Skip to main content

कवि भुषण कविता क्र. ३

लेखक नितिनकरमरकर यांनी शुक्रवार, 12/03/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी । सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । भूषन भनत नाद बिहद नगारन कें । नदी नद मद गैबरन के रलत हैं । ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल । गजन की ठैल पैल सैल उसलत हैं । तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि । थारा पर पारा पारावार यों हलत हैं ॥ अर्थ :- शिवराय सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवी भूषणांनी वर्णिलेला आहे सिंहासम शूर शिवराय चतुरंग सैन्य तयार करून विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरीता निघालेले आहेत, नगार्‍याचा भयंकर ध्वनि होऊ लागलेला आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थलातून निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे, सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लीत कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तिंच्या एकमेकांवर रेलण्यामूळे डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे की एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एखाद्या लहानशा तार्‍याप्रमाणे दिसू लागलेला आहे. समुद्र तर ताटात धावणार्‍या पार्‍याप्रमाणे सारखा आंदोलन पावत आहे. ही कविता म्हणजे अतिशयोक्ती वाटते कारण शिवरायांच्या सैन्यात हत्ती जवळ जवळ नसतच. त्यांचे युद्ध तंत्र गनिमी काव्यावर अधारीत असल्यामुळे हत्ती सारखा बोजड प्राणी काहीही उपयोगाचा नव्हता. वेग आणि अकल्पितता (Speed and surprise) हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे शस्त्र होते! तसेच इतका गाजावाजा करुन ते कधीही युद्धाला निघलेले नाहीत. कुतुबशहा च्या भेटीसाठी जाताना मात्र ते ह्त्तीवरून गेले होते. समोरासमोर चे युद्द फक्त ३ ते ४ वेळा झाले असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1516
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया