Skip to main content

२०२४ लोकसभा निवडणूक.

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 22/04/2024 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

वाचने 35072
प्रतिक्रिया 396

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मंडपवाल्याने खुर्च्यांना खाजकुयली लावल्याचे सांगितले जाईल

शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण, असे अनेक लोक घेऊनही आणी शिवसेना, राष्ट्रवादीचे चिन्ह चोरूनही भाजप महाराष्ट्रात जिंकेल ह्याची शक्यता नसल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात आखली म्हणजे नरेंद्र मोदीना व्यवस्थित फिरता येईल. किती ती भीती?? ८० वर्षाच्या योध्याची नी बाळासाहेबांच्या सुपुत्राची?

नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही जागा भाजपा हरणार. असेच ४५ ते ५५% मतदान होत राहिले तर भाजपा उत्तर प्रदेशात दहा जागा ही जिंकणार नाही. उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान राज्यात भाजपाच्या जागा निम्म्याहून कमी होणार. १६४ पैकी फक्त ५० जागा मिळतील.

इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे मोदीसाठी काम करतंय तर मतमोजणी निपक्षपातीपणे करत असेल का??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाही ना? मग आता मोदी येणारच! काय रडारड करायची त्याला सुरुवात आताच करा.

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. पण केजरीवाल तुरुंगात हे लोकांना खपले नाही.

In reply to by कंजूस

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. जनतेचा टैक्स चा पैसा फिरून पुन्हा जनतेकडे येतोय म्हणून जनता खुश आहे. भाजपशासित राज्यात अदानी, अंबानी, नी भाजप नेत्यांकडे जातो.

पत्रकार नेहा पुरव यांना अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमकीचा मुंबई प्रेस क्लब निषेध करतो. मुंबई उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्याबद्दल बातम्या दिल्याबद्दल पत्रकाराला दिलेल्या धमकीच्या घटनेचा मुंबई प्रेस क्लब तीव्र निषेध करतो. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पत्रकार नेहा पुरव यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आणि त्यांना पीयूष गोयल यांच्यावर टीका करणारी बातमी प्रकाशित न करण्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी, नवाकाळ सोबत काम करणाऱ्या पूरवने बातमी दिली होती की, गोयल यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान उत्तर मुंबईतील मासळी मार्केटला भेट देताना माशांच्या वासाने अस्वस्थता व चिंता व्यक्त केली, नाक मुरडले होते.. पत्रकार नेहा पुरव यांना धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिसांना विनंती आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ये बात कुछ हजम नही हुई...

“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान. https://politicalmaharashtra.in/sharad-pawars-big-statement-is-that-giv…

In reply to by मुक्त विहारि

शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुध्द खरे असते. आजवरचा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..” https://www.loksatta.com/elections/uddhav-thackeray-is-sitting-with-tho… ---- आमची तर लिंक आली बाबा... ---

In reply to by मुक्त विहारि

डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे ---- दीवार, सिनेमा आठवला.... कांग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षाना, मी कधीच मत देणार नाही...

भाजपमधेही घराणेशाही चालते म्हणणार्या लोकांसाठी एक नव्याने घडलेली घटना. भाजपने पूनम महाजन, प्रमोद महाजन यांच्या कन्येचे तिकिट बिनदिक्कत कापून त्याजागी उज्वल निकम या गाजलेल्या वकिलांना तिकिट दिले आहे. आता हा निर्णय योग्य की अयोग्य ते काळच सांगेल. पण भाजपच्या गणितानुसार पूनम महाजन यांच्यापेक्षा निकम यांचे पारडे जड आहे. म्हणून पूनम महाजन यांची पूर्वपुण्याई किंवा वारसाहक्क याचा विचार न करता सरळ त्यांचे तिकिट कापले. तसेही पक्षात पूनम महाजन ह्या मोठ्या वाटाघाटी, राजकीय समीकरणे, तिकिट वाटप अशा महत्त्वाच्या कामात सहभागी होताना दिसत नाही. त्यांचे वडिल एक उच्चपदस्थ भाजप अधिकारी होते आणि ते अशा गोष्टी करत असत. पण असे अधिकार भाजपमधे वंशपरंपरेने हस्तांतरित होत नाहीत ही बाब येथे अधोरेखित होताना दिसते. या पार्श्वभूमीवर हे आठवा की आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येता यावे म्हणून शिवसेनेने आपल्या एक दोन सिटा बळी म्हणून राष्ट्रवादीला देऊन टाकल्या होत्या.

In reply to by हुप्प्या

व्यवहार्य निर्णय. तसंही पूनम महाजनांमागे भाजपमध्येही फारसं पाठबळ असेल असं वाटत नाही.

In reply to by गणेशा

विश्लेषणात्मक, आकडेवारी पुर्ण लिखान मिळाले नाही.. अस काही लिहिलं तर “अंधभक्त” हे स्टेट्स जाईल ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यात काय, महाविकास आघाडीला फायद्याचंच की मग?

पूनम महाजन ह्याच तिकीट कापून भाजपला अक्कल आली असे म्हणावे लागेल. अश्याच प्रकारे घराणेशहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस, दानवे, गणेश नाईक कुटुंब , राणे कुटुंब ह्यांचे तिकीट विधानसभेला कापावे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजप किंवा कुठलाही पक्ष अशा आरोपांना उत्तर देण्यापेक्षा उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमताच विचारात घेणार, दुसरं काय?

सदाभाऊ खोत म्हणाले, कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे. https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6143

मराठा समाजाच्या एकीमुळेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे.- जरांगे पाटील. https://marathi.indiatimes.com/maharashtra/beed/manoj-jarange-patil-say… खरे आहे. मराठ्यांच्या झालेल्या फसवणुकी मुळेच मोदीना धावपळ करावी लागतेय असे वाटतेय.

गुजर गयी रात, कंपनी गई गुजरात! शिवसेनेचा भाजपवर थेट निशाणा; VIDEO ठरतोय लक्षवेधी https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/lok-sabha-electi…

संपादक महोदय, हा धागा प्लीज अर्काईव्ह करुन ठेवा, कोणी कितीही काहीही लिहिले तरी संपादित करु नका . निवडणुक निकाल लागल्यावर इथे तुफ्फान मजा येणार आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी अगदी अनेकांची बोलती बंद होणार आहे... आज बोलून घेऊ द्या.. नंतर तोंड लपवायला जागा रहाणार नाही

In reply to by अहिरावण

नंतर तोंड लपवायला जागा रहाणार नाही
ह्यॅ ह्यॅ , तसं अजिबात नसतंय . उलट निवडणुक हरल्यानंतर खरा गेम सुरु होतो. हे घ्या पोस्ट-इलेक्शन टूलकिट : १. सर्वप्रथम ई.व्ही.एम च्या नावाने रडायला सुरुवात करायची. २. त्यानंतर भाजपा ने बहुमत चुराया है असे म्हणायचं अन रडत रडत आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे असे म्हणायचं ३. त्यानंतर एक फॉरेन / नेपाळ ट्रिप ( यु नो व्हॉट आय मीन ;) ) ४. मग देशविघातक कारवाया करणार्‍यांन्ना उद्युक्त करायचं . भारत तेरे तुकडे होंगे ... इन्शा ... वगैरे म्हणणार्‍यांना समर्थन द्यायचे. ५. मग हिवाळा आला की दिल्लीच्या सीमेवर कोणते तरी कारण काढुन आंदोलन करायचे, अन रस्ते जाम करायचे. ६. मग कोणत्या ना कोणत्या राज्यात, तिथल्या तथाकथित उच्चवर्णीय गटातील प्रत्यक्षात मागास लोकांना आरक्षणाचे गाजर दाखवुन आंदोलन उभारायचे. ७. अधुन मधुन काहीतरी नॉन-इश्यु काढुन उगाळत बसायचे. म्हणजे कसे की गल्ली बोळात चिंधी चोरी झाली तरी त्याला मोदी कसे जबाबदार अशी चर्चा सत्रे चालवत रहायची. ८. मग विदेशात जाऊन तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन भारताविरुध्द गरळ ओकायची अन लोकशाही पध्दतीने सरकार निवडुन आणाणारे बहुतांश भारतीय कसे मुर्ख आणि फॅसिस्ट आहे अन आपणच कसे शहाणे आहोत ह्यावर प्रवचने देत रहायचे. ९. बाकी जिथे मिळेल तिथे - साहित्य संम्मेलने , कला , आर्ट फिल्मफेस्टिवल वगैरे मध्ये , शाळा कॉलेजेस मध्ये वादंग निर्माण करत रहायचे. १०. आणि सर्वात महत्वाचे ह्यातील काहीच नसेल तेव्हा - आर.एस.एस. , मनुवाद , ब्राह्मणवाद , हिंदु दहशतवाद , काही मंदिरे , संप्रदाय त्यांच्या परंपरा , ह्यांवर सतत टीकेची झोड ऊडवत रहायचे. थोडक्यात काय तर बामणी मनुवादी वेदांमधील उपनिषदात जे म्हणले आहे - ॐ शांति: शांति: शांति: , ती शांतता कदापि ह्या देशात नांदली नाही पाहिजे. संघर्ष करा , संघर्षच करत राव्हा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

क्या बात है ! कधी कधी तुम्ही छुपे कॉग्रेसी आहात असे वाटते :)

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्यातून ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग का वगळलंय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

का वगळलंय?
तुम्ही जरा स्पष्ट बोलत जा हो. तुम्हाला निवडणुक जिंकल्यावर भाजपाचे काय टूल किट असेल हे विचारचे आहे का ? हे घ्या : १. सर्वप्रथम , जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही असलेल्या , तब्बल ९७ कोटी मत दाते असलेल्या भारतात व्यवस्थित इलेक्शन निवडणुका घडवुन आणल्याबद्दल निवडणुक आयोगाचे अभिनंदन करायचे अन लोकसभा निवडणुकीतील लाटेवर स्वार होत महाराष्ट्रात निवडणुका लावायच्या. २. समान नागरी कायदा - लाऊन धरायचा . त्याला कोण कोण विरोध करत आहे हे व्यवस्थित हेरुन घ्यायचे मग त्या पक्षातील लोकांच्या मागे सीबीआय लावायची. कारण समान नागरी कायद्याला विरोध करणारे कोणत्याना कोणत्या प्रकारे गुन्हात सामील असणारच , त्यांच्या मागे एकदा हात धुवुन लागले की झक मारत त्यांचा विरोध गळुन पडतोय अन पळता भुंई थोडी होतंय. ३. जबरदस्त लोकांच्या स्वप्नात असलेले धोरणात्मक आर्थिक निर्णय घ्यायचे . त्याला कोण विरोध करतंय बघायचं , मग त्यांच्या मागे ई.डी लावायची . काँग्रेसच्या निर्नायकी डिसिजन पॅरालिसिस ने मरगळलेल्या सिस्टीमचा फायदा घेऊन हे लोकं नक्कीच मलिदा छापुन बसलेले आहेत, त्यांना दे माय धरणी ठाय करुन सोडले की त्यांच्या विरोध गळुन पडतो अन खरे महत्वाचे निर्णय घेता येतात. ४ . त्यांनंतर राज्या राज्यातील निवडणुकांकडे वळायचे, कारण येन केन प्रकारेण देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे, मग भले सगळे "आदर्श" काँग्रेसी सामावुन घ्यायला लागले आपल्या पक्षात तरी बेहत्तर. काँग्रेस ही विचारधारा आहे ती संपली पाहिजे. गोळीने गांधी मारता येतो , गांधीवाद नाही हे नथ्याला कळलं नाही ते आता भाजपाला कळुन चुकलं आहे. मनातला गांधीवाद मेलेली ही माणसं बदलली तर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करुन घ्यायला कोणाची हरकत नाही. आणि मग त्यांना हाताशी धरुन राज्या राज्यात राज्यपालांतर्फे सुत्रे हलवुन अन बेरजेची गणिते करुन विरोधी पक्ष संपवायचे. ५. ह्या सर्वातुन महत्वाचे म्हणजे गेले १००० वर्षच्या गुलामगिरीचे जे व्रण ह्या देशाच्या भुमीवर आहेत ते पुसुन काढायचे . अयोध्या झाले , अजुन काशी विश्वनाथ आहे, मथुरा आहे , बिंदु माधव मंदिर आहे , मार्तंड सुर्य मंदीर आहे , भोजशाला सरस्वती मंदीर आहे , इन्द्रनारायण स्वामी मंदिर आहे ! खुप काम करायचं आहे ! ६. येवढं सगळं करत असताना पाकिस्तान काहीतरी खुस्पट काढणारच , अन मुर्ख विरोधक देशाच्या बाजुने न बोलता , प्रो-पाकिस्तान बाजु घेणार . जशी त्यांनी २६-११ च्या वेळेस घेतली होती, पुलवामाच्या वेळेस घेतली होती, उरी च्या सर्जिकल स्ट्राईक बाबत घेतली होती. विरोधकांनी असा परफेक्ट फुलटॉस टाकला की न चुकता त्यावर सिक्सर्‍ मारायचा अन ते कशे देश विघातक आहेत हे लोकांना दाखवुन द्यायचं ! ७. आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे २०४७ चं आपलं संपुर्ण विकसीत भारताचे स्वप्न आहे . त्यालाही ही काँग्रेसी यडी गाबडी विरोध करतीलच =)))) पण आपण आपल्या ध्येयाप्रत अखंड चालत रहायचं . जसे चाणक्य-चंद्रगुप्त ह्या जोडगोळीने विस्कळीत भारत जगातील सुपर पॉवर बनवला होता , तसे आत्ताच्या काळात आर.एस.एस. - भाजपा ही जोडगोळी आहे असे समजुन अखंड प्रयत्न करत रहायचे ! चरैवति चरैवति ! हे आमच्या आकलना नुसार भाजपाचे टूलकिट आहे . तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहायला स्वतंत आहात २. =))))

In reply to by अमरेंद्र बाहुबली

घोटाळे सेटल करून द्यायचे हे राहिल्ट की.
सगळं सगळं आलं हो . साम दाम दंड भेद ! सोबत येतील त्यांना सोबत घेऊन , सोबत येणार नाहीत त्यांच्या शिवाय , अन विरोध करील त्यांचा विरोध मोडुन आपल्याला पुढे जायचं आहे . एकच लक्षात ठेवायचं आता : गरीब मुळमुळीत भागुबाई अन आगतिक अन सिक्युलर इंडियाचे दिवस संपले. आता एकच लक्ष

२०४७ : विकसीत भारत


In reply to by प्रसाद गोडबोले

घोटाळे सेटल करायचं पर्सेंटेज काय असणार आहे? आय मीन तोडीपाणी रेट?

In reply to by प्रसाद गोडबोले

दोन्ही टूलकिटा आवडल्या! अजून बारीकसारीक अवजारे असतील तर दाखवून द्या...

अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन ड्राईव्ह समोर आला आहे म्हाशक्तीचा मिञ पक्षाचा बडा नेता अडचणीत वान नाही तर गुन लागला खाजपचा. https://www.thodkyaat.com/the-sex-scandal-of-the-former-prime-ministers…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे खोटंय ! मागे ही किरिट ओझा यांच्या अश्या चित्रफिती समावर पसरवण्यात आल्या होत्या ते आठवलं ! निवडणूका म्हटलं एखाद्याची बदनामी करण्याची आणि आयुष्यातून उठवण्याची नामी संधी असते सत्तापिपासुंना !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या सायको रेवण्णाच्या काळ्या कामाचा डिटेल सांगणारा व्हिडिओ पाहिला. जे सिनेमा राजकारण्यांविषयी दाखवत होते ते प्रत्यक्ष आजही घडतंय?भारताची मान अक्षरशः शरमेने झुकली.आता हा पळून गेलाय.परत जर भारतात आला तर लगेच त्याला शिक्षा व्हायला पाहिजे.नाहीतर हा देश अजूनही महिलांना सुरक्षितता देण्यास सक्षम नाही हे समजायचं...

In reply to by Bhakti

भक्तिताई हा राजकीय पासपोर्टवर जर्मनीत पळालाय. पासपोर्ट राजकीय असल्याने त्याला हव तेवढं जर्मनीत राहता येईल. जर केंद्र सरकारने पासपोर्ट रद्द केला तर ठराविक मुदतीत त्याला भारतात परतावं लागेल. पण केंद्र सरकारणव त्याचा पासपोर्ट मुद्दाम रद्द केला नाहीये अजून. भाजप पक्ष नी मोदी सरकार त्याला हवी तेवढी मदत करत आहे. महिला सुरक्षा किती महत्त्वाचा मुद्दा आहे भाजपसाठी हे आपण पाहतोय. ह्या आधी कुलदीप सेंगर, ब्रिज भूषण, मणिपूर प्रकरण आपण पाहिले. महिलांनी तरी भाजपला विचार करुन मतदान करावे.

श्री. ध्रुव राठी ह्यांचा नवा व्हिडीओ आलाय. मोदी इतकं खोटं बोलतात मला माहीत नव्हत. https://youtu.be/Z1wk1n8peBk?si=oi8laMVbDmTYMh-S

पराभव दिसत असल्यानेच मोडीक सातत्याने महाराष्ट्रात https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/lok-sabha-electi… कुणे एकेकाळी औरंगजेबही महाराष्ट्रात असाच ठाण मांडून बसला होता.:)

मोदीनी महाराष्ट्राला लस दिली नाही तर महाराष्ट्राने मोदीना लस दिली. - शिवसेना प्रमुख उद्भव ठाकरे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला तर वाटते की, लस भारतात बनली... मग ती, भारतातील कुठल्याही ठिकाणी का बनेना....

लस मोदीनी बनवली मग शास्त्रज्ञ गवत उपटत होते का? :) मोदीना आता ठाकरी शैली काय असते ते कळेल. :)

पुण्यात मोदीनी राममंदिराच्या नावाने मते मागितली, निवडणूक आयोग गप्प आहे. ह्यावरून पुन्हा सिद्ध होते की निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग तुम्ही मथुरेच्या कृष्णजन्मभुमी मंदिराच्या नावाने मते मागा , तुम्हाला कोणी अडवलं आहे का =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हा हा हा नसेल तर जगातिल सगळ्यात मोठी मशीद, मोठ्ठे चर्च बांधून देतो म्हणून मते मागा... ब्बघू काय होते ते... जमलंच तर पोपला भारतात शिफ्ट करतो म्हणावं... अजुन मते...

In reply to by प्रसाद गोडबोले

शिवसेनेच्या गीतातील भवानी शब्दाला निवडणूक आयोग पर्यायाने मोदी का घाबरले बर??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गाय,गोबर, हिंदू-मुस्लिम, काँग्रेस, प.नेहरू ते गांधी हे निवडणुकीचे मुद्दे राहिले. निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करणारच.

In reply to by बाबुराव

...हे निवडणुकीचे मुद्दे राहिले. निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करणारच.
म्हणजे, निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर लढवायच्या हेही निवडणूक आयोग ठरवणार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रच्याकने, निवडणूक आयोगावर टीका केली तर भक्त लेंड्या टाकायला का येतात??