Skip to main content

स्वर्ग आणि नरक; खरा फरक

स्वर्ग आणि नरक; खरा फरक

Published on सोमवार, 14/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
एक माणुस देवाजवळ स्वर्ग आणि नरकाविषयी बोलत होता. देव म्हणाला , "चल दाखवतो तुला , आधी तुला नरक दाखवतो. देवाने त्या माणसाला एका मोठ्या खोलीच्या दारापाशी नेले. आत एका मोठ्या कढईसारख्या भांड्याभोवती बरीच मंडळी बसली होती. त्या मोठ्या भांड्यात चुलीवर काहीतरी शिजत होते. भोवतालची मंडळी उपासमारीने, भुकेने ग्रासलेली होती. सगळ्यांच्या हातात चमचे होते पण त्या चमच्यांचे दांडे खुप लांब होते , हातापेक्ष पण खुप लांब,. ओघानेच त्या भांड्यातले अन्न त्या चमच्यांने त्यांना घेता येत नव्हते.तोंडात घालता येत नव्हत. फार हालाची परिस्थिती होती. देव नंतर म्हणाला "चल तुला आता स्वर्ग दाखवतो ". अशाच दुसर्या मोठ्या खोलीच्या दारापाशी देवाने त्या माणसाला नेले. तिथही असच दृश्‍य होते. भांड्याभोवती बरीच मंडळी बसली होती. मोठ्या भांड्यात चुलीवर काहीतरी शिजत होते. असेच सगळ्यांच्या हातात लांब दांड्याचे चमचे होते. परंतु सगळे जण विलक्षण आनंदात हसत खेळत होते. या माणसान आश्चर्याने देवाला विचारले "हे कस काय? दोन्हीकडे सगळ्या गोष्टी सारख्याच असताना ते लोक इतके दुःखात आणि हे लोक इतके आनंदात कसे?" देवान उत्तर दिल, " सोपी गोष्ट आहे, इथले लोक एकमेकांना अन्न भरवायला शिकले आहेत. Ann landers
लेखनप्रकार

याद्या 4246
प्रतिक्रिया 10

फ्वार्वर्डेड म्येलांचं चांग्ल भाशांतर हाय! आबार

खरंतर हे उलटं असायला हवं, स्वर्ग मिळालेल्यांचा इगो एवढा मोठा असणार की ते कधीच एकमेकांना जेवु घालणार नाहीत, उलट नरक मिळालेली माणसं एकमेकांना मदत करतील, किमान इथं चांगलं वागलो याचा संदर्भ घेउन आपल्याला कधीतरी स्वर्ग मिळेल या आशेनं,

In reply to by ५० फक्त

खरंतर हे उलटं असायला हवं, स्वर्ग मिळालेल्यांचा इगो एवढा मोठा असणार की ते कधीच एकमेकांना जेवु घालणार नाहीत, ह्म्म्म... स्वर्ग हा त्रिदोष युक्त आहे. १) इथे असलेल्यांची आपआपसात स्पर्धा असते,कोणाचे पुण्य अधिक यावर... २)सतत पतनाची भिती असते,कारण पुण्य संचय संपल्यावर परत स्वर्गपतन होते. ३)स्वर्गात असुनही दु:खः असते,की अधीक पुण्य केले असता जास्त काळ इथे राहता आले असते,म्हणुन जास्त पुण्य करायला हवे होते, अशी भावना सतत स्वर्गस्थ जनांची असते. संदर्भ :--- मुद्ग्ल पुराण.

In reply to by ५० फक्त

स्वर्ग मिळालेल्यांचा इगो एवढा मोठा असणार की ते कधीच एकमेकांना जेवु घालणार नाहीत,
किती बरं झालं असतं, जर नेमकं असंच असतं तर ? पण तिथला प्रत्येक जण पक्का बेरकी आहे बरका , हे सालं पूण्य कमी कमी होत जात असत ना मग प्रत्येकाने आपापलं पूण्य/स्थान /जपायच तरी कसं तिथे ? मग तू माझी खाजव मी तूझी पाठ खाजवतो म्हणत, आपल काय ते मी तूला खायला देतो तू मला खायला दे म्हणत दोघही पूण्य कमावत राहून नरकातल्यांना कधी स्वर्गात यायची संधीच देत नसणार. नाही काय ? अशा ठीकाणापेक्षा मी तर म्हणतो मिसळपाव अनेकपटींनी श्रेश्ठ आहे.

स्वर्गात पण पोटाची खळगी भरायला लागतात ? मग तो कसला आलाय डोंबलाचा स्वर्ग ? आम्हाला वाटले स्वर्गात आपले सुरापान करता करता काय ३/४ द्राक्षे, काजू वैग्रे खायला लागत असेल तेवढेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>आम्हाला वाटले स्वर्गात आपले सुरापान करता करता काय ३/४ द्राक्षे, काजू वैग्रे खायला लागत असेल तेवढेच.>> त्या मोठ्या भांड्यात "सुरा" च नसेल , कशावरुन....;)