Skip to main content

रावणाचे उदाती कारण

लेखक पाटीलअमित यांनी गुरुवार, 30/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित रावणाचे उदाती कारण शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे "तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता" आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे १) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे २) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली ३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ? तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता रावणाचे उदाती कारण
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10231
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

पाटीलसाहेब, मुद्दा चांगला आहे पण आधी ते नीट लिहा तरी. किती चुका त्या शुद्धलेखनाच्या? सुरुवात शिर्षकापासून करा बरं.. ते 'उदाती कारण' बदलून आधी 'उदात्तीकरण' करा.

मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर शुद्ध-लेखनाच्या चुकांनी भरलेल्या.. ? "मी लिहिल तर चांगलंच लिहिल" (लिहीन नव्हे तरी ते जौ दे) या तुमच्या आश्वासनाचे काय झाले हो ? हेच का ते तुमचे चांगले लिखाण ? (हे "हेच का ते अच्छे दिन ?" या तालावर वाचावे)

In reply to by पाटीलअमित

दुर्लक्षणीय नाही हो, साहेब ! 'उदाती कारण' आणि 'उदात्तीकरण' या दोन शब्दप्रयोगांत काहीच संबंध नाही... अगदी व्याकरणाच्या चुकीचाही. लेखाच्या शिर्षकावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे त्याचा मलातरी अजिबात अंदाज आला नाही. असो. तुमचे लिखाण लोकांना नीट कळावे इतपत जरी भान ठेवलेत, तरी ते तुमच्याच फायद्याचे होईल (अवांतर न होता तुमचे लेखन वाचकांपर्यंत नीट पोहोचेल.)

In reply to by पाटीलअमित

माझा प्रतिसाद अस्वस्थामा यांना उद्देशून होता. खाली डॉ म्हात्रंनी आणि डांगेसाहेबांनी दिलेल्या सल्ल्याचा विचार व्हावा.

In reply to by पाटीलअमित

तुम्हाला डॉम्हत्रे ना काय्म्हणायचंहोतं हे सम जलं हे वाचूनखूप्खूप्खूप्ख्प आनंद झालाबरेकापाटीलअमितभाउ. डॉ. म्हात्रेतुमचे त्यांच्या आयुस्।भरउपकारनाहीविसरणारकधीही

In reply to by प्रदीप

मुद्दाम असं लिहायचं म्हणजे खूप कटकटीचं काम आहे!

In reply to by पैसा

"भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय" पाटिलमित उवाच!

कसाब, याकुब आणि त्यांचि औरस अनौरस पिलावळ ह्याना तुम्हि रावण तर बिल्कुलच म्हणु नका. उंदरापेक्षा जास्त मोठ काळिज नाहि ह्यांच... रात्रि २:३० वाजेपर्यंत हे जिवाचि भिक मागत होते, मग ते रावण कसे ? ह्याना तर जन्न्त नसिब होते ना..मग भिकारडे अर्ज कशाला करता. इथले काहि थर्डक्लास राजकारणी आणि त्यांच्या देशबुडव्या राजकारणामुळे हे माजलेयत पण आता हळु हळु दिवस बदलतायत..निदान मि आणि माझे मत तरी बदलतय..चलो यहि से शुरुवात सहि.

In reply to by होबासराव

पण मेडिया त्यांना हिरो करत आहे त्याचे वाईट वाटतेय ,ह्याच जागी सिंधुताई सपकाळ ह्यांवर कधी लेख लिहितात हे लोक ?

तुम्ही तरी अजून वेगळे काय केलेत पाटील? त्यापेक्षा कलामांवर एक छान मोठा लेख टाकला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. मग ह्या ज्या सात ओळी खरडल्यात त्या मोठ्या अभ्यासपूर्ण लेखाच्या पायथ्याशी खपूनही गेल्या असत्या आणि योग्यही वाटल्या असत्या. नव्या लेखकांना सूचना द्यावीशी वाटते. : हे मिसळपाव आहे. फेसबुक नाही याची नोंद घ्यावी.

मराठी ब्लॉग काढून पैसे कसे कमवू असले प्रश्न विचारणारे महाभाग हेच काय?

=))

पाटील अमित तुम्ही मिपावरच्या लेखनातही जाहीरातीच्या लिंक टाकायला हरकत नाही. तुमचा लिखाणाचा अ‍ॅडसेन्स चांगला आहे

In reply to by पाटीलअमित

मिळतात हल्ली गोळ्या ह्याच्यावर पण ..... ( इथेही मिळतील मिपावर... कोणी देईल.... कोणी घालेल....) ह घ्या !!!!

नाहीतर काय एवडा अप्रतिम लेख लिहिलंय

@ अमित पाटील माफ करा. तुमचा ब्लाॅग पाहिला, एकदम बेकार आहे. छान विषय व शुद्ध लिहले तर आंतरजालवासीयांवर उपकार होतील.