मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व. इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:)) यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो ....
पुण्यातील "मिपा कट्ट्याच्या" उत्तुंग यशानंतर व त्याचसुमारास दिल्लीत गाजलेल्या व शिवसेनेच्या संजय राउतांनी आयोजीत केलेल्या "मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मेजवानीच्या" पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा "मिपा कट्टा तोही खाद्यसंभेलनासगट [ म्हणजे थोडक्यात खादाडी ] म्हणजे ज्याची थीम मिसळपाव असेल असे संभेलन " भरवण्याची मागणी जोर धरू लागली. आख्या जगभरातून खरडींचा, व्य. निंचा व फोनचा तात्यांवर मारा सुरू झाला. शेवटी सर्वानुमते हा फस्कास कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरले. "काडीसम्राट छोट्या डॉनने" यावेळीही हा कार्यक्रम आयोजीत करण्यात पुढाकार घ्यायची तयारी केली पण मागच्या वेळेसचा त्याचा "काडी टाकून " पळून जाण्याचा अनूभव जमेस धरून त्याला "तू फक्त [ जमल्यास] हजर रहायचे बघ " म्हणून परस्पर टोलवण्यात आले. शेवटी "महामहिम तात्यासाहेब, 'धुरं'धर;महापराक्रमी असलेला देशमुखांचा छावा सर्वस्वी धमाल मुलगा , इनोबा ठाकरे , विजूभाउ,डॉक्टरसाहेब, पेठकर साहेब व कांदळकर काका " अशी कार्यकारणी ठरवण्यात आली........... आता कट्ट्यासाठीचा कारभारीपणा आपल्याकडे आहे म्हणून तात्यांनी लगेच हा कार्यक्रम "ठाण्यातच" आहे असे समजून पुढची आखणी करायला सूरवात केली पण यामुळे मोठ्ठा गोंधळ होउन शेवटी चर्चा करून सर्वमान्य ठिकाणी संभेलन घेण्याचे ठरवले. त्यानुसार चर्चा सुरु झाली. सहाजीकच त्याला अनेक फाटे फुटले, तात्या;सृलाताई;पेठकरसाहेब व बाकी मुंबईकरांच्या मते हा कार्यक्रम केव्हाही "मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या ठाण्यात किंवा गिरगावात" घ्यावा तर इनोबांनी हा कार्यक्रम "गेली १०००० वर्षे मराठी संस्कृतीची जपणूक करणाऱ्या पुण्यात घ्यावा" अशी मागणी केली व त्याला आपसूकच आनंदयात्री, केशवसुमार, छत्रपती, चित्तर, विजूभाउ, मनस्वी, भुईनाळा, संजोपराव यांचा पाठिंबा लाभला. त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली. याउप्पर छोटा डॉन, स्वयंभू, आर्य, अबब च्या मते हा कार्यक्रम "दक्षिणेत घेणे योग्य" कारण त्यानिमीत्ताने आपल्याला तेथेही हातपाय पसरता येतील. त्याबरोबर लगेच डांबिसकाका, प्राजू, सर्कीट, नंदन, बेसनलाडू, कोलबेर, टिंग्याच्या मते हा कार्यक्रम म्हणजे " मराठी संस्कृतीला सातासमुद्रापार न्हेण्याची सुवर्णसंधी " आहे म्हणून तो "यक्षनगरीत" घेणे चांगले असा त्यांचा प्रतिवाद सुरु झाला. "धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले. आता या घोळात "कार्यक्रमाचा बोऱ्या वाजतो काय ?" या शंकेने व कदाचित विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले. शेवटी प्रत्येकाने समझोता म्हणून "पुण्यात" यायचे ठरवले. कांदळकार काका पण औरंगाबाद वरून येण्यास तयार झाले.... तरी शेवटी सृलाताईंनी "शी बाई, काय ते पुणे ? आमच्या मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार" असा सूर लावला. त्यावर भडकून धमाल व विनोबाने दिवसाच काय पण रात्रीपण कितीही वाजता आणि काय काय म्हणजे " कॉफी, ब्रेड बटर, सॅ॑डविच, सामोसा, पोहे, अ॑डा / चिकन बिर्याणी, ऑम्लेट, भुर्जी पाव, चिकन मसाला, चिकन कलेजी, कटलेट, लस्सी, प॑जाबी डिशेस, खर्डा-झुणका भाकरी आणि सर्व प्रकारच्या दारवा " असा आख्खा पुण्याचा रात्रीचा मेनू तिच्यासमोर आदळला. त्यावर सृला ने "मला पुण्याबद्दल असे म्हणायचे नव्हते, माझ्या विधानाचा विपर्यास झाला." असे म्हणने मांडून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व शेवटी "पुणे तिथे काय उणे ?" हे मान्य करून आपली काहीही हरकत नसल्याचे कबूल केले.... मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले. तर या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण "अनुष्काभाभी" असणार ही जवळजवळ "काळ्या दगडावरची पांढरी रेघ " आहे अशी सर्वांची खात्री झाली. पण यात एक गोम होती, तात्यांनी " मी अनुष्काला आणतो पण या संपूर्ण कार्यक्रमासाठी बल्लवाचार्याची भूमिका सर्वश्री पेठकरकाकांनी संभाळावी " अशी अट घातली. त्यावर उसळून पेठकर साहेबांनी " आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय. थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)" अशी धमकी दिली. त्यावर "पुण्याच्या पेशव्यांनी" हा पश्चाताप कमी करण्यासाठी 'अस्सल बेळ्गावी लोणी (पिठ मिसळलेले का होईना!)' आणण्याचे कबूल केले. *** शेवटी सगळ्यांच्यात "दिलजमाई" होउन शेवटी हा " कार्यक्रम पुणे मुक्कामी अनुष्काच्या उपस्थीतीत व पेठकरकाकांच्या हातून बनलेल्या मिसळीला साक्षी ठेउन होईल" असा फतवा जारी करण्यात आला.*** क्रमशः ...

वाचन 11332 प्रतिक्रिया 0