उभा देश हबकला होता त्या दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो. कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली.
प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या गावांमध्ये असेल. एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम !
त्यानंतर रोज खरेतर या प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका. नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. " एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न किलोमीटर सतत पळत होते ...............!!!!
"चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही"
इतकी प्रचंड शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे. अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त, शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज ....वगैरे. महाराष्ट्राच्या उन्नतीकामी हे शक्ती केंद्र खर्ची का नसेल पडले ? राजसत्तेचाच मुद्दा असेल तर पाच वर्षे प्रत्यक्ष सत्ता हातात होती. मोदींनी पहिल्या पाचच वर्षात रक्ताने बरबटलेल्या मातीत आर्थिक गुंतवणुकीची फवारणी केली आणि स्वत:चे स्थानही निर्माण केलं आणि गुजरातही उभा केला. नितीशकुमार तर सर्वार्थाने लहान. पण पूर्वी लालूंच्या कारकिर्दीत आपण ज्या बिहारची चर्चा करायचो तो बिहार आज राहिलेलाच नाही. सायकल मिळते म्हणून शाळेत जाणाऱ्या आणि शाळेत जायला लागल्यावर शिकण्यात रमलेल्या छकुल्यानी बिहार फुलून गेलाय. बिहारी आज बिगारी काम करायला महाराष्ट्रात येतच नाही. त्याला त्याच्याच गावी रोजगार मिळाला. त्यामुळे तो तिथे आपल्या घरी बायको मुलांसंगे सुखाने रहायला लागलाय. बदल आपल्या डोळ्यांसमोर घडतोय. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ?
....................आमची क्षमता किती आहे याचा अंदाज नाही आला ?
वाचने
24693
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to एक शंका???? by वरुण मोहिते
माननिय बाळासाहेबांना अखेरचा
देवाला रिटायर का करा?
In reply to माननिय बाळासाहेबांना अखेरचा by अनामिका
पुनश्च प्रत्यय आला
तसं कै नै काका...
In reply to पुनश्च प्रत्यय आला by सुधीर काळे
+१
In reply to तसं कै नै काका... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकीय हिंसा
In reply to +१ by चिरोटा
त्या गुंडगिरीचा फायदा जास्त
In reply to +१ by चिरोटा
कसा काय?
In reply to त्या गुंडगिरीचा फायदा जास्त by श्री गावसेना प्रमुख
जसे काय माहीतच नाही.
In reply to कसा काय? by विश्वनाथ मेहेंदळे
सगळेच सर्वज्ञानी नसतात.
In reply to जसे काय माहीतच नाही. by श्री गावसेना प्रमुख
मेहेंदळे साहेब इथे मुद्देसुद
In reply to सगळेच सर्वज्ञानी नसतात. by विश्वनाथ मेहेंदळे
हम आहभी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम!
In reply to मेहेंदळे साहेब इथे मुद्देसुद by श्री गावसेना प्रमुख
अहो १-२ ठिकाणी गुंडगिरी केली
In reply to मेहेंदळे साहेब इथे मुद्देसुद by श्री गावसेना प्रमुख
आता तुम्हीच सांगा तोटा किती
In reply to अहो १-२ ठिकाणी गुंडगिरी केली by विश्वनाथ मेहेंदळे
कैच्यकै
In reply to पुनश्च प्रत्यय आला by सुधीर काळे
मुद्दा असा आहे की कोणत्या
सहमत!!!!!!!!!!!!१
In reply to मुद्दा असा आहे की कोणत्या by अमोल खरे
बाळासाहेबांना आपल्या प्रशस्तीपत्राची गरज नाहीं
In reply to मुद्दा असा आहे की कोणत्या by अमोल खरे
+१११
In reply to बाळासाहेबांना आपल्या प्रशस्तीपत्राची गरज नाहीं by सुधीर काळे
+१११
>>>>>>>>>> हे एकदम मस्त
In reply to मुद्दा असा आहे की कोणत्या by अमोल खरे
जाता जाता- माझ्यासारखे असंख्य
In reply to मुद्दा असा आहे की कोणत्या by अमोल खरे
काळेकाकांशी १००००००००००००००%
सुरेख उत्तर, अनामिका!
In reply to काळेकाकांशी १००००००००००००००% by अनामिका
अगदि खरं आहे..
कित्येक वर्षे व कित्येक
अप्रतिम लेख. नक्की वाचावा असा
In reply to कित्येक वर्षे व कित्येक by अनामिका
WOW!
एक निरिक्षण
लीमाऊ तुमच्या माझ्यासारख्या
लेख आवडला.
महामानवांच्या महायात्रा
+१
In reply to महामानवांच्या महायात्रा by विकास
thanks, Vikas-ji
thanks, Sudhir-ji
In reply to thanks, Vikas-ji by सुधीर काळे
३५ लाख
कोटिच्या कोटि उड्डाणे ती हीच
In reply to ३५ लाख by श्रीरंग_जोशी
हाहाहा.
In reply to ३५ लाख by श्रीरंग_जोशी
डॉक्टरसाहेब काय हे ?इतकी
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to डॉक्टरसाहेब काय हे ?इतकी by अनामिका
"माणूस मोठा होता हे मान्यच
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढू द्या ...
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते त्यांची बहादुरी दाखवताय
In reply to वाढू द्या ... by सुनील
जोशी रोखठोककार वहावत जातात हे
माणसाचा मोठेपणा सिद्ध करायला