मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किस्सा

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे.. इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते.. यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली.. बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी.. मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते.. अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते.. यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले.. त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने.. परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.

वाचने 16119 वाचनखूण प्रतिक्रिया 70

पोटे Sat, 08/16/2014 - 10:58
पाली विषारी असतात तर माण्जरे पाली का खातात ?

एस Sat, 08/16/2014 - 12:12
पाल (हाऊस लिझर्ड) ही विषारी नसते. आपल्या घराच्या छताला एक प्रकारची विषारी बुरशी असते. ती पालींच्या शरीरावर चिकटल्यास अशी पाल पडलेले खाद्यपदार्थ माणसांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. जुन्या कौलारू छतांना अशी बुरशी जास्त असे. आताच्या आधुनिक घरांमध्ये याचे प्रमाण सहसा आढळत नाही.

स्पंदना Sat, 08/16/2014 - 12:20
मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा. जेंव्हा आपल्याकडुन हे नकळत का असेना घडलय हे लक्षात आले तेंव्हा त्या दोघांनी मिळुन तेच दुध पिउन येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली. ऑन अदर हँड त्या ऐवजी उपस्थीतांना घडलेला प्रकार तातडीने कळवुन डॉक्टरची व्यवस्था करणेही उचित ठरले असते नाही का? पण त्यांच्या नैतिक जबाबदारी स्विकारण्याचा पद्धतीत फरक पडला असे म्हणुन शकतो, तरीही त्यांनी ती त्यांच्या परीने स्विकारली.

In reply to by स्पंदना

भृशुंडी Sun, 08/17/2014 - 22:22
झोल आहे. म्हणजे बघा, एखाद्याला गरीबीतून वर काढण्यापेक्षा स्वतः गरीब होऊन राहिले तर काय होणार? तसंच बाकीच्यांना त्रास झाला असेल तर तो आपल्यालाही होउ दे- ह्यात काय प्वाईंट आहे? त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?

In reply to by भृशुंडी

ह्यात काय प्वाईंट आहे?
नंतरची लफडी निस्तरत बसून पुन्हा गिल्ट काँप्लेक्स पासून वाचणं अवघड, म्हणून त्यांनी `सेल्फ कन्फेशन' किंवा विषारी दुग्ध-प्राशन हा पर्याय जवळ केला.
त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?
रात्री-अपरात्री पब्लिकला उठवून तब्येतीची चवकशी करण्यानं आणखी बोभाटा झाला असता. त्यात, कार्यबाहुल्यामुळे कुणी फोन उचलला नसता तर, `गेलेले दिसतायंत!' असा गैरसमज होणं सहाजिक आहे. त्यापेक्षा, त्यांना त्यांचं बघू दे, आपण आपलं (एकदा शेवटचं) बघू असा विचार करणं उचित होतं.

प्यारे१ Sat, 08/16/2014 - 12:44
>>>परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. >>>सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. ह्या वाक्यांची काय गरज काय? मेले असते तर 'अण्डर कृपा कव्हर' मेले असते का? कशाला नको त्या उल्लेखांनी चांगल्या गोष्टी नासवतात लोक कुणाला माहिती.

In reply to by प्यारे१

धन्या Mon, 08/18/2014 - 13:03
नाना महाराज जे कोणी असतील ते असोत. मात्र संतांच्या चरीत्रांमधील अशाच प्रकारच्या सांगोवांगीच्या सुरस चमत्कार कथांमुळे त्यांची मुळ शिकवण बाजूला राहते आणि निरर्थक गोष्टींचा उदो उदो होतो. साधे भोळे लोकही मग "त्यांचा तेव्हढा अधिकारच होता" असे म्हणून त्याच फालतू गोष्टींमध्ये अडकून पडतात.

In reply to by नाव आडनाव

काही प्रश्न उरतातच : १) सगळे दूघ पीत होते तेव्हा अकु काय करत होते? २) दुधाचे पेले प्राशन करुन, साकडे घालून झाल्यावर, यजमानांनी काय केले? ३) मुळात नाना महाराज कशानं गेले? ४) यजमान (केवळ धक्यानं) गेले असते आणि पाहुणे (काही कल्पनाच नसल्यानं) वाचले असते, तर नाना महाराजांचे नांव वाकडे झाले असते का?

मूकवाचक Mon, 08/18/2014 - 02:39
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते.. यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली.. बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी.. मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते.. अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते.. यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले.. त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने.. परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. --- परिवार बुद्धीवादी होता. त्यांनी पालींच्या विषारी व बिनविषारी प्रजातींचा विदा गोळा करायला सुरूवात केली. यदृच्छेने काही झाले नाही. --- परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.

In reply to by मूकवाचक

परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.
अद्वैतवादात नवा-जुना असा प्रकार नाही. ती वस्तुस्थिती आहे. ज्याचा जन्म झाला ते शरीर मरणारच. जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Mon, 08/18/2014 - 13:09
जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.
हे काही झेपलं नाही. विशेषतः शेवटचं अर्ध वाक्य. हे वाक्य कुणासंदर्भात आहे?

In reply to by धन्या

ती (व्यक्तीच्या) भोजनावर अवलंबून नाही त्यामुळे तिला अभोक्ता म्हटलंय. तस्मात, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आपत्तीनं ती अबाधित आहे.

पिवळा डांबिस Mon, 08/18/2014 - 12:00
मुखी कुणाच्या पडे केसर-दूध, कुणा मुखी ती पाल... ते नाना महाकाल!!! अकुल्या, ते नाना महाकाल!!!

सुहास.. Mon, 08/18/2014 - 12:14
पंख लागायच्या आधी वाचुन घेतला ;) 'पाली' विषयी अधिक माहीती ते मुर्ती-शिळा-शिलालेख-वितीहास-अभ्यासक-संपादक श्री. वल्ली यांना विचारावी .. ;) धन्यवात ;)

सुहास.. Mon, 08/18/2014 - 12:16
अविंतर ....आपल हे अवांतर : कुठलाही प्राणी कसल्याही तरल पदार्थात मरण पावला तर कालांतराने तो त्या तरल पदार्थावर तंरगला पाहिजे असे शास्त्रात ( कुठल्या ते माहीत नाही ) म्हटले आहे का ?

In reply to by सुहास..

आदूबाळ Mon, 08/18/2014 - 13:44
प्वाईंट आहे. यात केशरी दूध तरल पदार्थ आहे हे गृहितक आहे, पण एजमानांच्या केशरी-दूध-मेकिंग-अ‍ॅबिलिटीज वर शंका न घेता; एक शक्यता अशी आहे, की तळाशी जो खरपुडीसदृश पदार्थ तयार होतो, त्यात पाल चिकटली असावी.

In reply to by आदूबाळ

सुहास.. Mon, 08/18/2014 - 20:20
त्यात पाल चिकटली असावी. >>> माफ करा पण , चिकटली की चिटकली ?? अर्थात यावर चर्चा करण्याकरिता वेगळा धागा काढण्यास हरकत नाही ( आहे फुकट ;) )

In reply to by सुहास..

प्यारे१ Tue, 08/19/2014 - 19:13
>>> चिकटली की चिटकली ?? तुझाच एक धागा होता ना? चिकटवणे की चिटकवणे? अजून किती तिथेच 'चिटकून' राहून ट्यार्पी काढशील रे बाबा?

In reply to by प्यारे१

सुहास.. Tue, 08/19/2014 - 22:06
???? माझा धागा ? ...आठवेना ......आमचा धागा म्हणजे लिहा आणि गंगासमर्पण ..... ( तसं नसत तर , आमचे प्रतिसाद आमच्या धाग्यावर नंबर ऑफ रिप्लायपेक्षा जास्त नसते का दिसले ट्यारप्याग्रस्त शिशुवर्गातल्या वा समुद्रीकंपुसारखे ) असो , एक धागा तुला उचकटायला सांगीतला होता हे मान्य ...पण स्साला हा आरोप अमान्य ...तो कशासाठी होता हे जग जाहीर होत ..म्हणुन हे ही जग जाहीर करतोय ....असो २ ....( लिखाण बंदच करतो च्यामारी, ना रहेगा वाश्या ..ना ....)

वेल्लाभट Mon, 08/18/2014 - 16:07
प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय मी ! ! ! ती पाल, दूध, यजमान, पाहुणे, नाना महाराज सगळं बाजूलाच! कसला खुर्दा झालाय मूळ धाग्याचा. पालीपेक्षा डेंजर !

In reply to by धन्या

यशोधरा Tue, 08/19/2014 - 17:58
म्हंजे मिपावर होते ते नाना म्हाराज? नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन! :P

In reply to by यशोधरा

धन्या Tue, 08/19/2014 - 19:00
नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन!
अहो तै, अशी वर्णनं भूता-खेतांची असतात. महाराजांची नसतात. महाराज म्हटले म्हणजे कसे डोक्याच्या मागे वलय असलेली एखादी तेजःपुंज मूर्ती नजरेसमोर येते.

In reply to by धन्या

यशोधरा Wed, 08/20/2014 - 17:34
महाराजांनापण पावर असते म्हटलं! आता अगदीच एअर इंडियाचा महाराजा असेल तर मग.. ह्या, ह्या, ह्या! :D

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्या Tue, 08/19/2014 - 18:57
असू दया हो काका. त्यांची तरी शंभरी कधी भरायची. तुम्हाला काय वाटते, त्यांनी नाना महाराजांचा उल्लेख केला तो काय महाराजांप्रती आदरभाव आहे म्हणून?

पालव Tue, 08/19/2014 - 17:45
झेपले नाहि बुआ ...काहिच्या काहि...कोजागीरीला रात्री १२ वाज्ता दुध पीतात, मग पाहुने गेल्याअवर कसे काय उशिरा दुध पीनार

बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन टाकलं, उगाच वाया कशाला घालवायच? दुध प्यायच्या आधी पाल पिळुन घेतली की नाही? नंतर त्या पालीच काय केल? (त्याची रेशीपी विचारुन इकडे टाकलीत तर ती एक चांगली समाजसेवा होइल) पैजारबुवा,

तुमचा अभिषेक Wed, 08/20/2014 - 16:22
घरच्यांची सर्वांची दुपारची जेवणे झाली. शेवटाला घरातला कर्ता पुरुष कामानिमित्त बाहेर गेलेला तो येऊन ताटावर बसला. समोर डाळीचा टोप. तळाला उरलेली थोडीशी डाळ. चमच्याने सहज ढवळून पाहिले तर त्यात मरून पडलेली पाल नजरेस पडली. घरातले सारे जेऊन तासभर झाला होता, अजून कोणाला काही झाले नव्हते तरीही सर्व भितीने थंडगार पडले. या महापुरुषाने मग काय करावे. त्या सर्वांना धीर येण्यासाठी म्हणून लिमडा मिरची काढतात तसे पाल बाहेर काढून उरलेली डाळ बिनधास्तपणे प्राशन केली.

पाल घातलेली केशरी दुध चवीला कसे लागेल ह्याचा विचार करीत आहे ... करायचा एकदा हा बेत मिपाकरांनो पालमिल्कशेक ...कोजागरी जवळच आली आहे ... मजा येईल ... !!

In reply to by बॅटमॅन

बंगालीत तर काही काही माणसांनाच पाल म्हणतात : उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल *lol* इंग्रजीत पाल हा शब्द मित्र ह्या अर्थाने वापरतात : Hey , how are you , Pal ? *pleasantry*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 08/20/2014 - 18:26
हा हा हा =)) 'आपले' डिरेक्टर २००९-१० साली शंकर पाल म्हणून होते ते आठवलं. शंकरपाळ्याची आठवण व्हायची त्यांना पाहिलं की.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन Wed, 08/20/2014 - 18:29
बंगालीत झाडू साठीचा शब्द, तमिऴ मध्ये सामान्य किड्यासाठीचा शब्द, तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द, काश्मिरी भाषेतला ब्रेड/चपाती/नान/रोटी इ. साठीचा शब्द, हे सर्व शब्द एकदा पहा आणि नै हास्यस्फोट झाला तर सांगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या Wed, 08/20/2014 - 19:24
तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द,
रा ** इक्कडा वस्तायी. एका तेलुगू चित्रपटात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा फुटलो होतो. :)

असंका Wed, 08/20/2014 - 18:00
फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी अशी एक गोष्ट एका नामांकीत साप्ताहिकात वाचली होती (सा. सकाळ/लोकप्रभा/.चित्रलेखा इ. पैकी असावे) पाहुणे सकाळी सकाळी घरी जायला निघतात, तेव्हा दूध का खीर का असलंच काही त्यांना बरोबर देतात. त्यांची गाडी निघाल्यानंतर थोड्या वेळाने हे पण तो पदार्थ वाढून घेतात, तर भांड्यात मेलेली पाल. पण त्या गोष्टीत हे लोक पार जीवाच्या आकांताने ही गोष्ट या पाहुण्यांना कळवायचा प्रयत्न करतात. पोलीसांना सांगतात. आणखी कुणाकुणाला सांगतात, पोलीसही लगेच सायरन वाजवत त्यांनी सांगितलेल्या गाडीच्या शोधात निघतात. दुपारपर्यंत जेव्हा गाडी सापडत नाही, तेव्हा शेवटी रेडिओ वर अनाउंस करतात- "दूध पिऊ नका, दुधात पाल सापडली आहे" असं काहीतरी. शेवटी पोलीसांनाच हे लोक सापडतात, पण त्यांनी तोवर दूध पिलेले नसते. मग सगळे हाश्श हुश्श होते. मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या Wed, 08/20/2014 - 20:38
मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
*lol*