तारुण्यातला उसळणारा,
भावावेग मागे रहातो,
उथळ,गढूळ पाण्याचा डोह,
नितळ,शांत,स्वच्छ बनतो
यौवनात जे सौंदर्य होते,
वार्धक्यात तेच तत्त्व बनते,
पिकल्या पाना सोबत,
कविताही म्हातारी होते!
उगाच नसतो शब्दांचा थाट,
नसतो अलंकाराचा घाट,
दोन ओळींच्या मौनामधून,
वहातो प्रगल्भतेचा पाट .
कवितेलाही वय असते,
कवीसोबत तीही वाढते,
शब्दांच्या या गोंदणाला,
अनुभवाचे कोंदण मिळते.
कर्ता अमर, सृजन नश्वर
इथे मात्र उलटी गंगा वहाते
सृजन कर्त्याला अमर करते
कवीतेला ही वय असते.......
-कसरत,१९-९-२०२६
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
कवितेला असतो अनुभव
फेसाळणाऱ्या तारुण्याचा,
कोमल स्पर्श मातृत्वाचा,
उत्तुंग साकारलेल्या कर्तृत्वाचा,
आनंदकण स्व-जाणिवेचा…!