मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२०२४ लोकसभा निवडणूक.

अमरेंद्र बाहुबली · · राजकारण
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

वाचने 34771 वाचनखूण प्रतिक्रिया 396

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यापेक्षा ते दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम यात्रा करणाऱ्यांना जमिनीबद्दल जास्त माहिती असणार ना ? किंवा मग जमीन व्यवहारातले तज्ञ जवाऊबापूंना विचारू शकता

In reply to by अमरेंद्र बाहुबली

१९९७ ते २०१५ पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. एवढेच म्हणेल दूरदृष्टी असलेला सर्वात शिक्षित प्रधानमंत्री म्हणजे श्री नरेंद्र मोदी. बाकी ज्यांना दहा वर्षात देशात झालेली प्रगती आणि कमी झालेला भ्रष्टाचार दिसत नाही आणि स्वतः ला शिक्षित म्हणवून घेतात मला फक्त त्यांची कीव येते.

In reply to by विवेकपटाईत

दहा वर्षात देशात झालेली प्रगती आणि कमी झालेला भ्रष्टाचार दिसत नाही काही पुरावे आकडे आहेत का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एम आय एम ला किंवा मुस्लिम लीगला सुद्धा मत दिले तर चालेल म्हणा कि काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाबुराव 27/04/2024 - 00:03
कुणालाही मत द्या. भाजपला नको
बरोबर. दहा वर्षातल्या विकासाच्या मुद्द्यावर लढण्याऐवजी हे, गाय,गोबर, हिंदु-मुस्लिम याच्या पलीकडे यांच्याकडे मुद्देच नाहीत.
श्री ध्रुव राठी ह्यांचा हा व्हिडीओ पहिला. भारतीय मीडिया गोदी मीडिया झाल्यामुळे खरं आपल्या पर्यंत पोहोचत नाहिये. श्री. ध्रुव राठी मोदींचे अनेकक घोटाळे तसेचक मोदिनी बोललेलं खोटं बाहेर काढत असतात. ध्रुव राठी नसते तर्क कदाचित आपल्याला मोदींचे आर्थिक घोटाळे कधीही कळाले नसते. https://youtu.be/9Gmp2BAB3VA?si=zhy1K3qZTq9JNlmu

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

In reply to by आग्या१९९०

ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का?

In reply to by Trump

शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क जरी नसला तरीही योग्य वयात विषारी , विखारी आणि खोट्या प्रचारापासून दूर राहतील. भविष्यात विचार करून मतदान करतील.

In reply to by आग्या१९९०

हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही खूप वाढले आहे नी व्हिडीओचे व्हायव्ह कोटींमध्ये गेलेत. शलाक आणिर कॉलेजच्या मुलात ध्रुव खूप प्रसिद्ध झालाय. गोदी मीडियामुळे खरी माहिती मिळवायला ध्रुव राठीचे व्हिडीओस लोक पाहताहेत. टॉप चे भारतीय युट्यूबर्सही ध्रुव राठीचा रिफरन्स देताहेत. उदा. lallantop.
काँग्रेसच्या मेनिफिस्टोत कुठेही वेल्थ डिस्ट्रीबुशन शब्द नाही. भाजपचे अंधभक्तगण नी काही खोटारडे “फेकू” नेते खोटं पसरवताहेत. सावध राहा.
रिकाम्या खुर्च्या पाहून फडणवीसांची सभेला दांडी. :) कोण एकायला जाणार रटाळ टेप? https://www.saamana.com/devendra-fadanvis-not-came-for-rally-because-of-less-people-turn-out-in-vardha/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0-58Wkd2Y6QqWoxhF-tS28p-Kuy1YA2t5gQD4M0dCHfjCwJNcrKXXGgwc_aem_AffWNHOyQosTZDfhJNJP-gSr0aFJwW-r2Lw8tXETc8G1i_YSR-8AfbWlJ6j65cSfUjDZf1KOmdIdXxKJaYVNJIjz#lvgfsgokzyqt8k5oiql
शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण, असे अनेक लोक घेऊनही आणी शिवसेना, राष्ट्रवादीचे चिन्ह चोरूनही भाजप महाराष्ट्रात जिंकेल ह्याची शक्यता नसल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात आखली म्हणजे नरेंद्र मोदीना व्यवस्थित फिरता येईल. किती ती भीती?? ८० वर्षाच्या योध्याची नी बाळासाहेबांच्या सुपुत्राची?
नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही जागा भाजपा हरणार. असेच ४५ ते ५५% मतदान होत राहिले तर भाजपा उत्तर प्रदेशात दहा जागा ही जिंकणार नाही. उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान राज्यात भाजपाच्या जागा निम्म्याहून कमी होणार. १६४ पैकी फक्त ५० जागा मिळतील.

In reply to by कंजूस

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. जनतेचा टैक्स चा पैसा फिरून पुन्हा जनतेकडे येतोय म्हणून जनता खुश आहे. भाजपशासित राज्यात अदानी, अंबानी, नी भाजप नेत्यांकडे जातो.
पत्रकार नेहा पुरव यांना अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमकीचा मुंबई प्रेस क्लब निषेध करतो. मुंबई उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्याबद्दल बातम्या दिल्याबद्दल पत्रकाराला दिलेल्या धमकीच्या घटनेचा मुंबई प्रेस क्लब तीव्र निषेध करतो. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पत्रकार नेहा पुरव यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आणि त्यांना पीयूष गोयल यांच्यावर टीका करणारी बातमी प्रकाशित न करण्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी, नवाकाळ सोबत काम करणाऱ्या पूरवने बातमी दिली होती की, गोयल यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान उत्तर मुंबईतील मासळी मार्केटला भेट देताना माशांच्या वासाने अस्वस्थता व चिंता व्यक्त केली, नाक मुरडले होते.. पत्रकार नेहा पुरव यांना धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिसांना विनंती आहे.
“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान. https://politicalmaharashtra.in/sharad-pawars-big-statement-is-that-giving-another-chance-to-narendra-modi-is-dangerou-79343/
पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..” https://www.loksatta.com/elections/uddhav-thackeray-is-sitting-with-those-who-believe-in-aurangzeb-says-pm-narendra-modi-in-kolhapur-scj-81-4342218/ ---- आमची तर लिंक आली बाबा... ---

In reply to by मुक्त विहारि

डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे ---- दीवार, सिनेमा आठवला.... कांग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षाना, मी कधीच मत देणार नाही...
भाजपमधेही घराणेशाही चालते म्हणणार्या लोकांसाठी एक नव्याने घडलेली घटना. भाजपने पूनम महाजन, प्रमोद महाजन यांच्या कन्येचे तिकिट बिनदिक्कत कापून त्याजागी उज्वल निकम या गाजलेल्या वकिलांना तिकिट दिले आहे. आता हा निर्णय योग्य की अयोग्य ते काळच सांगेल. पण भाजपच्या गणितानुसार पूनम महाजन यांच्यापेक्षा निकम यांचे पारडे जड आहे. म्हणून पूनम महाजन यांची पूर्वपुण्याई किंवा वारसाहक्क याचा विचार न करता सरळ त्यांचे तिकिट कापले. तसेही पक्षात पूनम महाजन ह्या मोठ्या वाटाघाटी, राजकीय समीकरणे, तिकिट वाटप अशा महत्त्वाच्या कामात सहभागी होताना दिसत नाही. त्यांचे वडिल एक उच्चपदस्थ भाजप अधिकारी होते आणि ते अशा गोष्टी करत असत. पण असे अधिकार भाजपमधे वंशपरंपरेने हस्तांतरित होत नाहीत ही बाब येथे अधोरेखित होताना दिसते. या पार्श्वभूमीवर हे आठवा की आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येता यावे म्हणून शिवसेनेने आपल्या एक दोन सिटा बळी म्हणून राष्ट्रवादीला देऊन टाकल्या होत्या.