अनुभव: अनोळखी आपुलकी
(मी मूळचा रहाणारा नांदुर्याचा! मी काही काळाकरता कोकणात गुरांचा डॉक्टर म्हणून नोकरीला होतो.
आता रिटायर झालेलो आहे.त्यावेळी मला आलेला एक आपुलकीचा साधा अनुभव येथे सांगतो.)
ते होते १९६५ साल.
जुलै महिना. चौदा तारीख.
कोकणात गेल्या सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता...
पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
रात्रीचे दहा वाजले होते. मी झोपण्याच्या तयारीत होतो. तोच दारावर थाप पडली.
"डॉक्टर साहेब आहेत काय?"
मी दरवाजा उघडला. समोर ५-६ जण उभे होते. एकाच्या हातात गसबत्ती होती. सर्वांच्या अंगावर घोंगड्या होत्या. मांडीला अर्धे धोतर.
"आत या!"
सर्वजण घोंगड्या झटकून आत आले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.
"काय काम आहे?" मी विचारले. त्यातला एक जण सांगू लागला, "डॉक्टरसाहेब! या माहादूच्या बैलाची व शेजारच्या बैलाची झुंज झाली. त्यामध्ये याच्या बैलाचे शिंग तुटले व खुप रक्तस्त्राव झाला. बैल जमीनीवर पडला. उठत नाही, चारा खात नाही! तुम्हाला घ्यावयास आम्ही आलो आहोत."
मी आवश्यक ती तयारी करून त्यांच्याबरोबर जायला निघालो.
समोर तीघेजण, मध्ये मी व मागे तीघेजणं!
पाऊस सारखा पडत होता. मी छत्री व रेनकोट घेतला होता.
मजल दरमजल करत आम्ही निघालो. कारण तेरा चौदा कि.मी. वर त्याचे घर होते.
एकच नदी. आम्ही पाच्-सहा जण ओलांडत निघालो.
पाच सहा घरे असलेल्या वाडीवर रात्री दोन वाजता पोहोचलो.
बैल बसलेला होता.
आवश्यक तो औषदोपचार केला. चार्-पाच सलाईन लावल्या.
बैल उठून उभा राहीला.
सकाळचे चार वाजले.
रात्रभर जागरण!
त्यांनी मला सरपंचांकडे आरामाला नेले.
मी तेथे आराम केला.
पुन्हा दहा वाजता बैल पहाण्यास गेलो. बैल चारा खात होता. पुन्हा योग्य तो उपचार केला, व त्यांना मी म्हणालो, "आता आपण निघू!"
तव्हा ते म्हणाले, "तुम्ही एकटेच आहात.तुम्ही आता जेवण करून घ्या व नंतर आपण निघू!"
मी हो म्हणालो.
आम्ही बारा-साडेबारा वाजता जेवण केले. पाऊस सारखा पडत होता. तीन्-चार वाजता निघायचे ठरल्यावर मी पुन्हा सरपंचांकडे आराम करण्यास निघालो.
मी व सरपंच गप्पा मारत बसलो होतो. ...
.... तोच एक बाई रडत रडत सरपंचाकडे आली व घाबरत म्हणाली, "डॉक्टरला चुकून खाऊ घातले ....."
मी ताडकन उभा राहीलो व म्हणालो, "काय खाऊ घातले?..."
ती म्हणाली, "एका टोपलीत गव्हाचे पीठ होते व एका टोपलीत नागली चे पीठ होते. चुकून नागलीच्या पीठाच्या पोळ्या करून डॉक्टरांना खाऊ घातल्या."
माझा जीव भांड्यात पडला.
डॉळ्यातून आसू आले.
मी म्हणालो,"मावशी, नागलीच्या पीठाच्या पोळ्या किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या काय! शेवटी दोन्ही अन्नच! तुमच्या कडचे जेवून मी तृप्त झालो."
ती म्हणाली," पण माझा मुलगा मला सारखा बोलतो आहे की तू डॉक्टरला मुद्दाम नागलीच्या पीठाच्या पोळ्या खाऊ घातल्या!"
... मग मी त्या मुलाला समजावले.
आजही मला ही अनोळखी आपुलकी आठवते.
--- रिटायर्ड - डॉ. वसंत वडाळकर (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी)
याद्या
3253
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
खरंच हृद्य
+१
In reply to खरंच हृद्य by बिपिन कार्यकर्ते
छान
मस्त आठवण
खुप छान अनुभव आहे.
आठवण
साधी पण हृद्य आठवण !
आठवण वाचुन
छान.
असेच बोल्तो..!
In reply to छान. by प्रमोद देव
सुंदर आठवण!
डॉक्टरसाह
असेच म्हणतो
In reply to डॉक्टरसाह by विसोबा खेचर
छान