Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 27/06/2022 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको. काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. २०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे. उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते. रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली. विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.

वाचने 15910
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होऊ शकतो का? काही तज्ज्ञांच्या मते नाही होऊ शकत कारण काही आमदारांवरची बडतर्फीच्या केस वर stay दिला आहे म्हणून. समजा आमदार एखाद्या पक्ष मिटींगला हजर नाही राहिले म्हणूण त्यांची आमदारकी काढण्याचा पक्षाला अधिकार आहे का? म्हणजे सेनेनं नक्की कोणतं कारण देऊन त्या १६ आमदारांवर कारवाई करायला सांगितले आहे? असा अधिकार खरंच पक्षा कडे असेल तर बाकीचे आमदार घाबरून परत सेनेकडे येण्याची शक्यता आहे. कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

In reply to by रात्रीचे चांदणे

बाकीचे आमदार घाबरून परत सेनेकडे येण्याची शक्यता आहे.
मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे महाभकास आधाडी सरकार पडले तर चांगले आणि पडले नाही तर अजून चांगले. सगळे आमदार जरी स्वगृही परत गेले तरी या प्रकारामुळे निर्माण झालेली कटुता जाऊन मने थोडीच सांधली जाणार आहेत? १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेला भाजपत परतल्यावर सगळे काही आलबेल थोडीच राहिले होते?तीच- खरं तर त्यापेक्षा कितीतरी भयंकर परिस्थिती शिवसेनेत निर्माण होईल. सगळे आमदार परत आले तरी दोन गट एकमेकांकडे संशयानेच बघणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. विधानसभेत मतदान करायचे अनेक प्रसंग येतात. अशा प्रत्येक वेळी ठाकरेंच्या मनात धाकधूक राहायला हवी की आता काय होणार. त्यातून ही सुंदोपसुंदी अजून वाढेल. त्यात काका पडद्याआडून सूत्रे हलवतील ती वेगळीच. अशा परिस्थितीत ठाकरेंचे सरकार शेतात लावलेल्या बुजगावण्यासारखे होईल. असे झाल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अजून फायदा होईल. एक तर त्यावेळी महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागा लढता आल्या तर मागच्या वेळेस मिळालेल्या २३ पेक्षा नक्कीच जास्त जागा मिळतील. दुसरे म्हणजे सगळ्या देशातील मतदारांपुढे केवळ मोदीविरोध या अजेंड्यावर कोणत्यातरी कडबोळ्याला मत दिले तर काय होते हे महाराष्ट्रातील उदाहरण आठवणीत ताजे हवे म्हणून अन्यथा मोदींना ज्यांनी मत दिले नसते ते लोकही मत देतील ही शक्यता आहे. सरकार आताच पडले तर तोपर्यंत राज्यात चाललेला सगळा सावळागोंधळ लोक विसरूनही जातील. तेव्हा काहीही झाले तरी- सरकार पडले तरी किंवा तगले तरी मी पेढे आणणार :)

In reply to by क्लिंटन

काहीही झालं तरी सेनच नुकसानच होणार आहे ह्या बाबतीत सहमत.

In reply to by रात्रीचे चांदणे

सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होऊ शकतो का होय अविश्वासाचा ठराव येऊ शकतो कारण शिवसेनेच्या वकिलांनी त्यावर स्टे देण्याची विनंती केली ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली SC declines to pass order on plea for no floor test in Maharashtra till July 11 https://timesofindia.indiatimes.com/india/sc-declines-to-pass-order-on-… कारण असा कोणताही आदेश ते राज्यपालांना देऊ शकत नाहीत. विधानसभेत ( किंवा लोकसभेत) कोणता ठराव आणायचा यावर न्यायालय बंदी आणू शकत नाही

To a specific query from the bench on why they had not approached the High Court under Article 226 of the Constitution, Kaul referred the bench to statements by Shiv Sena leaders like Sanjay Raut and said the atmosphere in Mumbai is not conducive to their pursuing legal remedies there. Pointing out that the Shinde camp with 39 MLAs was the majority Shiv Sena, Kaul said “a minority of a legislature party today… is actually subverting the entire state machinery. Our houses are being burnt, we are being physically threatened… a party spokesperson says 40 bodies will arrive from Gauhati, they will be slaughtered like bulls and you wait and see what will happen in days to come, how they will be treated”. राऊतांनी बेफाट वक्तव्य करून सेल्फ गोल केला तो असा “The atmosphere and the environment is not at all conducive for us to legitimately pursue our legal and constitutional rights in Bombay at the moment because that is the kind of atmosphere which has been vilified…” he said. https://indianexpress.com/article/india/relief-rebel-shiv-sena-mlas-sup…

शेणा आणि काँग्रेस दोन्ही माफिया मॉडेल वर चालतात. इथे डॉन हा सर्वांत शक्तिशाली म्हणून स्वतःला प्रोजेक्त करतो. ह्याने काहीही केले तरी चालते कुणीच त्याला जाब विचारू शकत नाही. त्याच वेळी दोन हा "कमकुवत" दिसला तर जास्त काळ टिकत नाही. त्याची गच्छंती होतेच. डॉन ची पावर त्याच्या इतरांना भीती घालण्यावर अवलंबून असते. गॉडफादर चित्रपटांत डॉन कोरेलियॉन आपल्या पुत्राला सांगतात कि माझ्या मृत्यूनंतर तुला सपोर्ट देण्यासाठी जी व्यक्ती तुला जेवणाला बोलावेल तीच व्यक्ती तुझा गळा घोटण्याचा प्रयत्न करील. पुढे तसेच होते. फवाऱ्यानी छोट्या डॉन ला प्रीतिभोजन दिले आणि सपोर्ट दिला. आता त्यांनीच हे रेड वेडिंग प्लॅन सुद्धा केले असेल. शेणेतील आताची बंडखोरी मात्र ह्या माफिया घराण्याचा अंत आहे. ३०+ आमदारांनी एखाद्या दुय्यम नेत्याच्या नेतृत्वाखाली फक्त महा वसुली आघाडीला आव्हान नाही दिले आहे तर माफ़ीया फॅमिलीचा डॉन ह्याला आव्हान दिले आहे. डॉन हा वाघ नसून वाघाचे कातडे घातलेला कोल्हा आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे. डॉन ह्यातून एकाच पद्धतीने सुखरूप बाहेर येऊ शकतात ते म्हणजे असे काही तरी करणे कि ह्या सर्व बंडखोरांना अतिशय मोठी आणि सार्वजनिक पद्धतीची अद्दल घडेल. तसे झाले तर आपोपाप राहिल्याना जरब बसेल आणि सामान्य कार्यकर्त्याला कोण डॉन आहे हे समजेल. वाचा ब्रहस्पती वरून मूर्ख असले तरी त्यांना हे समजते म्हणूनच ते "मढी, शवे, बापाची औलाद" असल्या हिंसक धमक्या देत आहेत. हे आमदार उद्या महाराष्ट्रांत आले तरी त्यातील काहींना प्रत्यक्ष हिंसेला सामोरे जावे लागेलच. बंडखोरांना सुद्धा हे चांगलेच ठाऊक असल्याने ते आसाम मध्ये जाऊन बसले आहेत. जो पर्यंत हि मंडळी तिथे आहे तो पर्यंत डॉन फक्त भुंकू शकतो पण चावा घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे दिवसेंदिवस डॉन चे दौर्बल्य पुढे येत आहे. माझ्या मते सरकार टिकेल कि नाही, भाजप काय करत आहे, हे सर्व मुद्दे नगण्य आहेत. डॉन ची शेनेवरील सत्ता संपली. आता अंधारात अनेक खंजर बाहेर येतील. डॉन आता किती काळ टिकतो हे पाहावे लागेल.

मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे समजतात का तेच समजत नाही ते आमदारांना भावनीक आवाहन करताहेत. तुम्ही इकडे या , मी कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो. समोर येवून बोला आपण मार्ग काढु. मी आपल्या भावनांचा आदर करतो. आणि इकडे संजय राऊत आणि आदित्य घाण गेली , मढी येतील , रेडे , डुक्करे बळी जातील वगैरे बोलत आहेत. उठा मात्र त्यांच्या या बोलण्याला कोणताच आक्षेप घेत नाहीत. हे सर्वसामान्य लोकांना दिसतेय. पण ऊ.ठा. ना दिसत नाही हे खरे वाटत नाही

In reply to by विजुभाऊ

दुसरे म्हणजे आमदार स्वखुषीने गुवाहाटीला गेले नाहीत, त्यांना जबरदस्तीने तिथे नेले गेले आहे असे आरोपही होत आहेत. एकीकडे म्हणायचे आमदारांना जबरदस्तीने त्यांची इच्छा नसताना नेले आणि दुसरीकडे त्यांनाच डुक्कर, घाण, कामाख्या देवीला बळी द्यायला पाठवलेले रेडे वगैरे म्हणायचे याची संगती कशी लावायची? जर त्यांना जबरदस्तीने नेले असेल तर मग 'आमच्या लोकांना जबरदस्तीने तिथे नेले' म्हणून हाकाटी व्हायला हवी ना? परत त्यांनाच शिव्या घालण्यात काय हशील आहे?

In reply to by विजुभाऊ

तडजोड करण्यासाठी उठांनी अजून एक फट उघडी ठेवली आहे. परंतु ही फट बंद करण्याचा राऊत जिवापाड प्रयत्न करीत आहेत. राऊतच्या प्रयत्नांना अपरिपक्व आदित्यच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी मदत होत आहे.

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन! आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-political-crisis-live-…

वरची बरीच मते वाचली.. त्यात सदैव भाजप भक्तीत वाहिलेले लोक उद्धव, राऊत, सेना कशी संपेल हेच बोलत आहेत.. पण शिंदे गटा मुळे भाजपाची सत्ता स्थापन झाली तर भाजपाची आणि फडणवीस यांची कपटी नितीच या मागे होती असे समजुन समाजात जी थोडीफार राहिली ती पण जाईल.. आणि जर भाजपा चे सरकार नाही बनले, तर मुख्यमंत्री पदासाठी सतत कायम भुकेला असलेला माणुस मागील ३ दिवसासारखाच तोंडावर पडेल.. सत्तेच्या हव्यासासाठी भाजप कायम कुठल्याही थराला जाते हे देशात नविन नाही.. अलीकडचेच कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश हि त्याचीच उदाहरणं आहेत.. लोकं फोडायची आणि आपले सरकार बनवायचे... कुठे ते अटलबिहारी वाजपेयी आणि कुठे हि गुंडगिरी.. आणि यांना दुसऱ्यांच्यात गुंड दिसतात...

In reply to by गणेशा

@ गणेशा जाऊ द्या हो मुळात युतीसाठी मते दिलेली असताना भाजप ला बाजूला टाकून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी श्री उद्धव ठाकरे यांनी किती तडजोडी केल्या आहेत ते जनतेला माहिती आहे. एवढे मोठे मोठे शब्द वापरून वस्तुस्थिती बदलणार नाहीये. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या घरावर दगडफेक करणारे त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणारे भाजपचेच भक्त आहेत का? कि या आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही हि धमकी देणारे भाजपचे गुंड आहेत. या आमदारांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण संरक्षण देणे (हे संरक्षण कुणापासून आहे? भाजपच्या गुंडांकडून आहे का?) याची महाराष्ट्र सरकारला जबाबदारी घेण्याचा हुकूम सर्वोच्च न्यायालयाने का दिला आहे? सर्वोच्च न्यायालय सुद्धा भाजपाला विकले गेले आहे असे एकदाचे सांगून टाका म्हणजे वाचून आमचे डोळे निवतील

In reply to by सुबोध खरे

शिंदे ह्यांनी देशातील सर्वात मोठी शक्ती त्यांच्या मागे असल्याचे सांगितले होते मग सुप्रीम कोर्टाची, आणि तिथे ठेवलेल्या जजेस ची काय हिम्मत? रात्री याचिका दाखल तेही सुट्टीच्या दिवशी रविवारी पण सोमवारी सुनावणी ला घेतली गेली पण बाकी रस्त्यावर उतरणारे पण गुंड.. आणि पडद्यामागून सूत्रे हलवणारे पण पांढरपेशे गुंडच.. आणि सकाळी उठून तडजोड करणाऱ्यांना सगळ्यांच्या तडजोडीच वाटतात.. मग काय पाच वर्षे खिशात राजिनामे घेऊन फडणवीस ची आरतीच करायला पाहिजे होती का? प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे.. पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही..

In reply to by गणेशा

प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे.. पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही.. अगदी.

In reply to by गणेशा

प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे.. पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही..

In reply to by गणेशा

द्वेषांध झालं कि असं होतं. विरोधी आमदारांना नोटीस शनिवारी संध्याकाळी दिली आणि सोमवारी साडेपाच पर्यंत त्या आमदारांना वेळ दिला होता. वास्तविकतः या नोटीसला उत्तर देण्यासहीत ७ दिवस वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सकृतदर्शनी तरी विधानसभा उपाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजकीय फायद्यासाठी संपूर्ण्पणे गैरवापर केलेला दिसतो आहे. मग ते काय सर्वोच्च न्यायालयात नोटीस मिळायच्या अगोदरच गुरुवारी किंवा शुक्रवारी जाणार होते का? शनिवारी नोटीस घेऊन वकिलांना भेटून सर्वोच्च न्यायालयात आपले अपील, वकालतनामा इ दाखल करण्यासाठी काही तरी वेळ लागतो कि नाही सदनात झालेल्या कार्यवाही वर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असत नाही. त्यामुळेच ही सुनावणी तातडीने सोमवारीच घेतली गेली त्यातूनही हे खंडपीठ केवळ उन्हाळी सुटीचे खंडपीठ आहे त्यामुळे तातडीचा म्हटलं तरी यांचा क्रमांक ३२ आणि ३३ लागला होता जर देशातील सर्वात मोठी शक्ती त्यांच्या मागे असल्याचे सांगितले होते मग सुप्रीम कोर्टाची, आणि तिथे ठेवलेल्या जजेस ची काय हिम्मत? हि शक्ती जर सर्वोच्च असती तर गेली अडीच वर्षे म वि आ सत्तेत न बसता विरोधातच बसली असती एवढा साधा विचार आपल्या डोक्यात येत नाही आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेची काहीही माहिती नसावी आणि वस्तुस्थिती माहिती करण्यापेक्षा भाजप वर गरळ ओकण्यात आपला द्वेषच दिसून येतो आहे.

In reply to by गणेशा

रात्री याचिका दाखल तेही सुट्टीच्या दिवशी रविवारी पण सोमवारी सुनावणी ला घेतली गेली पण शिवसेनेने आजच दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने आजच संध्याकाळी पाच वाजता सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. The Supreme Court on Wednesday agreed to hear at 5 pm the plea of Shiv Sena chief whip Sunil Prabhu, challenging Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari's directive to Chief Minister Uddhav Thackeray to prove his majority support on the floor of the House tomorrow (June 30). https://www.freepressjournal.in/mumbai/shiv-sena-to-move-supreme-court-…

In reply to by सुबोध खरे

निकाल मात्र भाजपा च्या म्हणण्यानेच असणार... मग कोण विकले गेले.. का विकले गेले.. कोणाच्या हातात काय हे ज्याने त्याने ठरवायचे असते.. बाकी घोटाळ्याचे पुरावे.. ED फलाना भाजप च्या म्हणण्याने पाठींबा दिल्यास पुढे चालू राहतील का नाही ते येणार काळ ठरवेल.. आणि ED बाबत जो संदर्भ आता लोक घेतात तोच खरा होईल

In reply to by गणेशा

निकाल मात्र भाजपा च्या म्हणण्यानेच असणार... जर सुप्रीम कोर्टावर पण संशय घेत असाल तर मग कठीण आहे. कावीळ झाली की सगळे पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by गणेशा

गणेश भाऊ मुख्यमंत्रीपद गेल्याने आता कोर्टात वेगळे न्काल लागू शकतात पहा. आता शिवसेनेच्या याचीका धूडकावण्या एवजी अचानक आमदारांचे निलंबन वगैरे होईल.

लोकहो, गुवाहाटी येथे गेलेले वा नेलेले आमदार सुस्थितीत नाहीत म्हणे ? हे खरंय का ? : https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-political-crisis-congress-n… हे जर खरं असेल तर संजय राऊत म्हणतात ते चाळीस मुडदे वगैरेचा अर्थ वेगळा होतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. अनास्थशायी? याचे मराठी भाषांतर कुठे करून मिळेल? २. त्याहूनही महत्त्वाचे- नाना पटोलेना तुम्ही इतक्या गांभीर्याने घेता?

In reply to by गामा पैलवान

हायला संपादक महाशय भरपूर हवेत बार काढत होते आता नाना सुद्धा? या आमदारांना मारहाण होत असेल किंवा इंजेक्शन देत असतील तर त्यांच्या एक तरी नातेवाईकाने उच्च न्यायालयात रिट अर्ज केला आहे का? कुठल्या तरी भिन्न जाती धर्माच्या जोडप्याला त्यांचे नातेवाईक वेगळे करत असतील तरी उच्च न्यायालये रिट अर्ज दाखल करून घेउन ताबडतोब जोडप्याला संरक्षण देण्याचा हुकूम देतात. इथे कुणाच्याहि नातेवाईकाने महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस स्थानकात खंडपीठासमोर असा रिट अर्ज केलेला नाहीये. नाना पटोले असे धडधडीत खोटे अडाणी लोकांसाठी बोलत आहेत हे सरळ आहे आणि @गामा पैलवान तुम्हाला ते खरे आहे असे वाटतंय? धन्य आहे

In reply to by सुबोध खरे

पुर्वी म्हणजे काही वर्षापुर्वी जेव्हा दळणवळण आतासारखे गतीमान नव्हते तेव्हा ह्या बाता खपुन जात. एखाद्या नेत्याने केलेल्या अशा विधानांची सत्यासत्यता तपासणे अवघड असे. आतच्या काळातही काही लोक अशी बेताल वक्त्यव्ये करतात तेव्हा त्यांच्या अडाणीपणाची कीव येते.

मुख्यमंत्री म्हणतात की या समोर बसून बोलुया. चर्चेने प्रश्न सोडवता येतात. आणि तिकडे अलिबागला राउत म्हणतात शिवसैनीक तयार आहेत. यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. यात खरे कोण आणि खोटे कोण तेच कळायला मार्ग नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे राउत असे बोलत राहिले तर कोण येईल मुख्यंत्र्यांशी चर्चा करायला राउतांनाच ते आमदार परत यायला नको आहे असे दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

ते भाजप चा कार्यक्रम करणार आहेत. शिवाजी महाराजान्ना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यान्निच दिली. पवार साहेबान्च्या मदतीने ते उद्धव्जीन्ना पन्तप्रधान बनवणार आहेत. -टमरेलेन्द्र खाउगल्ली

खैरेंना ठाकरेंनी केव्हाच अडगळीत फेकून दिलंय. त्यांना आता राजकारणात भवितव्य नाही. परंतु ते राऊतांचे अनुकरण करून ठाकरेंना खुश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-khaire-allege-7-thousa…

In reply to by श्रीगुरुजी

एकंदरीत शिवसेना नेत्यांची भाषा पाहता राउतांना भविष्यात नंबर एक राहण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील असे दिसतेय!!

३० जूनला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यात विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या - राज्यपालांचा आदेश

अटलबिहारी वाजपेयी व सोनिया गांधी सुध्दा ह्या अश्या परिस्थितीतुन गेल्या आहेत.अटलबिहारी वाजपेयींचे सरकार केवळ १ मताने कोसळले तेव्हा अटलजींनी ग्रेसफुली पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. त्यावेळे त्यांनी केलेले त्यांचे भाषण गाजले. हीच गोष्ट सोनियाजींची.अंतरात्मा कि आवाज आठवत असेल. स्वतः पुढे न येता मनमोहनसिंगजींना पंतप्रधान केले. हीच संधी उध्द्वजींना पण होती पण बहुदा सत्तेला चिकटुन कसे राहायचे ह्या एकाच बाबतीत वाकबगार असलेल्या नेत्याच्या संगतीमुळे अथवा त्यांच्याच सल्यामुळे असेल कदाचित सध्याची परिस्थिती ओढवुन ठेवली आहे. माझ्यामते मा.बाळासाहेबांनी सुध्दा एकेकाळी शिवसेनेशी माझा संबंध संपला अशी एकदा भूमिका घेतली होती व त्यानंतर शिवसैनिकांना त्यांची मनधरणी करावी लागली होती. इथेही त्याग करुन मोठेपण घेण्याची उध्द्ववजींना संधी होती असे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

अश्या सर्व संध्या त्यांनी लाथाडाव्यात, तिकडे ते मनोहर पर्रीकर चालता येत नव्हते तर सलाईन ची बाटली हातात धरून सभागृहात आले होते पण मामूपद सोडलं नव्हतं, पण सत्तेत चिकटून राहन्याची वगैरे टिका नेहमी अभाजपेयींवर होते म्हणून महान वगैरे न बनायचा प्रयत्न करता ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत लढावं. पाहुयात, ईडी, भाजप, बंडखोर, सीबीआय, राज्यपाल जिंकतात की महाराष्ट्र.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत लढावं. पाहुयात, ईडी, भाजप, बंडखोर, सीबीआय, राज्यपाल जिंकतात की महाराष्ट्र.
ठाकरे जिंकले म्हणजे महाराष्ट्र जिंकला का किंवा हरले तर महाराष्ट्र हरला का? कै च्या कै लॉजिक. उ ठा किंवा म वि.आघाडी म्हणजे काही महाराष्ट्र नाही. आम्ही म्हणजे महाराष्ट्र, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ,पुरोगामित्व ई ई हे फक्त मेळाव्यात भाषणं जडबदक करण्यासाठी वापरलेले शब्दच आहेत बाकी काही नाही.

In reply to by यश राज

मुंबईतून कार्यालये गुजरातला हलवणे हे भाजपचे काम. त्याला विरोध केला शिवसेनेने म्हणून सेना म्हणजे महाराष्ट्र.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेना म्हणजे महाराष्ट्र.

आणि इन्दिरा इज इन्डीया शिवाजी महाराज, संभाजी महाराज , बाजीराव पेशव्यापासून अहिल्याबाई होळकर, ज्ञानेश्वर तुकाराम पासून गाडगेबाबा पर्यंत सर्व संत, शाहू, फुले आंबेडकर वासुदेव बळवंत फडके पासून सावरकर लोकमान्य टिळक पासून ते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले बलिदान देणारे हुतात्मे, श्री पा वा काणे पासून श्रीमती लता मंगेशकर, श्री भीमसेन जोशी सारखे भारतरत्न या सर्व महाराष्ट्रातील दिग्गजांना आणि तळागाळातील सामान्य जनता पासून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व लहान मोठ्या माणसांपर्यंत आपण एका लेखणीच्या फटकार्यात नष्टप्राय करून टाकलेत बाळा साहेब ठाकऱ्यांच्याच शब्दात अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाही

In reply to by सुबोध खरे

अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाही हेच म्हणतो. किती भाजपमाता की जय म्हणाल?? कधीतरी भारत माता की जय देखील म्हणा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहो साहेब इतकेही सैरभैर होऊ नका. वर मी प्रतिसादात सोनियाजींबद्दल हि लिहिलेले आहे.त्यांनीही वेळेची नजाकत ओळखुन असा निर्णय घेतला कि त्यात फक्त भाजपेयीच नव्हे तर सारेच विरोधी चारी मुंड्या चीत झाले व पुढची १० वर्ष बोटे मोडत बसले.

वविजुभौ,
राउत असे बोलत राहिले तर कोण येईल मुख्यंत्र्यांशी चर्चा करायला
मला वाटतं हे Carrot and Stick Policy च्या जवळपास जाणारं धोरण आहे. निक्सनच्या वेळेस ही संज्ञा प्रचलित केली गेलेली होती (चूभूदेघे). आ.न., -गा.पै.

अलीकडे, ट्विटर इंडियाने लिंक्स आणि ट्विटसह अनेक पाकिस्तानी खाती ब्लॉक केली आहेत . ही सर्व खाती पाकिस्तान सरकारची आहेत. याशिवाय, ट्विटर इंडियाने यूएन, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावास आणि देशाचे सार्वजनिक प्रसारक, रेडिओ पाकिस्तान यांच्या खात्यांवरही बंदी घातली आहे. भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वी YouTube बातम्यांचे व्हिडिओ ब्लॉक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तान आधारित चॅनेल होते ज्यात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधात प्रपोगंडा पसरवला गेला होता. ब्लॉक केलेले यूट्यूब चॅनेल भारतामध्ये असंतोष भडकवून दहशत निर्माण करण्यासाठी आणि लोकांना चिडवण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. आजही जगात पाकिस्तान प्रणित फेक न्यूजची समस्या सध्या वाढत आहे. याचा उगम पाकिस्तान आहे. हे सर्व भारतविरोधी सामग्रीने भरलेले आहेत असे दिसून येते.

In reply to by मदनबाण

बहुतांशी आमदार विरोधात गेले तरीही मुख्यमंत्रीपदाला लोंंब़कळून राहणारे देशातच्या ईतिहासातले उद्धव एकमेव मुख्यमंत्री असावेत. ५% जरी स्वाभीमान असता तर राजीनामा दिला असता. दर चार वाक्यांमागे शाहू-फुले आंबेडकरांचे नाव घेणारे महान पत्रकार निखिल वागळे अजूनही गप्प आहेत. लोकांना' तेलाचे जागतिक अर्थकारण' शिकवणार्या दीड शहाण्या गिरीश कुबेराना ई.डी.ने केलेली कारवाई 'ईडीचा दट्ट्या' वाटतो.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या सरकारने उद्याला (३० जूनला) विधानसभेत बहुमत सिध्द करावे असे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी दिले आहेत. काल रात्री असा आदेश आल्याचे वृत्तवाहिन्यांवर सांगितले गेले होते पण त्या बातमीचे राजभवनमधून खंडन केले गेले. त्याचे कारण बहुदा त्या आदेशावर राज्यपालांची सही व्हायच्या आधीच 'सूत्रांच्या' हवाल्याने वृत्तवाहिन्यांनी ती बातमी दिली हे असावे. सभागृहाचे कामकाज सकाळी ११ ला सुरू झाल्यानंतर संध्याकाळी ५ पर्यंत संपवावे आण्णि कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे कामकाज स्थगित करू नये असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. जुलै २०१९ मध्ये कर्नाटकात ह.दो.कुमारस्वामींच्या सरकारवर असाच विश्वासदर्शक ठराव आला असताना वेळकाढूपणा चालू होता त्याची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून राज्यपालांनी हे आदेश दिलेले दिसतात. बाकी वृत्तवाहिन्यांवर काहीकाही गोष्टी अगदी चुकीच्या सांगतात त्याचे प्रत्यंतर ही बातमी बघताना आहे. The house shall not be adjourned for any reason चे मराठी भाषांतर अबप माझावाल्यांनी 'कोणत्याही परिस्थितीत विधानसभा बरखास्त केली जाऊ नये' असे केले. Adjournment म्हणजे विधानसभेची बरखास्ती नव्हे तर कामकाजाला दिलेली स्थगिती. दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे.

In reply to by क्लिंटन

एकनाथ शिंदे त्यांच्या गटाच्या सगळ्या आमदारांना घेऊन उद्याच मुंबईत दाखल होणार आहेत. खरं तर ते आजच मुंबईत आले तर चांगले होईल. आसामात पाऊस दणकून पडतो नेमका तसा पाऊस उद्या पहाटे पडला आणि विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही किंवा मुंबईतही पाऊस असेल आणि विमान उतरवता आले नाही म्हणून ते दुसरीकडे वळवले असे काही झाल्यास सगळ्या आमदारांना सभागृहाच्या कामकाजापासून वंचित राहायची वेळ येऊ शकेल. अशा वेळी एक दिवस किंवा निदान काही तास तरी अंगावर असलेले चांगले. एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला गेले होते त्यानंतर वार्ताहारांशी बोलताना त्यांनी उद्या मुंबईत येत असल्याची माहिती दिली.

राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, अश्या सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत. उद्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ठाकरे राजीनामा देतील असं वाटतंय. त्यापूर्वी आज मंत्रीमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी, कोणत्या तरी समाजगटावर सवलतींची खैरात असे काहीतरी सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेऊन पुढील सरकारला सत्तेत येण्याआधीच संकटात टाकण्याची व्यवस्था करतील.

In reply to by श्रीगुरुजी

मोठ्ठ्ठ्ठ्त्ठा कोरोना, माईल्ड हार्टअटॅक, गुवाहाटी रिटर्न आमदार गायब केले किंवा मोठी दंगल याने बहुमत चाचणी पुढे ढकलता येईलच ना? (नाही चाणक्यांचे चाणक्य श्री श्री श्री प. पु. काका आहेत सोबतीलाम्हणुन एक आपली (कु) शंका))

In reply to by इरसाल

राज्यपालांच्या आदेशाचे पालन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असते. जर ते कर्तव्य पार पाडण्यात राज्य सरकार चुकले तर कलम ३५६ अंतर्गत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकेल. सगळ्या मंत्र्यांना एकाच वेळेस कोरोना किंवा इतर काही वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही.

In reply to by इरसाल

MVA will have to move SC against Governor's letter for floor test, says Congress' Prithviraj Chavan हे म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी स्थिती झाली आहे. बाहेर मोठा भूभू:कार करायचा आमच्या कडे बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं कि सर्वोच्च न्यायालयात आवस मागायला जायचं

अजित पवार व भुजबळांना कोरोना झाल्यामुळे ते उद्या अधिवेशनात येणार की नाही याविषयी संभ्रम आहे. अर्थात त्यांना मत देण्यासाठी काही तास अधिवेशनात आणण्याची विशेष व्यवस्था करता येईल. मलिक व देशमुख तुरूंगात असले तरी त्यांना मत देण्यासाठी काही तासांपुरते तुरूंगातून सोडतील असा माझा अंदाज आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कधीही विश्वासदर्शक किंवा अविश्वासदर्शक ठरावावर मतविभागणी होऊन सरकार पराभूत झाले नव्हते. यावेळी काय होईल ते उद्या समजेलच. उद्याचे अधिवेशन रद्द करावे यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

उद्याचे अधिवेशन रद्द करावे यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. पहा मी काय म्हणत होतो ते

अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे आजच राजीनामा देतील असे 'सूत्रांच्या' हवाल्याने लोकमत न्यूजवर आले आहे. माझीच माणसे माझ्याविरोधात मतदान करताना मला बघायचे नाही असे त्यांनी जवळच्या लोकांशी बोलताना म्हटले आहे अशी 'सूत्रांची' बातमी आहे.

हे म्हणजे एका आठवड्यात तिसर्‍यांदा राजिनामा देण्याचे ठरवतात. दरवेळेस बारामतीच्या काकांमुळे देण्याचे टाळतात

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा. तसेही त्यांना अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे जी त्यांची मूळ मागणी होती. तसेच भाजप सरकारला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागेल. जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा. तसेही त्यांना अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे जी त्यांची मूळ मागणी होती. तसेच भाजप सरकारला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागेल.
+१ दुर्देवाने श्री उठा यांना चांगले सल्लागार नाही आहेत. त्यामुळे ते श्री सरा आणि श्री शप ह्यांच्यावर अवलंबुन आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा आजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल. हे आमदार गेले तरी चालतील ह्यातील बहुतांश सोनेच्या जिवावर जिंकलेले आहेत. सेना त्या जागी नवे आमदार निवडूण आणू शकते. ठाकरे आमदार किंवा भाजप पुढे झूकले की सेना संपलीच म्हणून समजा. जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल. ते चालेल. सत्ता येत जात असते. पण सेनेच्याच आमदारांमुळे सत्ता गेली तर ह्या आमदारांची चांगलीच बदनामी होनार. त्यातही विश्वासदर्शक ठरावावेळी किती आमदार खरोखर भाजप नी बंडखोरांसोबत आहे हे देखील कळेल. सुदैवाने काही आमदारानी मविआ च्या बाजूने मतदान केले नी सरकार तरले तर मग एकनाथ शिंदे नी ईतरांचे काय होते हे पाहणे मजेशीर असेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल.>>>> १००% सहमत आता ती वेळ निघून गेलेली आहे. त्यात निष्ठासाठी दोन्ही बाजूच्या सा. का. नी एकमेकांची डोकी फोडलीत.