न्याय झाला, पण..!
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!
याद्या
26082
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्याय झाला, पण
प्रतिसादाशी सहमत...
In reply to न्याय झाला, पण by स्वधर्म
सहमत आहे.
In reply to न्याय झाला, पण by स्वधर्म
सहमत
In reply to न्याय झाला, पण by स्वधर्म
राष्ट्रपतींना फाशीच्या
+१
In reply to राष्ट्रपतींना फाशीच्या by एस
<<<वेळकाढू लोकांचा देश आहे हा
In reply to +१ by चौथा कोनाडा
+१००
In reply to राष्ट्रपतींना फाशीच्या by एस
कलियुग आहे
...
In reply to कलियुग आहे by गामा पैलवान
हे हिंदुराष्ट्र नाही
In reply to ... by babu b
..
In reply to हे हिंदुराष्ट्र नाही by गामा पैलवान
आजचा निकाल व मागील काळातील २
भारताचे समाजकारण फार गुन्तागुन्तिचे आहे.
In reply to आजचा निकाल व मागील काळातील २ by श्रीगुरुजी
+१
In reply to भारताचे समाजकारण फार गुन्तागुन्तिचे आहे. by सुखीमाणूस
मराठा समाज तुम्हाला किती
In reply to आजचा निकाल व मागील काळातील २ by श्रीगुरुजी
+१
In reply to मराठा समाज तुम्हाला किती by शब्दबम्बाळ
<<<लाज वाटते असले सुशिक्षित
In reply to मराठा समाज तुम्हाला किती by शब्दबम्बाळ
गुरुजींचा प्रतिसाद म्हणजे जातीवादाचा उत्तम नमुना
In reply to आजचा निकाल व मागील काळातील २ by श्रीगुरुजी
कोपर्डी प्रकरण झाल्यानंतरच
In reply to गुरुजींचा प्रतिसाद म्हणजे जातीवादाचा उत्तम नमुना by विशुमित
+100000
In reply to गुरुजींचा प्रतिसाद म्हणजे जातीवादाचा उत्तम नमुना by विशुमित
गुरुजी यांच्या नाही तर
In reply to +100000 by महाठक
विशुमित यांच्याशी प्रचंड सहमत आहे
In reply to +100000 by महाठक
विशुमित यांच्याशी प्रचंड सहमत आहे
In reply to +100000 by महाठक
तुमच्यासारख्या समाजामध्ये तेढ
In reply to गुरुजींचा प्रतिसाद म्हणजे जातीवादाचा उत्तम नमुना by विशुमित
या तुमच्या मागणीवरून...
In reply to तुमच्यासारख्या समाजामध्ये तेढ by झपाटलेला फिलॉसॉफर
मराठा समाज
https://mumbaimirror
दोघांना एकत्र उत्तर देतो.
<<<उदाहरणार्थ नामांतराच्या
In reply to दोघांना एकत्र उत्तर देतो. by श्रीगुरुजी
ह्रदयसम्राटाने चिथावणी दिली
In reply to <<<उदाहरणार्थ नामांतराच्या by विशुमित
सोनई येथील ३ दलित तरूणांची
In reply to ह्रदयसम्राटाने चिथावणी दिली by सिंथेटिक जिनियस
अशा उलट्या काळजाची लोकं सर्व
In reply to ह्रदयसम्राटाने चिथावणी दिली by सिंथेटिक जिनियस
छान
In reply to अशा उलट्या काळजाची लोकं सर्व by विशुमित
नामांतराच्या वेळेस घरे
In reply to <<<उदाहरणार्थ नामांतराच्या by विशुमित
नामांतराच्या वेळेस घरे जाळायला चिथावणी देणारे हृदय सम्राट कोण्या जातीचे होते हा प्रश्न विचारला तर तुम्हाला रुचणार नाही मग. गुजरात मध्ये दंगे झाले किती जणांना शिक्षा झाली याचा तपशील देता का?गुजरातमधील दंग्यासाठी अनेकांना शिक्षा झालेली आहे. बाबू बजरंगी, माया कोडनानी ही त्यातील प्रमुख नावे. गुगलल्यावर इतर अनेक नावे सापडतील.संभाजी ब्रिगेडची पुस्तके आता बाजारात उपलब्ध आहेत. ठोका की त्यां लेखकांवर केस पाहू कशी शिक्षा देत नाही कोर्ट ते ? तुमचा मेन प्रॉब्लेम तुम्ही ब्राह्मण आहात हा आहे तर. त्यामुळे त्या नराधमांना शिक्षा मिळाली आणि त्या छकुलीला न्याय मिळाला याबद्दल तुम्हाला काही सोयरे सुतक दिसत नाही.पुस्तके प्रसिद्ध झाली तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षे तुमच्या जाणत्या राजांचा पक्ष सत्तेत असलेले सरकार होते. गृहमंत्री देखील जाणत्या राजांच्या पक्षाचा होता. या तथाकथित, पुरोगामी जाणत्या राजाने किंवा त्यांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने या पुस्तकावर किंवा लेखकांवर कारवाई करणे तर सोडाच, त्यांचा निषेध सुद्धा केला नाही. हेच तथाकथित जाणते राजे ३-४ महिन्यांपूर्वी खेडेकरने लिहिलेल्या नवीन घाणीचे प्रकाशन करण्यास गेले होते व त्या प्रकाशन समारंभात अफझुल्याचे कौतुक करून व ब्राह्मणांवर दुगाण्या झाडण्याचे पुरोगामी व निधर्मी कृत्य करून आले. त्या नराधमांना शिक्षा मिळायलाच हवी होती व फाशीची पेक्षा दुसरी कोणतीही शिक्षा सौम्य ठरली असती. परंतु त्या गुन्हेगारांना शिक्षा होताना तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे निर्दोष सुटले याचेही दु:ख आहे.काही आधार आहे का की आपले उगाच "मन की बात". मराठा समाजाचे अशा गुन्ह्यांचे आकडेवारी कोठे मिळती का ते बघा.आधीच्या प्रतिसादात काही उदाहरणे दिली आहेत.याच्यावर खूप घाम्साम होऊ शकते. शहीद करकरेंनी केलेल्या तपासावर शेवटी पाणी फेरलेच ना.शहीद करकरेंनी तपासात नक्की काय शोधले होते ते एक गूढच आहे आणि ते गूढ उलगडणे आता अवघड आहे कारण तपास सुरू केल्यानंतर महिन्याभरातच ते शहीद झाले. परंतु त्यांच्या काळात संशयावरून ज्यांना पकडून ९ वर्षे तुरूंगात विनाजामीन डांबून ठेवले त्यांच्याविरूद्ध ९ वर्षानंतर सुद्धा पुरावा मिळालेला दिसत नाही आणि त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र सुद्धा दाखल करता आलेले नाही.<<<गुजरातमधील दंग्यासाठी
In reply to नामांतराच्या वेळेस घरे by श्रीगुरुजी
सूत्रधार मोकार फिरतात त्याचे
In reply to <<<गुजरातमधील दंग्यासाठी by विशुमित
सूत्रधार मोकार फिरतात त्याचे काय ? आता विचारू नका कोण सूत्रधार म्हणून.कोण आहेत सूत्रधार?आता आहे ना तुमच्या आवडीचे सरकार आणि त्यावेळेस ची पुस्तके सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत ना आणि हो ह्या 'चालू' सरकारच्या काळातच जाणत्या राजाने पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली होती. का गृहमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही किंवा नंतर अटक केली नाही? मी म्हणतोय ना करा केस तुम्ही, मी येतो अनुमोदन द्यायला.खेडेकरवर काही काळापूर्वीच खटला दाखल झाला आहे. तो खटला महाराष्ट्राच्या तत्कालीन पुरोगामी गृहमंत्र्यांनी किंवा पुरोगामी सरकारने दाखल केलेला नसून काही नागरिकांनी दाखल केलेला आहे. पुस्तक प्रकाशनाला हजर राहणे हा घटनेनुसार दखलपात्र गुन्हा नाही. पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच असे करणे तर अशक्य आहे. परंतु खेडेकरची विकृत मनोवृत्ती, पराकोटीचा ब्राह्मणद्वेष आणि पूर्वोतिहास पाहिला तर त्याने इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकात किती गरळ ओकली असेल हे या तथाकथित पुरोगामी जाणत्या राजाच्या लक्षात यायला हवे होते. "ब्राह्मणांचा नि:पात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली" असले तारे त्या पुस्तकात तोडले होते. तिथे जाऊन प्रकाशन समारंभात केलेल्या भाषणात यांनी ब्राह्मणांवर दुगाण्या झाडल्या होत्या. भारतात अॅट्रोसिटी कायदा आहे परंतु रिव्हर्स अॅट्रोसिटी कायदा नसल्याने असल्यांचे फावले आहे.सोयीस्कर आणि तुलनात्मक नसणारे उदाहरणे देऊन आपल्या स्व जातीचे रडगाणे गाणे या व्यतिरिक्त तुमच्या उदाहरणात दम नाही.मी प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहे. नुसत्या गोलगोल गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही मला खोटे ठरविणारी प्रत्यक्ष उदाहरणे द्या.इथे कसे काय तुम्ही ताडले की तो फक्त संशय होता आणि यात कोणत्याही प्रकारचा सरकारी आणि धार्मिक हस्तक्षेप नव्हता? तुम्ही कोर्टाचा आणि पोलीस तपासाचा हवाला देणार हे सर्वसृत आहे.आधी पकडलेल्या म्स्लिम संशयितांना सोडून यांना पकडून मोक्का लावून विनाजामीन तुरूंगात डांबले तेव्हा कोणाचे सरकार सत्तेवर होते ते आठवत असेलच. स्थानिक संशयितांना पकडल्यानंतर, "कोणताही मुस्लिम इतर मुस्लिमांची हत्या करणार नाही. विशेषतः मशिदीमध्ये किंवा नमाजाच्या वेळी तर हे शक्यच नाही. या बाँबस्फोटामागे कोणतरी गैरमुस्लिमच असले पाहिजेत." असे जाहिररित्या सांगून जाणूनबुजून तपासाची सुई एका विशिष्ट दिशेने वळविणारे कोण होते ते आठवत असेलच. एका प्रकरणात हात असल्याचे दाखवून पकडल्यानंतर मोक्का लावता यावा यासाठी इतर प्रकरणातही त्यांचे नाव गुंतविण्याचा प्रयत्न कोणी केला ते आठवत असेलच. त्यांच्याविरूद्ध कोणताही पुरावा नसल्याने शेवटपर्यंत आरोपपत्र दाखल करून सुनावणी सुरू करण्याचे कोणत्या सरकारने टाळले ते आठवत असेलच. हे करत असतानाच इशरत जहांला जाहिररित्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र कोणी दिले तेही आठवत असेलच. तिच्या घरी जाऊन एक लाखाची मदत देऊन तिच्या नावाचा शहीद असा उल्लेख करून तिच्या नावाने कोणत्या पुरोगामी पक्षाच्या नेत्यांनी अॅम्ब्युलन्स सुरू केली ते सुद्धा आठवत असेलच.<<<कोण आहेत सूत्रधार?>>
In reply to सूत्रधार मोकार फिरतात त्याचे by श्रीगुरुजी
बाबू बजरंगी, माया कोडवानी हेच
In reply to <<<कोण आहेत सूत्रधार?>> by विशुमित
बाबू बजरंगी, माया कोडवानी हेच प्रमुख सूत्रधार होते की काय, असे मानायला लोक काय दूधखुळी नाही आहेत.सूत्रधार कोण होते याचे उत्तर अजूनही दिलेले नाही.मी म्हणतो केस री-ओपन करा ना. मी पाठिंबा आणि सहकार्य करतो.खटला बंद झालेला नाही. अशा प्रकरणात सहकार्य करायचे आणि पाठिंबा द्यायचा म्हणजे जे अशा लोकांना समर्थन देतात अशांना अजिबात पाठिंबा द्यायचा नाही. आहे तयारी?भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले. बाकी ज्यांच्यामुळे हे झाले ते नाम निराळे राहिले. अगदी आता पण तुमचा हाच प्रयत्न चालू आहे. तेढ निर्माण करायची आणि निवांत मज्जा पाहत बसायचे.शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले? संदर्भ देता का? जेम्स लेनच्या पुस्तकाचा गैरफायदा घेऊन ही मोडतोड करून जातीयवादी वातावरण निर्माण केले गेले व ज्यांनी हे केले ते निर्दोष सुटले. त्यामुळे "ज्यांच्यामुळे हे झाले ते नाम निराळे राहिले" या वरील वाक्याशी सहमत. मी तेढही निर्माण करीत नाही आणि मज्जाही बघत नाही. लागोपाठ ३ खटल्यांच्या निकालातून जे चित्र दिसते तेच फक्त समोर मांडले आहे.आता तुम्ही हिंदू मुस्लिम चालू केले. देशाच्या एकता आणि सार्वभौमत्वावर आघात करणारे सगळेच देशद्रोही आहेत या बद्दल दुमत नसावे. अजून साध्वी आणि कर्नल निर्दोष सुटलेले नाहीत फक्त जामीन मिळाला आहे तरी त्यांच्या बाबत ममत्व धरणे आणि अॅम्ब्युलन्स सुरू करणे एकाच तराजूत तोलले पाहिजे.निर्दोष सुटले नसले तरी त्यांना अजिबात जामीन मिळू नये याची भक्कम व्यवस्था करण्यात आली होती. मूळ गुन्हेगारांना बाजूला ठेवून यांच्याविरूद्ध कोणतेही पुरावे नसताना खोटे पुरावे निर्माण करून त्यांना ९ वर्षे डांबून ठेवणे अत्यंत नीच कृत्य आहे. निरपराधांना ९ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबणे व पाकिस्तानी अतिरेक्याबरोबर असलेल्या तरूणीला शहीद असे मानपत्र देऊन , तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून तिच्या नावाने अॅम्ब्युलन्स सुरू करणे या एकाच नाण्याच्या बाजू आहेत व दोन्ही बाजू अत्यंत काळ्याकुट्ट आहेत.बाबू बजरंगी, माया कोडवानी...
In reply to <<<कोण आहेत सूत्रधार?>> by विशुमित
भांडारकर हल्ल्या प्रकरणात
In reply to <<<कोण आहेत सूत्रधार?>> by विशुमित
भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले.संदर्भ / विदा आहे का..? का नेहमीप्रमाणे टेपा लावणे सुरू झाले..?मी ३-४ दिवसांपूर्वीच संदर्भ
In reply to भांडारकर हल्ल्या प्रकरणात by मोदक
स्वतःला मर्द बिर्द (स्वतःच)
In reply to मी ३-४ दिवसांपूर्वीच संदर्भ by श्रीगुरुजी
....
In reply to दोघांना एकत्र उत्तर देतो. by श्रीगुरुजी
गांधीवधानंतर
In reply to दोघांना एकत्र उत्तर देतो. by श्रीगुरुजी
तरीपण "इथे" तुम्हाला अनुमोदन
In reply to गांधीवधानंतर by शब्दबम्बाळ
आलंय का कुणी?
In reply to तरीपण "इथे" तुम्हाला अनुमोदन by पगला गजोधर
उत्तराच्या प्रतीक्षेत.
In reply to आलंय का कुणी? by mayu4u
घातलं शेपूट...
In reply to उत्तराच्या प्रतीक्षेत. by mayu4u
सन्माननीय स्नेहीजनहो..
छान प्रतिसाद...
In reply to सन्माननीय स्नेहीजनहो.. by अँड. हरिदास उंबरकर
प्रतिसाद छान.मनात असाच वाटत
In reply to सन्माननीय स्नेहीजनहो.. by अँड. हरिदास उंबरकर
एखाद्या प्रकरणात 'न्याय' झाला
In reply to सन्माननीय स्नेहीजनहो.. by अँड. हरिदास उंबरकर
एखाद्या प्रकरणात 'न्याय' झाला नसेल तर त्याला तपास आणि पुराव्यांची कमतरता कारणीभूत असू शकेल.. जात नक्कीच नाही.काही विशिष्ट प्रकरणातच कसा न्याय होतो व काही विशिष्ट प्रकरणात तपास व पुराव्यांची कमतरता कशी राहते (किंवा जाणूनबुजून ठेवली जाते) हे नक्कीच संशयास्पद आहे. इथे जातीचा नक्कीच संबंध आहे.श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद
| सिंथेटिक जिनियस तुम्ही जर
In reply to श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद by सिंथेटिक जिनियस
न्याय झाला नाही आजून
तुम्ही म्हणता की न्याय झाला.
In reply to न्याय झाला नाही आजून by गामा पैलवान
जेव्हा हे गुन्हेगार फासावर लटकतील तेव्हाच खरा न्याय मिळेल.
In reply to न्याय झाला नाही आजून by गामा पैलवान
श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद
श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद
In reply to श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद by अमितदादा
श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद म्हणजे जातीयवादाचा उत्तम नमुना आहे , एखाद्या समाजाविषयी किती घृणा असावी हे यातून दिसत.माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचा. काही प्रकरणात तपाससंस्था जातीवर आधारीत तपास करतात असे मी लिहिले आहे.amitdada ...!!
In reply to श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद by अमितदादा
सहमत आहे.
In reply to श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद by अमितदादा
प्रत्येक समाजातील जातीयवादी
In reply to श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद by अमितदादा
दुर्दैवाने जातीयवाद दिसतो आहे हे खरेच.
इथेही अनेकजण 'साक्षिदार
In reply to दुर्दैवाने जातीयवाद दिसतो आहे हे खरेच. by मराठी कथालेखक
इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते.+ १<<<'साक्षिदार फिरलेत, त्याला
In reply to दुर्दैवाने जातीयवाद दिसतो आहे हे खरेच. by मराठी कथालेखक
सरसकटीकरण करून अशी काडी लावू
In reply to <<<'साक्षिदार फिरलेत, त्याला by विशुमित
<<<पण दुर्दैवाने दलित
In reply to सरसकटीकरण करून अशी काडी लावू by मराठी कथालेखक
फक्त दलितांबाबतच नाहीतर...
In reply to <<<पण दुर्दैवाने दलित by विशुमित
तंतोतंत सहमत
In reply to फक्त दलितांबाबतच नाहीतर... by mayu4u
खिक्क..
In reply to <<<पण दुर्दैवाने दलित by विशुमित
सोपंय!
In reply to खिक्क.. by मोदक
सगळे नाही तर स्वतःला
In reply to सोपंय! by mayu4u
काहीतरी पोटापाण्याचे बघा...
In reply to सगळे नाही तर स्वतःला by विशुमित
खाऱ्या पाण्याच्या धरणाची
In reply to खिक्क.. by मोदक
खिक्क.. बिग्रेडी बुरखा फाटला
In reply to खाऱ्या पाण्याच्या धरणाची by विशुमित
इथेही अनेकजण 'साक्षिदार
In reply to दुर्दैवाने जातीयवाद दिसतो आहे हे खरेच. by मराठी कथालेखक
हे पहा
In reply to इथेही अनेकजण 'साक्षिदार by एमी
हे 'अनेक' प्रतिसाद आहेत का?
In reply to हे पहा by मराठी कथालेखक
उगाच वाद घालण्यात मला रस नाही
In reply to हे 'अनेक' प्रतिसाद आहेत का? by एमी
सहमत
In reply to उगाच वाद घालण्यात मला रस नाही by मराठी कथालेखक
महान आहात आपण! जातीचा विषय
In reply to हे पहा by मराठी कथालेखक
यांच्या लेखी स्त्रिया मूर्ख,
In reply to महान आहात आपण! जातीचा विषय by शब्दबम्बाळ
आरशाला टिळा?
In reply to यांच्या लेखी स्त्रिया मूर्ख, by पगला गजोधर
गैरसमज नसावा..
In reply to महान आहात आपण! जातीचा विषय by शब्दबम्बाळ
प्रतिसादाशी सहमत...
In reply to गैरसमज नसावा.. by मराठी कथालेखक
लोकांनी धर्म व जातीच्या अफूबाजीतून जागे व्हावे
In reply to प्रतिसादाशी सहमत... by पगला गजोधर
सबंध प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to गैरसमज नसावा.. by मराठी कथालेखक
Two tales of two very
Two tales of two very different murder trials, a Dalit and a Maratha
- Can caste make a difference in the manner in which rape and murder trials are perceived and conducted? Ahmednagar district in Maharashtra has one answerदोन समाजामध्ये तेढ कशी
In reply to Two tales of two very by श्रीगुरुजी