उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?
लेखनप्रकार
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?
उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.
कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.
उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.
युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.
(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.
(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.
(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.
(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.
(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.
(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.
(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.
(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.
(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.
(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.
(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.
पुन्हा घोडचुकीकडे
(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.
(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)
(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?
-जीएस
वाचने
54614
वाचनखूण
प्रतिक्रिया
186
In reply to फारच आशावादी ब्वा तुम्ही. राज by काळा पहाड
तुम्हाला विनंती की मुस्कट दाबी करू नका ..
In reply to तुम्हाला विनंती की मुस्कट दाबी करू नका .. by सुहास..
अरे हो एमआयएम च्या एका
In reply to अरे हो एमआयएम च्या एका by सुहास..
?
In reply to ? by विकास
निवडुन येण्यार्या कोणास ही
In reply to निवडुन येण्यार्या कोणास ही by सुहास..
६० वर्षांचे खड्डे
In reply to ६० वर्षांचे खड्डे by नितिन थत्ते
काहीच कसं नाही?
In reply to काहीच कसं नाही? by विकास
विकास शेठ
In reply to विकास शेठ by सुहास..
मंत्र्यांचा खुलासा पण वाचा की
In reply to मंत्र्यांचा खुलासा पण वाचा की by विश्वनाथ मेहेंदळे
आधीच्या काळात असे खुलासे
In reply to विकास शेठ by सुहास..
असो. यावेळेस किमान जाहीर तरी
In reply to निवडुन येण्यार्या कोणास ही by सुहास..
बरोबर
In reply to बरोबर by विकास
हो आहे ! अर्थात आधी आक्षेप
In reply to निवडुन येण्यार्या कोणास ही by सुहास..
:)
In reply to :) by क्लिंटन
नियम आहे आणि कारवाई ही आहे ,
In reply to नियम आहे आणि कारवाई ही आहे , by सुहास..
अगदी तरूंगातुन ही !!
In reply to अगदी तरूंगातुन ही !! by सुहास..
एका ठराविक वयाची अट आहे रे
In reply to :) by क्लिंटन
महाराष्ट्र सरकारचा नियम
In reply to महाराष्ट्र सरकारचा नियम by विकास
+१
In reply to +१ by क्लिंटन
गेल्या आठवड्यात अनेकविध
In reply to गेल्या आठवड्यात अनेकविध by सुहास..
:)
In reply to :) by क्लिंटन
दिलीत की , वाचा की जरा ....
In reply to +१ by क्लिंटन
मिम च्या उमेदावाराच्या बाबतीत
In reply to तुम्हाला विनंती की मुस्कट दाबी करू नका .. by सुहास..
शेतकर्यांचा जीवावर उठलाय तो
ताजा विनोद :-एकही जागा न
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernमस्त लेख्..अगदी मनातल लिहिलत्
वा! मजा आली वाचताना. या
+१
सध्या सेनेला किती ही नावे
In reply to सध्या सेनेला किती ही नावे by सुहास..
....बरेच राजकारण समजते रे तुला, मी तर मंत्रमुग्ध झालो...!!!!!
सुहास- +१ . सगळी प्रसार
In reply to सुहास- +१ . सगळी प्रसार by दुश्यन्त
हम्म
In reply to हम्म by आजानुकर्ण
अहो शुक शुक !
In reply to हम्म by आजानुकर्ण
प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत !
In reply to प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत ! by सामान्यनागरिक
बाळासाहेबांचे नांव खराब व्हायला नको
In reply to बाळासाहेबांचे नांव खराब व्हायला नको by आजानुकर्ण
हा हा हा. अगदी!
In reply to हम्म by आजानुकर्ण
इतकी वर्षे मुंबई महापालिकेत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring planहुकुमी एक्का
अरे शिटा किति.. मागताय काय?..
क्रोधाद्भवति संमोह:
टी.व्ही वर एक विधान ऐकुन
In reply to टी.व्ही वर एक विधान ऐकुन by अविनाशकुलकर्णी
=))
=)) हहपुवा. तरी देखील आपने निवडणुका लढवल्या असत्या तर त्या निमित्ताने केजरीवालांना परत एकदा बोर्डावर आलेले पाहता आले असते आणि करमणूक झाली असती हे विसरता येणार नाही! ;) बाकी काल फिरत असलेला एस एम एस आठवला: "मनसे" आणि "आप" आता एकत्र होणार आहेत. नवीन पक्षाचे नाव "मनस्ताप"!
सत्तेच्या बाहेर असण लाँग टर्म साठी अधिक फायद्याचे.
In reply to सत्तेच्या बाहेर असण लाँग टर्म साठी अधिक फायद्याचे. by सुधीर
+१. आत्ता सगळ्यात व्हल्नरेबल
असो ...सर्व प्रतिसाद
http://www.lokmat.com
राजू परुळेकर म्हणजे तेच का
In reply to राजू परुळेकर म्हणजे तेच का by दुश्यन्त
अण्णां
=)) होय !!
अण्णां हजारेंचा ब्लॉग हेच
मस्त
बातम्या
In reply to बातम्या by विकास
हि चाल राजनाथसिंगची असावी.
In reply to बातम्या by विकास
विकास, म्हणजे एखादे पद नक्की
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by जीएस
लेख आवडला..
सापडले
झोपी गेलेला जागा झाला ( ज़रा
भाजप जरी शिवसेनेशीच घरोबा
In reply to भाजप जरी शिवसेनेशीच घरोबा by जानु
अरे वाह!!! उत्तम बातमी!!!
In reply to अरे वाह!!! उत्तम बातमी!!! by दशानन
मुंबई
In reply to भाजप जरी शिवसेनेशीच घरोबा by जानु
मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले
In reply to मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले by क्लिंटन
अगदी अगदी...
नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या
मला ही असेच वाटत होते. थोडं
सर्फिंग
करत मुख्यमंत्री ही झाले असते. आता लाटेत बुडाले एवढेच.मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून
In reply to मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून by दुश्यन्त
+१
शहा-मोदींनी आधीच राज्य भाजपला
चला झाले उद्धवजी जागे.
उत्तम
१. उद्धव ठाकरेचे नेतृत्व
In reply to १. उद्धव ठाकरेचे नेतृत्व by नितिन थत्ते
>>> ३. उद्धवला मुख्यमंत्री
इंटरनेट जोक
थत्ते यांच्याशी सहमत . आणि
In reply to थत्ते यांच्याशी सहमत . आणि by पिंपातला उंदीर
>>> मुंबई -ठाणेमहानगरपालिका
In reply to थत्ते यांच्याशी सहमत . आणि by पिंपातला उंदीर
सहमत
शिवसेना
In reply to शिवसेना by हुप्प्या
+१
In reply to शिवसेना by हुप्प्या
>>एका संघाचा वारसा सांगणार्
In reply to >>एका संघाचा वारसा सांगणार् by नितिन थत्ते
लोळलो हसून हसून
In reply to >>एका संघाचा वारसा सांगणार् by नितिन थत्ते
ठ्ठो
बसप ला ७% पेक्षा जास्त मत
नवा प्रश्न
In reply to नवा प्रश्न by क्लिंटन
माफी बिफी प्रकार उगाच आहे.
माफी
भाजपला हवी उद्धव यांची माफी!
श्री उद्धव सभ्य सामाजिक संकेत
भाजप जरा जास्तच माज करत आहे.
In reply to भाजप जरा जास्तच माज करत आहे. by श्रीगुरुजी
+१
ताठर भूमिका जास्त आव्हानात्मक
आदित्य आणि शिवाजी राजे यांची तुलना.