राव गेले
लेखनप्रकार
"रावसर"
म्हणून प्रसिद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण "राव" होता.
माझ्या चुलत बहिणीशी लग्न झाल्यावर माझे ते "रावभाऊजी"झाले.खूप पैसे असलेल्याला आपण "मालदार" म्हणतो.रावभाऊजी वृत्तिने मालदार म्हणूनच "ओळखीचे" होते.
पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयात ते पि.टी.चे शिक्षक होते.बरेचसे उंच,तब्यतीने उत्तम, कांतीने निमगोरे, सरल नासीका असं हे उमदार व्यक्तीमत्वाचे रावसर जेव्हां
पार्ल्याच्या रस्त्यावरून चालत जात तेव्हां,
"रावसर,रावसर,रावसर"
असे प्रतिध्वनी जणू होत आहे, असं आजू बाजूने येणारे आवाज ऐकून, आणि रावसरांचा उजवा हात सतत सलाम करायला वर झालेला पाहून ,मी गमतीत त्याना म्हणालो,
"रावभाऊजी,तुमचा उजवा हात दुखत कसानाही?"
यावर मला ते म्हणाले,
"लोकांकडून येणाऱ्या प्रतीसादाने दुखणं विरून जातं. "
रावभाऊजी मूडमधे आले की ते शाळेतल्या गोष्टी सांगत.आणि नंतर त्यांचा समारोपाचा विषय म्हणजे ते मला म्हणायचे,
"तुम्हाला माहीत आहे तो अमका अमका माझा विद्यार्थी. तो आता अमूक अमूक आहे."
असं सांगताना रावांच्या चेहऱ्यावर आत्मप्रौढी पेक्षा कर्तव्याची प्रचिती जास्त दिसून यायची.रावसर निवृत्त झाल्यावर सुद्धा स्वस्त बसले नाहीत. आपल्या ओळखीचा आणि आपल्या ज्ञानाचा कुणाला फायदा होत असेल तर ते स्वखर्चाने त्याठिकाणी जाऊन मदत करत राहीले.
मला त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यासारखी घटना म्हणजे १९९१ हे वर्ष.
रावसर त्यावेळी ६४/६५ वर्षाचे असावेत.माझी पत्नी, वर्षाच्या सुरवातीला गंभीर आजाराने एक महिना तरी दवाखान्यात होती.रावभाऊजीना ते कळताच ते मला भेटले.
इतर नातेवाईक पण आम्हाला भेटून जात.मी तसा त्यावेळी एकटाच होतो.ते मला चक्क म्हणाले,
"तुम्ही रात्रपाळी करा मी दिवसा दवाखान्यात राहीन तुमची इतर कामं तुम्ही करून घ्या".
त्या वयावर त्यांनी म्हटल्यासारखं केलं.आणि ते पण कसली आशा न ठेवता.
नंतर माझी पत्नी पुर्ण बरी होऊन घरी आल्यावर एक दिवस ते मला आणि तिला भेटायला म्हणून आले.
मी पण त्यांचे खूप आभार मानले.त्यावेळेला मला ते काय म्हणाले ते मला अजून आठवतं.
"तुम्ही कसले माझे आभार मानता?मी तसं काहीच केलं नाही.मी ज्याच्या त्याच्या मदतीला धावतो.
तुम्हाला मी कसा विसरेन.ज्या पत्नीशी मी आता सुखाने संसार करतोय,ते हे सुखाचे दिवस यायला तुम्ही तिच्या आयुष्यात कसे कारणीभूत झालात ते तिच्याच तोंडातून ऐकलेलं वर्णन मी अशावेळी विसरूं कसा शकेन?"
काय म्हणावं या माणसाला?
कसलं ही निमीत्त काढून मदतीची जरुरी असलेल्याला मदततीचा हात पुढे करून, जीवन जगणारा हा अजातशत्रू माणूस, रावसर, परतीच्या प्रवासाला आम्हासर्वांना सोडून ईहलोकी निघून गेले.माझी खात्री आहे की त्यांचा मदतीचा हात तिथेही पुढे करायला ते मागेपुढे पहाणार नाहित.
त्याना माझीही छोटीशी श्रद्धांजली
श्रीकृष्ण सामंत
वाचने
3622
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सामंतकाका
आभार
सामंत साहेब,
In reply to सामंत साहेब, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार
सर...
In reply to सर... by नि३
तुझ्या प्रतिक्रियेने सद्गदीत झालो
आवडले
In reply to आवडले by शिवा जमदाडे
आभार