रामजन्मोत्सव
||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||
आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !
घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :)
इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ...
ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥ अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) ) मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते. श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ... लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे ! अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर .... आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ... सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !! दीपोत्सव
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥ बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !! दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ? (तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी ) राम
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥ उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥ साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥ कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥ वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥ जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥ ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥ कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥
(http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !)
आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो ....
दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ...
देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ...
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना |
बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
जय जय रघुवीर समर्थ
_______________________________________________________________________________________
(मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )
||तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
||इदं न मम् ||
In reply to मस्त !!! by धन्या
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by प्यारे१
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं.इथे सरसकट करण्याचा प्रश्न कुठे येतो? माझं वाक्य पुन्हा वाचा, "समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं." या वाक्यात "खुप आवडतं" च्या आधी मी "मला" हा शब्द लिहिला नाही कारण तो शब्द तिथे अध्याहृत आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मी पुर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडलं होतं. त्यात तुम्हाला सरसकटीकरण कुठे दिसलं?
त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो.खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. एक उदाहरण म्हणून पाहू या. मनाचे श्लोक ही समर्थांनी मराठी समजणार्या प्रत्येकाला दिलेली एक अनमोल भेट आहे. मनाच्या श्लोकांमध्ये रामाचे गुणगाण न करणारे बरेच श्लोक आहेत. आणि हे श्लोक डॉ. अल्बर्ट एलिस या विसाव्या शतकातील दुसर्या क्रमांकाच्या मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पद्धती (रॅशनल ईमोटीव्ह बिहेवियर थेरपी) शी साम्य सांगणारे आहेत. अगदी डॉ एलिस यांनी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन ही उपचार पद्धती बनवली असावी असे वाटण्याईतपत हे साम्य आहे.
आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही.माझ्या "विमानाच्या" प्रतिसादाची परतफेड केलीत तर. ;)
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by धन्या
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे.हाहाहा :)
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
In reply to ठंड रखो...! by अर्धवटराव
In reply to जैसन हुकूम सरकार. by प्यारे१
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
In reply to आवडला प्रतिसाद. by अजया
In reply to प्रतिसाद देणार नव्हतो तरी by सूड
जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्याच अंशी भासत नाही.इश्वर नाकारणारे मनाने खंबीर असतातच असे अजिबात नाही. असो.
In reply to सुड बोलत आहे म्हणजे मार्मीकच. by आत्मशून्य
In reply to ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे by प्यारे१
In reply to @पण दुसरं काही खात नाही हो by अत्रुप्त आत्मा
In reply to @पण दुसरं काही खात नाही हो by अत्रुप्त आत्मा
In reply to मुद्दे वेगळे आहेत. by प्यारे१
In reply to मुद्यातच चुकलात बघा! by अत्रुप्त आत्मा
In reply to मुद्दे वेगळे आहेत. by प्यारे१
In reply to जल्ला म्होरां तोऽऽऽऽ by सूड
In reply to ठंड रखो...! by अर्धवटराव
प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.पटलं. :)
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन. त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय.क्षमस्व. संत/देव्/ईश्वर हे तुमचं राखीव कुरण आहे विसरलोच. तुमच्या राखीव कुरणात घुसखोरी केल्यावर तुम्हाला असुरक्षित वाटणं साहजिक आहे. पण कसं आहे ना, कोणताही विचार, कोणतीही मते किंवा अगदी ईतिहासात होऊन गेलेली कुणी महान व्यक्ती ही कुणा एका व्यक्तीची, गटाची मक्तेदारी नसते. सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो.
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by धन्या
In reply to अरारारारा! by प्यारे१
तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?विरोधी भक्ती समजा. :)
In reply to देव/ ईश्वर नाही हे नि असे by प्यारे१
संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही.असं नसावं ते. तसं असतं तर समर्थांनी
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका ।।या ओळी लिहिल्याच नसत्या.
In reply to संतांच्या वाङ्मयाचा मुख्य by धन्या
In reply to वैयक्तिक परसेप्शनला सरसकट by धन्या
In reply to मस्त !!! by धन्या
In reply to ओ ओ धन्याकाका, by कवितानागेश
In reply to ओ ओ धन्याकाका, by कवितानागेश
In reply to ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | by बॅटमॅन
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
In reply to हे मात्र खरं. by प्रचेतस
In reply to तुमच्या मताचा आदर आहे. by धन्या
In reply to तुमच्या मताचा आदर आहे. by धन्या
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
In reply to इ by बॅटमॅन
तिकडे लक्ष वेधले तर लोक इतके हिरवेपिवळे का होताहेत?=))
In reply to समर्थांसारखी लोकं लै विषयांवर by कवितानागेश
समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.यात ना मी कशाला नावे ठेवली होती ना मी कशाला आक्षेप घेतला होता. मी देव वगैरे मानत नसूनही समर्थांचं लेखन एका वेगळ्या कोनातून मला भावतं असं केवळ एक विधान मी केलं होतं. मात्र स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी आपल्या खांद्यावरचे प्रवचनकाराचे उपरणे उतरुन खाली ठेवले आणि मला आखाडयात खेचले. हे म्हणजे जर तुमचे मत आमच्या मताप्रमाणे नसेल तर तुम्ही आमचे विरोधक झालात. काळ्या पांढर्या रंगांमध्येही करडया रंगांच्या अनेक रंगछटा असू शकतात हे काहींच्या पचनीच पडत नाही. मला याच धाग्यावरचा अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला..
प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.दुसरा आक्षेप काय तर म्हणे, रामजन्माच्या धाग्यावर असे कशाला लिहिले. धाग्याची सुरुवात समर्थांच्या नामघोषाने झाली असेल तर त्या धाग्यावर समर्थांच्या साहीत्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले तर बिघडले कुठे?
In reply to अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात by धन्या
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना | बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||हा श्लोक मस्तच!
In reply to लईच झ्याक लिवलंय की by सूड
दीपोत्सवअरे रामाला सुर्यदर्शन करवतात ! आता त्याला व्यवस्थित शब्द माहीत नाही , घरी "प्रथा आहे " इतकेच कळाले . मग पटकन सुचला म्हणुन तो शब्द वापरला :)
In reply to दीपोत्सव by प्रसाद गोडबोले
In reply to मुर्ती पाहुन शांत शांत वाट्ले by स्मिता श्रीपाद
In reply to छान लिहिलंय! by पैसा
In reply to समर्थ by पिवळा डांबिस
In reply to लेखन व चित्रे आवडली हो by रेवती
In reply to हो! मलापण फार आवडली by स्पंदना
|| श्रीराम जयराम जयजयराम ||