मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

X/0 = ∞ ? !

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो

वाचने 1753 वाचनखूण प्रतिक्रिया 5

अथांग आकाश गुरुवार, 07/25/2024 - 10:58
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!! वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-) .

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/25/2024 - 12:23
लिहीत रहा. सुख दु:खाची मांदियाळी, आयुष्य भोगीले गुणिले भागिले हाती शुन्य आले शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले X/0 = ∞ ? !

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश गुरुवार, 07/25/2024 - 13:13
हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर चेंडू सोडून द्यायचा! उगीच बॅट मधे घातली तर फलंदाज झेलबाद होतो :-)

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/25/2024 - 13:51
अनंतयात्री , अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले . "दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें " हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो ! "क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते ! "बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥ " आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे! माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ अहाहा. खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !