्गदर्शन होतं असं म्हणायचं आहे का?

In reply to by पुंबा

गांधी हत्येचं समर्थन मंजे काय हे तरी कळतं का तुम्हाला? ======= आम्हाला काय शौक आहे का कोणाच्याही हत्येचं समर्थन करायला? ================ मी कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोश्टीचा, हिंसेचा, दुर्वर्तनाचा, इ इ समर्थन केले नाही, करणार नाही. त्यात गांधींची हत्या ही एक अशीच असमर्थनीय गोष्ट आहे.

In reply to by पुंबा

वर एका प्रतिसादात ब्राह्मणांचा उल्लेख कुत्रा असा केलेला असून त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे. तो प्रतिसाद आपण पाहिला नसणारच.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे.
पुढे असाच प्रसाद द्यायची इच्छा देखील व्यक्त केली आहे. ============================================ पुंबासारख्या पुरोगाम्यांना १०-२० लाख पंजाबी, बंगाली लोकांवर झालेले अनन्वित अत्याचार दिसत नाहीत. हे ज्यांच्या मूर्खपणाने झाले त्यांना कुणी चोपले तर मेणबत्ती काढून चौकात.

In reply to by श्रीगुरुजी

हे लोक गांधीजींच्या धोतरावर ढेकूण चढला तरी आकांडतांडव करतील. तेच्च २० लाख लोकांचे जीव गेले आणि लाखो बायकांवर बलात्कार झाले तर कुठेत्तरी कोपर्‍यात "वैष्णव जन तो" वर टाळ बडवत बसणार. गांधी मारले गेले ते वाईट, मारणारा वाईट - अरे पण त्या लाखो लोकांवर बोला जरा.