Skip to main content

शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.

Published on शुक्रवार, 13/08/2010
बीजिंग ओलम्पिक (८/८/८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर, शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०, १ मे ला जगासाठी खुले झाले, जगातील १७५ पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला आहे. हंग्पू नदीच्या काठी, ५ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर मध्ये बसलेले हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. चांगले (कि सुंदर ?) शहर, चांगले जीवन (BETTER CITY, BETTER LIFE) ह्या तत्वावर असलेल्या ह्या प्रदर्शनाच्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीत जगभरातून अंदाजे ७ करोड लोक भेट देतील अशी चीन ची अपेक्षा आहे. ह्या प्रदर्शनाची तारीफ करावी तेवढी कमीच. प्रदर्शनाचे अधिकृत संकेत स्थळ : मागे माझ्या एक मित्राने सहकुटुंब ह्या प्रदर्शनास भेट दिली. त्याने काही काढलेले फोटो (त्याच्या सहमतीने) डकवत आहे. जागतिक प्रदर्शन १ जागतिक प्रदर्शन २ जागतिक प्रदर्शन ३ जागतिक प्रदर्शन ४ त्याच्या कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रदर्शन एकदम झक्कास आहे. खूप गर्दी असते, त्यामुळे दिवसभरात ३-४ च विभाग (नावाजलेल्या देशांचे) पाहून होतात. सर्व देशांनी उत्तम कलाकुसरी तसेच आपापले तंत्रज्ञान दाखविण्याचा प्रयत्न केला आहे (भारत वगळता). भारताने जे प्रदर्शन जगापुढे ठेवले आहे ते बघता आपले प्रदर्शन किती दरिद्री आहे हे आपणास प्रत्यक्ष बघितल्यावरच कळेल. (अशी काही उदाहरणे दिली आहेत त्यांनी कि ती इथे सांगणे ठीक नव्हे). चक्क धंदा मांडला आहे काही ठिकाणी. तंदुरी काय, सामोसे काय, ररस्त्यावर जसे विकायला ठेवतात तसे ठेवले आहे. नट नट्यांचे फोटो, मुर्त्या, योगा दाखविणारी मंडळी ते व्यवस्थित करत नव्हती, एखाद्या नवख्या प्रमाणे सारखा तोल जात असे त्यांचा. बाकी आपल्या पाटलीन बाई सुद्धा जाऊन तारे तोडून आल्या तिथे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर पाकिस्तानचे प्रदर्शन सुद्धा चांगले होते भारतापुढे. बाकी वरील फोटो चघळता चघळता हे लेख देखील तोंडी लावणे. शांघायचा सामोसा! India's shoddy samosa & shawl show at Shanghai World Expo
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2850
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

लोकसत्तातला लेख वाचल्यावर आणि आपला लेख वाचून फोटो पाहिल्यावर असेच वाटते कि हे सरकारी बाबू लोक कदाचित शत्रू राष्ट्रांनी घुसवलेले असावेत...जिथे तिथे भारताची लाज वेशीवर टांगण्याचा त्यांना पगार मिळत असावा..

म्हणायच नसतं साहेब. कितीही पडलो तरी नाक वरच होतं हे सांगायला विसरू नये :) जागतिक प्रदर्शन काय आणि भारत प्रदर्शन काय आम्ही सगळ्यांना एकाच मापात तोलतो ( त्यामुळेच Handicraft चे स्टॉल्स लाउन मोकळे होतो) [अवांतरः आणि हो राजकारण्यांना नावं ठेवू नयेत नाही तरी सध्या फॅशनच आहे तशी ;) ]

हम नही सुधरेंगे... :( हे सगळं वाचुन फार वाईट वाटले... :( शिल्पा ब शी १००% सहमत... राष्ट्रभावना आहे का प्रदर्शन मांडणार्‍यांच्या मनात असा प्रश्न तुम्हाला पडेल काय ?

>> राष्ट्रभावना आहे का प्रदर्शन मांडणार्‍यांच्या मनात असा प्रश्न तुम्हाला पडेल काय ? अगदी वर्मी बाण मारलात मदनबाण जी... भारताचं हेच फार मोठं दुर्दैव आहे.. प्रदर्शन मांडणार्‍यांच्याच काय पण बहूतांश भारतीयांच्या मनात राष्ट्रभावनेचा आभाव आहे.. (नसलेल्या) देवावरच आता भिस्त या देशाची.. :(

लोकशाही एक अतिसामान्य समाज निर्माण करते (Democracy creates a mediocre society) असं कुठेतरी वाचलेलं आठवतं. ते खरं करुन दाखवण्याची जबाबदारी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही या नात्याने आपलीच नाही का? शिवाय तात्पुरत्या स्टॉलवर ४५ कोटी खर्च करण्यापेक्षा काही सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांचा कायमस्वरुपी फायदा होणे व्यावहारिक दृष्टीने जास्त बरोबर नाही का? राहिली गोष्ट नवीन उद्योगांना आकर्षित करण्याची, त्या साठी मुबलक मनुष्यबळ आपण दरवर्षी अविरतपणे तयार करतोच आहोत आणि शिक्षणाचा दर्जा योग्य त्या पातळीवर ठेवून बहुसंख्य लोक डोकं वापरु शकणार नाहीत याचीही काळजी आपण घेत आहोत.शिवाय आपलं ते वाईट आणि पाश्चिमात्य ते चांगलं असं आपण आपल्याच मनावर ठसवण्यात यशस्वी झालो आहोत त्यामुळे या अशा बाजारपेठेत नव्या कंपन्या झक मारुन येणारच. त्यासाठी स्टॉलची गरज नाही. आता राहिली गोष्ट देशाच्या प्रतिमेची आणि इज्जतीची वगैरे. त्यासाठी एक सुंदर गाणं आपण सगळे म्हणू या: "सुनो गौर से दुनियावालों, बुरी नजर ना हमपे डालो, सबसे ज्यादा होंगे हिंदुस्तानी" :-)

गांधीवादी असे आदर्श सदस्यनाम धारण करणार्‍या सदस्याकडून 'पाटलीन बाई सुद्धा जाऊन तारे तोडून आल्या तिथे" ह्या प्रकारचे अपमानास्पद विधान खटकले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जर आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी. (पण गांधीवादी असे नाम धारण करणाऱ्या हजारो राजकारण्यांकडून जेव्हा देशाचा / देशवासियांचा घनघोर अपमान केला जातो तेव्हा मी काय करावे ? हे मी केलेल्या कृत्याचे समर्थन अजिबात नाही. माझे चुकीचे आहे म्हणजे चुकीचेच. त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो.) जर संपादक परवानगी देत असतील तर मी हे वाक्य काढून टाकण्यास तयार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरोखरी अकलेचे तारे तोडले असतील तर या पेक्षाही अपमानास्पद विधान केले गेले पाहीजे. राष्ट्रपती झाल्यावर नातेवाइकांचे किती गुन्हे दडपले गेले हे वाचनात आल आहे का? अवांतर : गांधीवादी हे सदस्यनाम असेल तरच खटका पडतो. मी काहीही कॉमेंट करायला मोकळा आणि तुम्ही सुध्दा.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर पाकिस्तानचे प्रदर्शन सुद्धा चांगले होते भारतापुढे. यात नवल वाटण्या सारखं काय बर? चीन-पाकिस्तान मित्र देश आहेत. पाकिस्तानची एकंदर परिस्थिती पहाता, चीनने या प्रदर्शनातही पाठी मागुन (पिठ पीछे) मदत केली असेलच. :) अशी प्रदर्शन दुबईतही DSF दरम्यान होत असतात. तीथेही असेच वेगवेगळ्या देशांचे स्टॉल्स लागतात. ताजमहालची लालमहालाची प्रतिकृती उत्तम बनवल्या होत्या. इन्फॅक्ट ताजमहाल तर तिथल मुख्य आकर्षण ठरल होत म्हणतात. शक्यतो पुर्वी एका महिन्यानी या प्रतिकृती हटवल्या जात पण ताजमहाल ३-४ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवला होता म्हणे. नुसत्या प्रतिकृतीच नव्हे तर इतरही हस्तकलेचे नमुने, खाद्यजत्रा वगैरे पहाण्या/चाखण्या सारख असतं.

मलातरी गांधीवादींनी दिलेले फोटो बघून भारताचे प्रदर्शन आवडले. जर बनविलेले घुमट हा खरंच बांबुचा असेल तर ते सुंदर स्थापत्य आहे. त्या घुमटाचा घेर व रंगसंगती अतिशय आकर्षक वाटते. आतमधेही अगदी दुग्धक्रांतीपासून ते पुरातन शिलालेखांपर्यंत अनेक विषय नीट मांडलेले दिसले. सामोसे ठेवल्याने अगदी "नाचक्की" होईल हे पटले नाहि. दुसरी गोष्ट तुमच्या मित्राला अथवा वृत्तपत्रांच्या बातमीदाराला प्रदर्शनात दिलेली माहिती आधीच ओळखीची होती त्यामुळे तेच बघायचा कंटाळा आला असेल किंवा त्यामुळे अति चिकित्सेने दोष दिसले असतील. मात्र परदेशी लोकांसाठी हे सारेच नवे आहे. तेव्हा त्यांना त्यांच्याकडेही असणार्‍या हायटेक गोष्टी दाखवण्यापेक्षा "तेच ते" टाळून खास देशी दुग्धक्रांती, कुटीरोद्योग, भारतातील विविधता त्यांना दाखवणे मला तरी आवडले.

In reply to by ऋषिकेश

शिवाय ...भारताच्या स्टॉलच्या बाहेर 'भारत' असं देवनागरीत सगळ्यात वर आहे, त्याखाली रोमन लिपीत आणि त्याखाली मँडरीन (का कॅंटनीज, का दोन्ही) मधे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रथमदर्शनी मलाही भारताचे प्रदर्शन आवडले. देवनागरीत लिहिलेलं "भारत"ही भावलं!

In reply to by अनामिक

मलासुद्धा देवनागरीत लिहिलेलं "भारत" आवडलं..पण जे खाद्यपदार्थांचे stall वगैरे अजिबात आवडलं नाही...त्याऐवजी काही short फिल्म्स ज्या भारतीय संस्कृतीबद्दल सांगतील अशा कायम एखाद्या स्क्रीनवर चालू ठेऊ शकत होते...झालंच तर वेगवेगळे उत्सव, पेहराव वगैरे..

In reply to by शिल्पा ब

४१ कोटी एवढा खर्च करुन ही दशा आहे. CWG च्या भानगडींबध्दल आता का बोंबलायच? यानी इथे खाल्ल, त्यानी तिथे खाल्ल. वाचा आणि वांझोटी चर्चा करुन गप्प बसा.