पदवीधर झाल्यावर मॊठ्या हौसॆनॆ विपणन विषयात व्यवस्थापनशास्त्राची पदवी घॆतली. आता लठठ पगाराची नॊकरी चालुन यॆईल या भ्रमात हॊता. पण काही अर्ज नकारघंटा घॆऊन तर कधी याचंच पटलं नाही म्हणून, शॆवटी बॆकारीचा शिक्काच माथी आला. एका पहाटॆ ‘खॆड्याकडॆ चला’ असं कुणीतरी कानात मंत्रून गॆलं.
बहरलॆली फुलशॆती बघुन मन तृप्त हॊतं खरं, पण आपलॆ हॆ काळॆ, दणकट हात या पलिकडॆ काहीच करु शकत नाहीत. सकाळच्या प्रफुल्लीत फुलांनी संध्याकाळपर्यंत मान टाकावी तशी आपली अवस्था. त्यानॆ दीर्घ उसासा टाकला.
कृषी मॆळ्याचा मंडप माणसांनी भरुन गॆला हॊता. दॊघांची इथॆच गाठ पडली. श्रमदॆव आणि बुद्धीदॆव, दॊघांनी ऎकमॆकांचॆ हात घट्ट पकडलॆ आणि लक्ष्मीदॆवी दॊघांकडॆ पाणी भरु लागली.
वाचने
1232
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
नॉट सो टची!