(रिमोट)
लेखनविषय:
काव्यरस
(क्रांतीजीं क्षमा करतील या अपेक्षेत)
त्याला माझे आरवणे रुचलेच नसावे
त्याना माझे बंड कधी पचलेच नसावे
शब्दांचे ते घाव बोलके, उद्धटवाणी,
नाते भावातील तिथे रुजलेच नसावे
बडव्याने विठठला भजावे, असली माया,
वेडे गण.. त्यांना दैवत पटलेच नसावे !
त्याच्या पाट्या कशा कोरड्या? बहुधा त्यांनी
सेनानींचे सल्ले पण रटलेच नसावे
वर्षांचे साथी सगळे अवचित फुटलेले,
आदेशावर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
येता जाता भाजप त्यांना डिवचत होता,
त्याचे 'जीना' भाटांना कळलेच नसावे !
त्या भात्यातुन काही शर हलकेच ढापले,
मी तगलो तैसे कोणी तगलेच नसावे !
मनसे म्हणतो काकापरी रिमोट व्हावे,
तिथे असावे तरी कधी त्यातलेच नसावे !
वाचने
1185
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
मनसे रे ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मनसे रे !