Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 03/07/2022 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav… आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.

वाचने 20166
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. योग्य केलं. खासदार सेनेच्या जिवावर व्हायचं नी शुभेच्छा गद्….

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार आहे. लोकशाहीमधे विरोधी पक्ष हा शत्रू नसतो. तो सहकारी असतो. अजितदादांनी , नाना पटोले नी , शरद पवारानी देखील नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. अढळराव पाटलांनी शुभेच्छा दिल्या यात त्यांच्या मनाचा मोठेपणाच दिसला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणविसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्याच की.

In reply to by विजुभाऊ

त्यांची हकालपट्टी शिंदे गटात शामील झाल्यामुळे करण्यात आली अशी बातमी होती. डोकं असल्याचा दावा करनार्यांनी आधी बातमी वाचावी.

राज्यपाल पक्षपाती आहेत हे सर्वमान्य आहे पण सगळे संकेत पायदळी तुडवतील एवढे निर्लज्ज आहेत हे दिसून आले. नियम दाखवत, न्यायालयात प्रकरण आहे सांगत जी विधानसभा अध्यक्ष निवडणूक थांबवली होती . तिला लगेच मान्यता दिली.. 12 आमदार सुद्धा निवडतील .. भाजप हा काँग्रेस पार्ट 2 आहे. केंद्रीय सत्तेचा , एजन्सी चा गैरवापर सरकारे पाडण्या साठी करणे यात दोन्ही पक्ष सेम आहेत

In reply to by कपिलमुनी

सगळे संकेत पायदळी तुडवतील एवढे निर्लज्ज आहेत हे दिसून आले. +१ कालच शरद पवार बोलले की मी ईतक्या वेळा शपथ घेतली पण मला कुणी पेढा भरवला नाही. तटस्थ राज्यपाल पेढे भरवून आनंदं काय साजरे करतात. मज्जाय. २०१९ ला ऊध्दव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेना स्मरून शपथ घेतली तर राज्यपालांनी आक्षेप घेतला होता. पण आता एकनाथ शिंदेंनी बाळासाहंबांना स्मरूनशपथ घेतली तर राज्यपालांना काहीही आक्षेप नव्हता. निर्लज्ज असावं पण ईतकं??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मागे सावित्रीबाई फुलेंविषयी किळसवाणे हावभाव करून जे वक्तव्य केले होते तेव्हाच हा माणूस मनातून उतरला होता. आता त्यांच्या कोणत्याच कृतींचे आश्चर्य वाटत नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

समोर अध्यक्ष राष्ट्रवादीतून आलेला. समोर बसलेल्या पहील्या नेत्यांची फळी राष्ट्रवादीतबन आलेल्यांची. मूळ भाजपेयी मात्र मागे. सतरंज्या ऊचलनार्यांनी सतरंज्याच ऊचलाव्यात असा दंडक घातलेला असू शकतो भाजपात. :)

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. बातमी सामनात अनवधानाने छापली गेलीय असं पत्रक आताच शिवसेनेने काढलंय.

मोदींची माझ्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत नाही.: राहुल गांधी एकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत झाली नाही: आदित्य ठाकरे https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/aaditya-thackeray-…

In reply to by यश राज

राजीव गांधी चुकून टाईप झाले. मला असे वाटते की श्रीगुरुजी यांनी आदित्य ठाकरेंची तुलना ही राहुल गांधींशी केली आहे .

In reply to by यश राज

दोन्ही ऊदाहरणे वेगळी आहेत त्यामुळे तूलनाही चुकीची. ऊगाच ओढून ताणून आदित्य ठाकरेंचे चारित्र्यहरण करन्याचा ठाकरेद्वेष्ट्यांचा डाव दिसतोय.

महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने फक्त १०७ आमदारांनी मतदान केले. नॉटी राऊत तर म्हणत होता की महावसुली आघाडीकडे संपूर्ण बहुमत आहे, काय झाले त्या बहुमताचे ! १०७ घरी बसवले ! ;))

महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने फक्त १०७ आमदारांनी मतदान केले. नॉटी राऊत तर म्हणत होता की महावसुली आघाडीकडे संपूर्ण बहुमत आहे, काय झाले त्या बहुमताचे ! १०७ घरी बसवले ! ;))

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आजच्या विशेष अधिवेशनातील अजित पवारांचे भाषण अगदी झकास झाले. आदित्य ठाकरे, भाजप आमदार ,खासकरून गिरीष महाजनांची चांगलीच फिरकी घेतली. कुठेही सत्ता गेल्याची नाराजी दिसली नाही भाषणात. भाजप आमदारांचे चेहरे सुतक लागल्यासारखे दिसत होते. असो, अजित पवार माझ्या नावडत्या पक्षाचा आवडता नेता आहे.

In reply to by आग्या१९९०

सहमत, उद्धव ठाकरेंनीही आमदारकीचा राजीनामा न देता असंच भाषण करायला पाहिजे होत.

In reply to by रात्रीचे चांदणे

फडणवीसांनी असा दणका दिला की मुख्यमंत्रीपदाबरोबर आमदारकीही सोडावी लागली. नाहीतर म्हणे मविआ सरकार २५ वर्षे टिकणार होते आणि ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधान होणार होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा सेनेचा होणार होता.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणे मविआ सरकार २५ वर्षे टिकणार होते आणि ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधान होणार होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा सेनेचा होणार होता. -- हि असली भाकिते राऊत कोणत्या आधारावर करत होता हे त्यालाच माहित.

In reply to by श्रीगुरुजी

अश्या फुशारक्या मारनार्यांकडे विनवण्या करायला अटलबिहारी ते अमीत शहा का यायचे? :)

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीसांनी असा दणका दिला की मुख्यमंत्रीपदाबरोबर आमदारकीही सोडावी लागली. त्या पेक्षा मोठा दणका अमीत शहानी फडणवीसना दिला. एकाच टरिम मध्ये मामू, ऊपमामू, विरोधीपक्षनेता. काय ती तडफड सत्ता मिळवण्याची.

In reply to by आग्या१९९०

हो. राब राब राबले भाजपवाले. ना मजा कोण मारकाहेत तर एकनाथ शिंदे आणी राहूल नार्वेकर. सेनेच्या आमदारांनाही ”काही” तरी मिळाले. वर सुरूत, गुहाटी ची यात्रा. भाजप आमदारांना काय?? तर ऊचल सतरंज्या, बस मागच्या रांगेत. स्वाभिमान वगैरे भाजप आमदार गंगेत सोडून आले असावेत. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हायला लै म्हणजे लैच जळजळ होते आहे! इनो घ्या पण ते

सेना म्हणजे महाराष्ट्र

म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय?

In reply to by सुबोध खरे

जळजळ का होईल?? सेनेतून घाण गेलीय. पुढील निवडणूकीत दुसर्या फळीतील नेते पुढे येतील. म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय? कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी पण आता देशात काय चाललंय ते आपण पाहतच आहोत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेनेतून घाण गेलीय. मग इतकी वर्षे हि

घाण

घेऊन सेना काय करत होती? अरेरे कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का? आपण म्हणजे

अंधसैनिक

याचे उत्तम उदाहरण आहे

In reply to by सुबोध खरे

घेऊन सेना काय करत होती? गद्दार हा गद्दारी करेपर्यंत कसा कळनार? म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का? सेना महाराष्ट्र हीत पाहते भाजपसारखी मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत.

In reply to by Nitin Palkar

पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन. मागच्या वेळी माज दाखवनारे आता नमले हेही नसे थोडके

In reply to by आग्या१९९०

तुमच्या आवडी निवडी बद्दल वाद नाही परंतु एखाद्या माणसाला थोडा तरी विधीनिवेश असावा. सार्वजनीक क्षेत्रात काम करणार्याला तर तो असलाच पाहिजे या मताचा मी आहे. अजित पवार बघितले की मला आमच्या गावाकडची म्हण आठवते. म्हणतात ना "निर्लज्जम सदा सुखी" तसे हे साहेब आहेत. मागे पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नंतर लगेच थंडोबा होउन घरी परत गेले. यात आपण एक बिन भरवश्याचे माणुस म्हणुन ओळखले जाउ वगेरे काही वाटले नाही. लगेच आघाडी सरकार मधे उपमुख्यमंत्री झाले. अजुनही बर्‍याच गोष्टी आहेत.

In reply to by सुक्या

त्यांच्या पुणे विभाग,आसपास त्यांचे उमेदवार आणतील. सत्तेत खुर्ची नसली तरी स्थान असणे उपयोगाचे असते. त्यांना त्यांची मर्यादा माहिती आहे. ठीक आहे.

In reply to by सुक्या

त्यांना जे काम सोपवले होते ते त्यांनी पुर्णपणे व्यवस्थित पार पाडले. भाजपपक्ष नी फडणवीस सत्तेसाठी काहीही करू शकतात हे महाराष्ट्राला अजित पवारांनी दाखवून दिले.महाराष्ट्राच्या जनतेला भाजपने कसे फसवले हे देखील त्यांचया मुळेच दिसले. पहाटेच्या शपथवाधी नंतर दुसर्याच दिवशी सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स क्लिअर झाल्या. त्या विषयावर आता कोणताही भाजप नेता बोलत नाही.

Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र https://www.lokmat.com/maharashtra/anil-gote-letter-to-cm-eknath-shinde…

https://www.ndtv.com/india-news/lashkar-terrorist-caught-was-jammu-bjps… ह्यातून काही विचार डोक्यात येतात ते काही मांडत नाही. पण टीव्ही वरती विखारी बोलणारे मुल्ला मौलवी आणले जातात, तेही सगळ्या चॅनेल वर एकच माणूस- ते आणि हि बातमी काहीतरी समान सूत्राने बांधली गेलीये असे काहीतरी वाटले. आणि हो, कन्हैय्या लाल ह्यांना मारणाऱ्यांमधला एक आरोपी सुद्धा भाजपा मायनोरीटी सेल मधला होता. आता ह्यात भाजपाचा काही संबंध आहे असे मला बिलकूल सुचवायचे नाही. जे काही त्या व्यक्तीने केले ते स्वतःच्या धार्मिक विश्वासमुळेच असणार आहे. पण जर हाच व्यक्ती काँग्रेस किंवा आआप असला असता तर भाजप समर्थकांनी सगळीकडे बोभाटा केला असता हे पण नक्की.

In reply to by कॉमी

सहमत आहे काॅमी. भाजपचेच लोक कसे सापडताहेत ह्यात? की राजस्थान जिंकण्यासाठी भाजप कडून ध्रूवीकरण केलं जातंय असं घडवून?? बरेच प्रश्न ऊपस्थीत होतात. सत्तेसाठी भाजपेयी काहीही करू शकतात हे आपण महाराष्ट्राच पाहीलंच. देशा समोर भाजप हे मोठं संकट ऊभं ठाकलंय.

राउतांची आज एक पत्रकार परिषद पाहिली ते म्हणत होते की शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर मते मागितली ते निवडून आले. आता मात्र त्यानी सत्तेसाठी दगाबाजी केली. राउतांची मुलाखत विनोदी असतेच. पण या वाक्याचे खास हसू आले. २०१९ मधे सेनेने भाजपसोबत युतीच्या नावावर मते मागितली. आणि ते सत्तेसाठी राकॉं सोबत गेले. याला काय म्हणायचे मग

In reply to by विजुभाऊ

१९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीच) सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते. २०१९ मध्ये सुद्धा सेना उमेदवारांच्या फलकांवर बाळ ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंऐवजी मोदी असायचे. तेव्हा तर फक्त मोदींमुळेच सेना जगली होती.

In reply to by श्रीगुरुजी

२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीच ख्या ख्या. काहीही विनोदी. म्हणे भाजपची मदत होती. शिवसेने विरोधात जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजपचा ऊमेदवार होता. मग स्वतचे ऊमेदवार सोडून भाजप सेनेचे ऊमेदवार जिंकवत बसेल का?? कैच्याकै. सेनेला हसक्यात घेणं महाग पडलं नी १०५ घेऊन घरी बसावं लागलं. भावनेच्या भरात वस्तूस्थिती विसरतात गुरूजी तुम्ही. सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते. खोटं. भाजपला कुणीही मतदान करायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांच्या जिवावर भाजपचे ऊमेदवार जिंकायचे. म्हणून तर युती करा म्हणून विनवण्या करायला अटल बिहारी ते अमीत शहा मातोश्रावर यायचे. सेनेचे नेते कधी कुणा भाजप नेत्याच्या घरी गेले नाहीच. पण भाजपचा प्रत्येक नेता मातोश्रीवर विनंत्या करत यायचा.

In reply to by श्रीगुरुजी

२०१९ मध्ये सुद्धा सेना उमेदवारांच्या फलकांवर बाळ ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंऐवजी मोदी असायचे
भाजप ऊमेदवारांनीही अनेक मुंबईतील मराठीबहूल भागात मोदींएवजी बाळासाहेबांचे फोटो वापरले होते. तुम्हाला फक्त मोदींचे दिसले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव महाराष्ट्र विधानसभेने संमत केला आहे. ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाली. काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी उध्दव ठाकरेंच्या गटाबरोबर असलेले मराठवाड्यातील आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाच्या आमदारांबरोबर दिसले. काल राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेना गटाचे नेते आहेत आणि ठाकरेंनी केलेली अजय चौधरींची गटनेतेपदावर केलेली नेमणूक अमान्य केली. तसेच शिंदे गटाचे भारत गोगावले हे शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाचे प्रतोद आहेत असा निवाडा त्यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष हे अशा प्रकारच्या तंट्यांमध्ये अतिशय महत्वाचे पद असते आणि अशावेळेस त्यांचा निवाडा शेवटचा असतो. आता विधानसभेने निवडलेला अध्यक्ष असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांवर बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीला तसा काही अर्थ राहिलेला नाही.

भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत. घोटाळे माफ करत भाजपाय या टाईप अनेक शिरलेतसजे लोक भाजपच्या जिवावर नाही तर स्वबळावर आमदार झालेत. भाजपच्या पुशारक्या मारनार्या सेनाद्वेष्ट्यांनी पहावे. बबनराव पाचपुते, गणेश नाईक ते विधानसभा अध्यक्षही राषट्रवादीतून आलेत. मूळ भाजपेयी कोण आहेत?? एखीदं प्रसिध्द नाव सांगावं जो महाराषट्रात कुठेही जाऊन लाखोंची सभा घेऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

हो हो. घाईत लिहीलं. शुध्द करून देतो. भाजपचे अनेक ऊमेदवार आयात आहेत. घोटाळे माफ करतो भाजपात या टाईप अनेक शिरलेत. जे लोक भाजपच्या जिवावर नाही तर स्वबळावर आमदार झालेत. भाजपच्या पुशारक्या मारनार्या सेनाद्वेष्ट्यांनी पहावे. बबनराव पाचपुते, गणेश नाईक ते विधानसभा अध्यक्षही राषट्रवादीतून आलेत. मूळ भाजपेयी कोण आहेत?? एखादं प्रसिध्द नाव सांगावं जो महाराष्ट्रात कुठेही जाऊन लाखोंची सभा घेऊ शकतो.

मला अनुभव नव्हता, मला अनुभव नाही असं उद्धव ठाकरे अखेरच्या भाषणात म्हणाले. हे त्यांना खुर्चीत बसताना जाणवलं नाही का? अडीच वर्षांनी पायउतार व्हायची वेळ आली तेव्हा कसं काय लक्षात आल?

In reply to by Nitin Palkar

अनूभव नव्हता तरी त्यांनी ऊत्तम काम केले. कोरना काळात राज्यात भाजप सरकार असतं तर युपी सारखे नद्यांमध्ये प्रेतं फेकले असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वाझेंची नेमणूक, अर्णबला अटक, कंगनाचे घर पाडणे, केतकी चितळेला अटक मला एवढीच आठवतायत. म्हणायला पंढरपूर पर्यंत गाडी चालवणे हा एक विक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे...

In reply to by Nitin Palkar

अर्णबला अटक मराठी व्यापाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी. कंगनाचे घर पाडणे अतिक्रमणात घर बांधणे कायद्याप्रमाणे चुकीचे आहे. भाजप पेक्षा कायदा मोठा. केतकी चितळेला अटक हे चुकीचेच होते. बाकी कोरोना काळात केलेली मदत आठवत नसेलच आपल्याला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा, आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्या सरकार तर्फे त्यांची बाजू उचलून धरण्याची तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. तरी पण तुम्ही सरकारने जी कामे(?) केली म्हणून बळे बळे सांगताहेत ते त्यावेळेस च्या मामुना त्यांच्या निरोपाच्या भाषणाच्या(फेसबुक लाईव्ह) वेळीस पण आठवली नाहीत.. एक गोष्ट मात्र आहे की त्यांची न केलेली काम बॉलिवूडच्या( टूलकिट गँग) भांड लोकांना दिसतात व तेसुद्धा असाचा उद्घोष करत असतात.

In reply to by यश राज

आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्या ही ईडी, राज्यपाल, भाजपचा ह्यांच्या टीमवर्कचा अपमान समजला जाईल. त्यांना कामे केली की नाही हे महाराषट्राला माहीतीय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

झाली का रडारड सुरु? चालू द्या.

कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय

याचं काहीही सोयरसुतक नाही का? एस आर बोम्मई केस वाचली का नाही? काही तरी अभ्यासपूर्ण वाचून लोकांच्या माहितीत भर घालायची सोडून आहे तेच तेच प्रतिसाद परत परत देत राहताय? लोकांना तुंमच्या असल्या फालतू प्रतिसादांचा अक्षरशः उद्वेग आलाय. आणि ते अनेकवेळेस लोकांनी लिहूनही दाखवलंय पण तुमच्या ज्ञानात येत नाहीये कि जाणूनबुजून दुर्लक्ष करताय?

In reply to by सुबोध खरे

कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय तेच तेच प्रतिसाद कुठे दिले? तुम्ही खोटं लिहीत असाल तर ते मी दाखवून दिले.