विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो
माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---
वाचने
50490
प्रतिक्रिया
148
मिसळपाव
प्रतिक्रिया
बहुतेक माझी मानसिकता फार
In reply to तुमच्यासारख्यान्ची जी by पगला गजोधर
तसंही अजून काही लोक फक्त केसाने ट्रक ओढतात...
In reply to जुन्या काळात पण तसंच असेल by arunjoshi123
तसंही अजून काही लोक फक्त
In reply to तसंही अजून काही लोक फक्त केसाने ट्रक ओढतात... by बबन ताम्बे
मंत्रोच्चारण करुन का माहीत नाही.
In reply to तसंही अजून काही लोक फक्त by पगला गजोधर
>
In reply to एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा by arunjoshi123
लिटल बॉय
In reply to > by आदित्य कोरडे
इतक्या महान इतिहास संशोधकांना
तेच तर ....
In reply to इतक्या महान इतिहास संशोधकांना by arunjoshi123
आणखी काही लोहस्तंभ
धार
In reply to आणखी काही लोहस्तंभ by राही
छान चर्चा चालू आहे.
जुन्या आणि नव्यावर चर्चा
काका, पूर्वीच्या मानवाला
In reply to जुन्या आणि नव्यावर चर्चा by धर्मराजमुटके
पितळ नावाच अॅलॉयचा वापर
कोणार्क मंदिरावर ऐका परदेशी
पितळ व जस्त धातुचा भारतातला वापर
कालौघात गोष्टी कश्या बदलत जातात
रामायण/ महाभारत आणि इतर
In reply to कालौघात गोष्टी कश्या बदलत जातात by ट्रेड मार्क
नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा
मनुष्याचे सर्वात महान शोध
आजची अवस्था
In reply to मनुष्याचे सर्वात महान शोध by arunjoshi123
१. आजच्या सगळ्या भाषा जुनाट
In reply to आजची अवस्था by arunjoshi123
+111
In reply to १. आजच्या सगळ्या भाषा जुनाट by अत्रे
भाषांची उत्पत्ती, वाढ .
In reply to +111 by राही
anient Indian art, science
In reply to +111 by राही
इंजिनिअरांना त्यांचा स्वतःचा
In reply to anient Indian art, science by अभ्या..
हिंदू धर्मावरील शैक्षणिक संस्थाच कशासाठी?
In reply to इंजिनिअरांना त्यांचा स्वतःचा by arunjoshi123
अनास्था
In reply to हिंदू धर्मावरील शैक्षणिक संस्थाच कशासाठी? by राही
अगदी बरोबर... अरुणजोशी साहेब
In reply to १. आजच्या सगळ्या भाषा जुनाट by अत्रे
उदाहरणार्थ?
In reply to अगदी बरोबर... अरुणजोशी साहेब by आदित्य कोरडे
बाकी सगळं जाऊदे, मला तुमच्या
In reply to आजची अवस्था by arunjoshi123
https://en.wikipedia.org/wiki
In reply to मनुष्याचे सर्वात महान शोध by arunjoshi123
तुम्हाला या धाग्यात कोणीतरी
In reply to https://en.wikipedia.org/wiki by अत्रे
माझ्यामते पुराणकालिन भारतीय
In reply to तुम्हाला या धाग्यात कोणीतरी by arunjoshi123
- आज आपल्याला पूर्णपणे अज्ञात असे एखादे तंत्रज्ञान वापरून पूर्वजांनी विमान तयार केले असू शकते का?
- होय!- आज आपल्याला पूर्णपणे अज्ञात असे एखादे तंत्रज्ञान वापरून पूर्वजांनी विमान तयार केले आहे असे काही पुरावे आहेत का
- माझ्या मते नाही! पुराणातले विमान या विषयावर माझा अभ्यास नाही - म्हणून मी धागालेखक याना विनंती करतो की या मुद्याचे खंडन करावे. बाय द वे - मी तुम्हाला सांगीतले की माझ्याकडे असे विमान आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? समजा मी असे म्हटले की याचे तांत्रिक डिटेल्स मी कोणाला दिले तर ते विमान नष्ट होईल, तर? ठेवाल माझ्यावर विश्वास? नाही ना ..मान्य.
In reply to माझ्यामते पुराणकालिन भारतीय by अत्रे
विश्वास
In reply to माझ्यामते पुराणकालिन भारतीय by अत्रे
पिलियन रायडर यांस
उत्क्रांती म्हणजे नक्की काय?
चुकीची दुरुस्ती : एकपेशीय जीव
In reply to उत्क्रांती म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
उत्क्रांती मानणारे महामूर्ख
In reply to उत्क्रांती म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
लोक उत्क्रांति मानतात आणि
In reply to उत्क्रांती मानणारे महामूर्ख by arunjoshi123
दोघांचे बिट्स अँड पिसेस मानतो
In reply to लोक उत्क्रांति मानतात आणि by अत्रे
सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा
त्यात दिल्लीच्या
In reply to सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा by आदित्य कोरडे
>
In reply to त्यात दिल्लीच्या by arunjoshi123
पण खीळ बसल्याचे आपण काय
In reply to > by आदित्य कोरडे
काही महान लोकांना सिद्धी
कलियुगात दुराचार माजल्यामुळे
In reply to काही महान लोकांना सिद्धी by सतिश गावडे
तेच तर...
In reply to कलियुगात दुराचार माजल्यामुळे by arunjoshi123
रोचक चर्चा
सहमत!
In reply to रोचक चर्चा by स्पा
दोघांचे धन्यवाद.
In reply to सहमत! by स्मिता.
सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा
आपला अनुभव ..
चंद्रावर बर्फ (हो, बर्फच,
In reply to आपला अनुभव .. by चौकटराजा
त्या लेखात ..
In reply to चंद्रावर बर्फ (हो, बर्फच, by arunjoshi123
किलवर गुल्ल्याला देखिल माहित
In reply to त्या लेखात .. by चौकटराजा
चाैकटकडुन असल्या प्रतिसादाची
In reply to त्या लेखात .. by चौकटराजा