या सगळ्या यादीत जी ए आभावानेच आले . जी ए आवडण्याचे ही एक वय असावे . एकी काळी मला जी ए तुफान आवडले .. त्यावयात त्यांच्या सलग दोन कथा वाचणे देखील अवघड वाटे . अधाश्यासारखी वाचली त्यांची पुस्तके ..पारवा, पिंगळावेळ , निळा सावळा , हिरवे रावे.. कुसुमगुंजा ( हे त्यातल्या त्यात अलिकडचे )
अगदी बिम्मची बखर देखील वाचले !
पण सगळ्यात आवडले ते माणसं अरभाट आणि चिल्लर .. ! अजून ही आवडते .. कितीतरी दिवस पिशव्या विठोबा आणि भ्रूशुंड पक्षी सतत समोर येत असत .. अरभाट पुस्तक आहे .. त्यात विचारलेला एक प्रश्न फार दिवस छळत होता.
"जर सगळ्याच गोष्टीचे कर्तृत्व जर नियतीकडे आहे तर आपल्या करण्या अथवा न करण्याला तसा काय अर्थ उरतो ?" खूप वर्षेया प्रश्नाने मला छळले .. हळू हळू जसा मोठा होत गेलो अधिक वाचत गेलो तेव्हा उकल होत गेली ,, मला वाटते गीता प्रवचने ( विनोबा) वाचताना या प्रश्नाची उकल झाली..
पण जी ए अफाट .. यात वादच नाही ! आज ही कधीतरी स्वामी , बांगड्या या कथा निखळ साहित्यिक आनंद देतात!
अभिजात मराठी साहित्याची चर्चा होताना जी ए यायलाच हवेत म्हणून हा प्रतिसाद !
'कादंबरी' असा विषय असल्याने! ;-)
अर्थात जी. एं. नी अनुवादित केलेल्या कादंब-यांबद्दल लिहिता येईल म्हणा!
स्वातंत्र्य आले घरा, रानातील प्रकाश, शिवार, लॉर्ड ऑफ द फ्लाईज....
'एक अरबी कहाणी' माझा आवडता अनुवाद (आणि आवडती कादंबरी) आहे - त्याबद्दल कधीतरी सवडीने!
बर्याच जणांना न आवडलेले आणि तरीही मला आवडलेलं एक पुस्तक- बाकी शून्य! :)
अत्यंत संवेदनशील, स्वतःला कुठेही झोकून देणार्या आणि तरीही त्रयस्थपणे आयुष्याकडे बघू शकणार्या व्यक्तीचे प्रामाणिक निवेदन असं थोडक्यात याबद्दल सांगता येइल. संपूर्ण वाचल्यावर 'कोसला'शी तुलना का करतात हे मात्र कळलं नाही. फक्त थोडंफार बॅचलर लाईफ असल्यानी दोन्ही कादंबर्या एकसारख्या होत नाहीत. बाकी शून्य मध्ये खूप गोष्टी 'between the lines' 'किंवा subtle' आहेत असं मला वाटलं.
सुरुवातीला सावकाश वाचत होते, मध्येच महारोग्यांबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलची सहानुभूती, स्वतःला त्या जागी बघणं, हे एक क्षण इतकं अन्गावर आलं, की वाटलं पुस्तक ठेउन द्यावं.तिथेच लक्षात आलं की इथे फक्त जनरल घटनाक्रम आणि विचार नाहीये. प्रत्येक अनुभव खोल जाउन खळबळ माजवतोय... पुढे झपाटल्यासारखी वाचत गेले. आणि एका दिवसात पुस्तक संपवलं. पूर्ण पुस्तकातकाही वाक्य अगदी चपखल आहेत. जसे 'टीव्हीसमोर बसलं की आयुष्य थिजतं'... निवेदकाचे आणि 'वेताळाचे' संवाद तर मला फार आवडले.
शिवाय एक आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अर्धवट माहितीवर आधारीत काही नाही. UPSCच्या अभ्यासाबद्दल वाचताना , निदान मला तरी, ढोबळ चुका आढळल्या नाहीत. अभ्यासाचे विषय आले की बर्याच कादंबर्यांमध्ये अश्या चुका सापडतात आणि मग वाचताना चव बिघडते.
मला तरी कादंबरीतल्या निवेदकाची एकंदरीत धारणा choice-less awareness च्या जवळ जाणारी वाटली. फक्त कादंबरी वाचेपर्यंत हा choice-less awareness असा जोरात अंगावर येउन, गदागदा हलवून जागं करतो, हे मला माहित नव्हतं. :)
मात्र पुन्हा कधीतरी वाचण्यासाठी मला जरा हिम्मत गोळा करावी लागेल.
+१
फक्त शेवटी शेवटी काहीतरी घोळ झालाय.
(कदाचित इथल्या एकाची झाली तशी मनःस्थिती झालेली दाखवायची असावी)
आत्मचरित्रात्मक असावी का असा संशय येण्याइतपत कादंबरी वाटते.
अन्तराळ हे पुस्तक केवळ भेदक आहे. दलित साहित्यातील सर्वोत्क्रुश्त पुस्तक आहे. माणसे माण्साला किति वाइट वागवतात ते वाचुन अन्गावर काटा येतो. विशेशतः मेलेला बैल खाण्यासाठि केल्या जाणार्या वाट्णीचे वर्णन सुन्न करणारे आहे.
मी नुकतीच पंजाबातल्या शिखांच्या, नानकाना पंथाच्या इतिहासावर, खालसा पंथाच्या स्थापनेवर लिहिलेली 'व्याध' ही कादंबरी वाचली. लेखक प्रशांत असलेकर, मधुरा प्रकाशन. कादंबरीचा काळ सुमारे १६६६ ते १७१६ हा आहे.
शांतताप्रिय आणि शांततेबाबत आग्रही असणार्यालाही जुलूम, विश्वासघात, कपटीपणापायी अखेरीस सशस्त्र प्रतिकाराचाच मार्ग निवडावा लागतो हा या सा-या इतिहासाचा सारांश आहे. अर्थात कादंबरी असल्याने तपशीलाचे स्वातंत्र्य घेतले असणारच. पण एकंदरीत विषयच इतका जहाल आहे की परिणाम होतोच. काही काही भाग वाचून तर पुरंद-यांच्या 'सातशे वर्षांची काळरात्र'ची आठवण येते. मुघल सत्तेशी संबंधित कुठल्याही लेखनातून अमानवी क्रौर्य वगळणं शक्य नसावंच बहुधा..
या विषयावर हाती आलेलं हे पहिलंच पुस्तक, अजून वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
जी ए कसे नाहीत ?
'कादंबरी' असा विषय असल्याने!
In reply to जी ए कसे नाहीत ? by विटेकर
शून्य!
+१
In reply to शून्य! by कवितानागेश
ऑगस्ट?
तराळ
मी नुकतीच पंजाबातल्या