पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास?
उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता.
इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य!
असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं.
मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं.
स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला.
मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल?
बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत मॅडम."
स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".
मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.
मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही.
चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला.
मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती.
पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी!
* अन्यत्र पूर्वप्रकाशित
वाचने
16691
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडला !
धन्यवाद , पण
In reply to आवडला ! by कपिलमुनी
पैसा, सत्ता आणि गुलामी...
+१
In reply to पैसा, सत्ता आणि गुलामी... by एस
बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल.सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?हा कळीचा प्रश्न विचारून टोचल्याबद्दल धन्यवाद! असे लेख नियमाने वाचनात येत राहिले तर समाजाची मानसिकता बदलू शकेल असा (भाबडा?) आशावाद.+१
In reply to +१ by बहुगुणी
हे आवडलं!
In reply to पैसा, सत्ता आणि गुलामी... by एस
पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा.हे आवडलं. पण यावर अधिक विचार करावा लागेल मला.पैशाचे म्हणाल तर स्वतःचे
In reply to पैसा, सत्ता आणि गुलामी... by एस
छान लिहिलय!
वा वा!
ताई,
सहमत आहे. अशा प्रवासांत सोयी
In reply to ताई, by जेपी
आवडलं. आधीही आवडलं होतं.
दुस-या संस्थळावर!
In reply to आवडलं. आधीही आवडलं होतं. by आदूबाळ
आवडलं.
पुढे मोकळी जागा असताना मागे
पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".हे वाचताना हसू आलं, पण डोळ्यांच्या कडा किंचीत ओलसर झाल्या. लेख आवडला (नेहमीसारखाच) हेवेसांन !सुंदर लेख!!
पुन्हा वाचताना
हृद्य. फार टोचणारं आहे.
अंतर्मुख करणारे लिखाण!अावडलंच
कसंसं झालं पण लेखन आवडलं
हो.
In reply to कसंसं झालं पण लेखन आवडलं by रेवती
खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला रोजची आहेत पण तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात मी मांडू शकणार नाही.याच्याशी मात्र असहमत. प्रत्येकाची शैली वेगळी असते इतकंच. अनुभव महत्त्वाचा. त्यामुळे जरुर लिहा, मी वाट पाहतेय.(No subject)
In reply to हो. by आतिवास
+१
+ २
खुप खुप आवडला लेख!
खरंय ..
+११११११११११११
In reply to खरंय .. by पहाटवारा
+१
In reply to खरंय .. by पहाटवारा
मनात विचार आला जरी २ पैसे जास्त मिळण्यासाठी हे हातावर पोट असणारे लोक फसवत/अडवत असले, तरी एवढ्या छोट्या रकमेने जर तुम्हाला फारशी झळ पोहोचणार नसेल तर काय हरकत आहे...सहमत आहे. एक रूपयासाठी किती मनस्ताप करून घ्यायचा, किती हुज्जत घालायची ही अर्थात ज्या-त्या व्यक्तीची निवड असते.अनुभवकथन आवडले
माताय!!
सायकल रिक्षा'
In reply to माताय!! by स्पंदना
छान लिहिलय
सुरेख लेखन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }मूळ लेख चिंतनीय आणि सुंदर..
In reply to सुरेख लेखन... by मदनबाण
:-)
In reply to सुरेख लेखन... by मदनबाण
छान लेख!
दर्जेदार व आशयघन लेख.
असाच अनुभव मला हळेबिडच्या
संस्कार
In reply to असाच अनुभव मला हळेबिडच्या by सुबोध खरे
इतर वेळी मी पैसे देऊन सोय
In reply to असाच अनुभव मला हळेबिडच्या by सुबोध खरे
वेळ आणि सोय
In reply to इतर वेळी मी पैसे देऊन सोय by आतिवास
@आतिवास
In reply to इतर वेळी मी पैसे देऊन सोय by आतिवास
काहीसा असहमत
व्यवसाय खरं तर स्पष्ट होतो
In reply to काहीसा असहमत by विटेकर
तसेच
खादा सायकल रिक्शावाला जीव
In reply to तसेच by विटेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }सुंदर लेख
:-)
In reply to सुंदर लेख by मित्रहो
बाकी या लेखामुळे कधी इथेच
In reply to :-) by आतिवास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }आवडला लेख
आपल्या लेखातून आपण जे काम
मुळात अशा आडबाजूला मी का जाते
In reply to आपल्या लेखातून आपण जे काम by असंका
सुरेख लेख
छान लेख.
हं!
In reply to छान लेख. by मराठी_माणूस
लेख सुरेख आहे.
असे अनुभव...
माझाही अनुभव
काही ठिकाणं अशी आहेत की तिथं
In reply to माझाही अनुभव by धर्मराजमुटके
पर्यायच नसतो आहे त्या व्यवस्थेला शरण जाण्याविना!
In reply to काही ठिकाणं अशी आहेत की तिथं by आतिवास
+१
In reply to पर्यायच नसतो आहे त्या व्यवस्थेला शरण जाण्याविना! by धर्मराजमुटके
आपला अनुभव वाचल्यावर शराबी
खूप दिवसांनी
In reply to आपला अनुभव वाचल्यावर शराबी by श्रीगुरुजी
सुरेख!
लेख आवडला. म्हणूनच मालकीहक्क
दुरुस्ती.
In reply to लेख आवडला. म्हणूनच मालकीहक्क by प्यारे१
लेख
पैसे मिळवताना सत्तेची ही
सत्तेची उर्मी आपल्याला टाळता येईल का ? हाच मोठा प्रश्न आहे
In reply to पैसे मिळवताना सत्तेची ही by मारवा
हे जरा व्यवस्थित मांडता येईल
In reply to सत्तेची उर्मी आपल्याला टाळता येईल का ? हाच मोठा प्रश्न आहे by मारवा