मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा (ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) (भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव) अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती उशीर? आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार? अन सरकार कसे हादरणार? (अर्जून रंगमंचावर येरझर्‍या घालतो.) माया: अर्जून, मी आले बघ. मी आताच श्रेया, रिषी, कविता, प्रणव यांना कॉलेजला न जाता या मैदानावर येण्याचा एसएमएस केला आहे. अर्जून: अग, कित्ती हा उशीर? (लाडात येवून) अन काय ग, कालच्या रात्रीच एसएमएस वाचला का? माया: चल चाव्वट कुठला! अरे आपण देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यात लढतोय ना? मग असले एसएमएस का पाठवतोस आता? ते नंतर पाठव आपला विजय झाल्यावर. मी पण मग नविन एसएमएस पॅक टाकते माझ्या मोबाईलमध्ये. त्यात सुरवातीचा एसएमएस फक्त एक रुपया अन नंतरचे १०० एसएमएसेस एकदम फ्री आहेत. आहे की नाही मज्जा. अर्जून: अन मायाबाई, तूम्ही तुमच्या मोबाईलमध्ये GPRS ईंटरनेट कनेक्षनपण अ‍ॅक्टीव्हेट करून घ्या हं बाई. तू फेसबूक वर नसतेस तर आपल्या आंदोलनात कित्ती कित्ती घोळ होतो बघ. माया: ए! बाई काय म्हणतोस? अज्जू, अरे मागल्या वेळी डॅडींनी डि-अ‍ॅक्टीव्हेट करायला लावले रे ते GPRS. प्लिज तू अ‍ॅक्टीव्ह कर अन बॅलन्सपण टाक ना! तुझ्या मायासाठी एवढेही करणार नाहीस तू? अर्जून: बरं बाई, आता आपला मोर्चा- आपलं ही प्रभातफेरी आटोपली की (तिला जवळ ओढतो) करतो सगळ. मग तर झालं. माया: अर्जून, आत्ता नको रे. कुणीतरी पाहील. (दुर जाते) (तेव्हढ्यात तेथे श्रेया, रिषी, कविता, प्रणव येतात.) कविता: हाय, आम्ही आलोत अन आहोत येथे म्हटलं. अर्जून: अरे या ना या. तुमचीच वाट पाहतोय प्रभातफेरीसाठी. अन काय रे रिषी, त्या टोप्या आणल्यात ना. रिषी: हो तर. या काय आहेत ना या श्रेयाकडे. काय ग श्रेया आहेत ना टोप्या तुझ्याकडे घालायला. म्हणजे डोक्यात घालायला! श्रेया: (लाजत) रिषी, तु अस्सा आहेस ना अगदी. अरे, टोप्या तर आहेतच पण एवढ्या सकाळी मॅकडोनाल्ड मध्ये जावून बर्गर आणि पिझ्झाज पण आणले आहेत पार्सल. कविता: बरं झालं बाई, कालच्या मोर्चाच्या वेळी कित्ती भुक लागली होती माहित्ये? प्रणव: बरं बरं आत्ता तुमचं राहू द्या आता. चला निघूया प्रभातफेरीसाठी. आधीच वेळ झालाय. (सगळे जण डोक्यात टोप्या घालतात. हातात बॅनर घेतात.) सगळे जण ओरडत जातात: आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!! आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!! (पडदा पडतो)

वाचने 1088 वाचनखूण प्रतिक्रिया 2

वसईचे किल्लेदार 10/09/2011 - 05:44
अगदी ज्वलंत नाट्य ऊभे केलेत हो. हा जाज्वल्य ईतिहास ऊर्जस्वल भाषेत शब्दबद्ध केल्या गेल्या आहे ... त्रीवार अभीनंदन!