Skip to main content

पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?).

Published on सोमवार, 16/08/2010
पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे. भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे. पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒! (आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांना क से काय सुचले दान करायला ? आधी आपल्या विकासाकडॆ ध्यान द्या !! )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 4397
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो ! परिकथेतील राजकुमार ? तुम्ही ख्ररेच परिकथेतील राजकुमार दिसता ! बरं का ? हा सगळं पाकिस्तान चा डाव आहे ! हिंदुस्तानाला बदनाम करण्याची एक ही संधी पाकडे सोडत नाहित ! पाकडे म्हणतात हे पाणीयुद्ध आहे ! किव येते ह्यांची !! निसर्ग आणि मानवातला दुरावा वाढत चाललेला आहे. त्यामुळे मानव आत्मघात ओढवून घेत आहे ! ह्या पुराला हिंदुस्तान जबाबदार नाही ! हिंदुस्तानाचा काहीहि सबंध नाही ! हिंदुस्तानाला बदनाम करु नये ! आणि हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो???

In reply to by संजयशिवाजीरावगडगे

=)) काका हलक्याने घ्या हो. =)) परा बहुतेक आत्ताच पीपली पाहुन आलाय, ब्लॅल कोमेडी केली त्याने ;) हा परा पण ना कधी कधी असा तडका देतो की नव्या मोहर्‍या लगेच तडतडायला लागतात. =))

In reply to by संजयशिवाजीरावगडगे

वाह वाह !! असे ओरडून बोलल्याने खोटे खरे होते का ? कुठे बाँबस्फोट झाला की तुम्ही पाकिस्तानच्या नावानी गळे काढणार. कुठे अपघात झाला की लगेच अपघातामागे परकिय ताकदीने घडवलेला घातपात म्हणुन आरडा ओरडी करणार. काश्मीर मध्ये तर कोणाला हार्ट-अ‍ॅटॅक आला तरी पाकिस्तानला जबाबदार धरतात म्हणे. हे सगळे गळे काढणे योग्य ? आणि आम्ही जरा कुठे शंका व्यक्त केली तर तुम्ही 'बदनामीचा डाव' म्हणुन शंख करणार होय ??

आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांना क से काय सुचले दान करायला ?
आणि अहो! यावेळी को णी उपोषण कराय लाही नव्ह तं बस लं ! बरं का?

In reply to by राजेश घासकडवी

आणि अहो! यावेळी को णी उपोषण कराय लाही नव्ह तं बस लं ! बरं का? अहो पुर्वी त्या गांधींच कोणी ऐकायच नाही, दाद द्यायच नाही म्हणून त्यांना उपोषण करायला लागायच... हल्लीच्या गांधींचा वचक दाणगा..... त्यांच्या इशार्‍यावरच हे दान दिले गेले असणार बघा....

पाकिस्थान सरकार आय . ए . एस च्या हातामधले बाहुले आहे व आय . ए . एस ही " फंडामेंटलीस्ट "अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना आहे आणि मेरा "महान" भारत सो कॉल्ड "सेक्युलर" आहे. ह्या त्रैराशीकात अनेक प्रश्नांची ऊत्तरे आहेत.

In reply to by तर्री

पाकिस्तान सरकार हे भारतीय नोकरशाहीच्या हातातले बाहुले आहे हे वाचून अतीव आनंद झाला. पण मुळात भारतीय नोकरशाही ही मूलतत्त्ववादी अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना असेल, तर ही मात्र चिंतेची बाब आहे. भारतीय नोकरशाहीला नाचवणारे मूलतत्त्ववादी नेमक्या कोणत्या धर्माचे, याचा मात्र उलगडा झाला नाही. अर्थात, सेक्युलर भारतात याने कदाचित फरक पडू नये. बाकी, भारत महान आहे याबाबत वाद नाहीच. अशी महान त्रैराशिके मांडणारे महान गणिती ज्या देशात आहेत, त्या देशाला महान असण्यावाचून गत्यंतर नाही.

In reply to by पंगा

_/\_ उचला आता आम्हाला. डायरेक्ट निवर्तलोच.. काय च्यायला समिकरणाचं प्रमेय सोडवलंय! लढ बाप्पू.... =)) =)) वैयक्तिक प्रश्नः आर्किमिडीज आपले कोण? :D

In reply to by धमाल मुलगा

वैयक्तिक प्रश्नः आर्किमिडीज आपले कोण? :D
मानसशिष्य. वस्त्रांना (ऑकॅमचा) वस्तरा* लावण्याची संकल्पना त्यांनी आमच्याकडूनच घेतली, असे आमचे प्रांजळ दृढमत आहे. (* Entities must not be multiplied beyond necessity.) आम्ही आणि रा. रा. श्री. आर्किमिडीज यांजमधील वैयक्तिक संबंधांत व्यक्तिगत रस घेतल्याबद्दल आम्ही आपले व्यक्तिशः आभारी आहोत. (रा. रा. श्री. आर्किमिडीज यांच्या वैयक्तिक मताबद्दल मात्र कृपया व्यक्तिशः त्यांच्याकडेच थेट चौकशी करावी, ही व्यक्तिगत विनंती.)

पाकिस्थान सरकार आय . ए . एस च्या हातामधले बाहुले आहे व आय . ए . एस ही " फंडामेंटलीस्ट "अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना आहे आणि मेरा "महान" भारत सो कॉल्ड "सेक्युलर" आहे. ह्या त्रैराशीकात अनेक प्रश्नांची ऊत्तरे आहेत.

आयला... ही बेनी कधी सुधारायची नाहीत बा. आता पासष्ट वर्षं होत आली तरी ह्यांचं तेच गुर्‍हाळ... च्यायला....ह्यांच्या कुठं एखाद्या लष्करशहाला पोर झालं तरी 'ह्या खोडसाळपणात भारताचाच हात आहे' अशी बोंब मारणार हे येड**. आता सगळ्या जगालाही कळलंय ह्यांच्या कोलांट्या कशा असतात ते.

पाकिस्तानात जे जे काही वाईट होते त्यामागे भारताचेच कारस्थान असते हो !! समजून घ्या हो.....

मला आय. एस. आय. म्हणायचे होते. क्षमा असावी. समजून घेतल्याबद्दल बिकांचे आभार.

पाणी पाणी म्हणुन विदर्भातील आंध्रातील व कर्नाटकातील शेतकरी ओरडत असताना तेच पाणी पाकिस्तानात फुकट सोडुन देणारया भारत सरकारचा जाहिर निषेध. हे फुकटची चैन आपल्याला परवडते कशी?

In reply to by वेताळ

अहो, अशी भारत सरकारवर टिका करणे योग्य नव्हे! तुमचा निषेध.. आपण पाणी-पाणी करून मेलो तरी चालेल, पण तिकडे पाकिस्तानात पाणी सोडून पूर आणला ना आपण? शत्रू राष्ट्राचे नुकसान हाच आपला फायदा! मी तर म्हणेन आता एखादा सुधारीत नद्याजोड प्रकल्प करून भारतातील सर्वच नद्यांचे पाणी पाकिस्तानात सोडून देऊ.. च्यायला, जाऊ दे ना पाकिस्तान एकदाचा पाण्यात.. काय म्हणताय?

In reply to by संजयशिवाजीरावगडगे

या अल्लाह ! दुसर्‍याचे वाईट चिंतण्याची हि कुठली प्रवृत्ती ?? वरचे प्रतिसाद वाचुन आज एक मिपाकर व भारतीय म्हणुन शरम वाटली.

!!पाणी पाणी म्हणुन विदर्भातील आंध्रातील व कर्नाटकातील शेतकरी ओरडत असताना तेच पाणी पाकिस्तानात फुकट सोडुन देणारया भारत सरकारचा जाहिर निषेध. हे फुकटची चैन आपल्याला परवडते कशी? इथे जो मुद्दा उपस्थित केला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे.. विधार्भानंतर बाभळीचा मुद्दा सुद्धा ताजाच आहे... पण इथे जे भारताचे, हिंदुत्वाचे निषेध करून वाभाडे काढले जातायत ते जरा खटकलं... हे अगदी दुसर्याच्या बापासाठी आपण मिशा काढण्यासारखा वाटता...