मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवटची भेट!!!

क्षितिजा · · जनातलं, मनातलं
आज तुला शेवटची भेटायला आलेय. तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची आज मी समग्र मूर्ती झालेय. आज तुला शेवटची भेटायला आलेय. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं आणि तडक आलेय निघून. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. या नंतर असे येता येणार नाही. संसाराची गाडी ओढताना हे समजून घ्यावे लागेल तुलाही. या नंतर असे येता येणार नाही. मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? दोघेही व्यवहारात रमल्यावर माझी विचारपूस करशील ना? मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? ही माझ्या लग्नाची पत्रिका. चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! ही माझ्या लग्नाची पत्रिका.

वाचने 5588 वाचनखूण प्रतिक्रिया 17

ऍडीजोशी Wed, 10/01/2008 - 12:46
लय भारी अवांतर - एक और शहीद हुआ :)

अवलिया Wed, 10/01/2008 - 13:19
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! बायको काही आली नाही पण विसरु नको सांगणा-या मैत्रिणी आम्ही विसरलो नाही तरी आम्हाला विसरुन गेल्या हो... :))

In reply to by अवलिया

ब्रिटिश Wed, 10/01/2008 - 20:46
>>चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! अवांतर : माज माजे बायकोवर परेम हाय कारन मना लायसनवाल्याच आवरतान मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

In reply to by टारझन

ऍडीजोशी Wed, 10/01/2008 - 21:39
टारू बाळाशी सहमत. मैत्रीण आणि बायको एकच :O आयला काहीच व्हेरायटी नाही :''(

सचिन जाधव Wed, 10/01/2008 - 19:43
खरच खुप छान कविता आहे. प्रेम आणि लग्न किति सुरेख कल्पना आहे....... अस फार् कमी घड्त नाही?

खादाड_बोका गुरुवार, 10/02/2008 - 01:31
माझाही प्रेमविवाह झाला. अगदी लग्नांच्या चार दिवस आधी होणार्‍या बायकोची ,मैत्रिण म्हणुन शेवट्ची भेट सुद्धा झाली. पण बरे झाले की आमच्या बायडीनी ही कविता म्हंटली नाही. मी तर ऐकुनच बेशुद्ध झालो असतो. :O :O कारण तिला मराठी येत नाही.... =)) =)) अवांतर्....ही कवीता फार छान आहे... :) :) मला तर स्वप्नातही भुक लागते....

जयवी गुरुवार, 10/02/2008 - 16:23
कविता छान आहे. अशाच अर्थाची तुषार जोशींची कविता वाचल्याचं आठवतंय.

अनिल हटेला गुरुवार, 10/02/2008 - 16:47
सही !!! चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 17:22
खूप छान आहे कविता. त्या मागील विचार, शेवटाचे धक्का तंत्र, त्यातील आशय आणि एकूणच सादरी करणाची 'ईष्टाईल' आवडली. अभिनंदन.

संदीप चित्रे गुरुवार, 10/02/2008 - 19:37
कवितेचा शेवट तर एकदम अप्रतिम :) ही माझ्या लग्नाची पत्रिका. चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! ही माझ्या लग्नाची पत्रिका.