मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळया: ताज्या घटनांवर

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ब्रूटस सीजर कुणीच नव्हता सारेच ब्रूटस होते. खंजीरीच्या पात्यांना रक्ताची तहान होती. जो पळतो तो जिंकतो बाजीरावाने घुडदौड केली निजामचा पराभव केला. शिंदेंनी विमानदौड केली उद्धवचा पराभव केला. दैवयोग किती षड्यंत्र केले किती वेश बदलले नशिबी मात्र माझ्या फक्त मंत्रिपद आले. ज्ञानी लोक रात्री झोपतात ज्ञानी रात्री जागतात गीतेचा संदेश हा शिंदेंना कळला होता. आजचा पाऊस वेगळा होता आसामच्या डोंगर-दर्‍यातून मुंबईत कोसळला होता. मर्सडीज पाण्यात बुडाली रिक्शा तरंगत होता. नेता ज्या रंगाची शिकार त्या रंगाची भूषा. का सखी सरडा ना सखी नेता.

वाचने 2473 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मनिष Mon, 07/18/2022 - 09:26
भारी!!!
सीजर कुणीच नव्हता सारेच ब्रूटस होते. खंजीरीच्या पात्यांना रक्ताची तहान होती.