[वळीत]
लेखनविषय:
काव्यरस
गुरं वळवत फिरतांना
वीराप्पा स्वतःशीच म्हणाला,
"वकटी, रंडू, मोडू, नायडू-
पाचाचे चार कसे झाले करडू?"
झोल मिटेनासा झाला तेव्हा,
शिवी हासडून दिला दंडूका
मोती कुत्रा जाम कळवळला...
***
सुन्न होऊन परततांना
मागं पाहिलं वीराप्पानं
तेव्हा अंधारातही त्याला
एक सावली दिसली...
लपणं आणि छपणं
या लपाछपीचे नियम
कळत असुनही त्याला
उमजेपर्यंत तो हरला...
उंचावत दंडूका तोच
वीरप्पा ओरडला तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती सावली म्हणाली,
"मीच तुझे चुकलेले करडू!"
वाचने
1730
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
आता वैताग आला !!!
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
आता वैताग