मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैत्री

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू. मैत्री होती ढगाची उंच उंच डोंगराशी आंगचटीला आला खोड्या करू लागला म्हणून ...... टोचून टोचून डोंगर बोलला भांडण झाल जोरात म्हणून रडू आल ढगाला धार लागली डोळ्याला कट्टी घेऊन डोंगराशी वसुधेच्या कुशीत घुसला आसवांनी पुसलेले अश्रू बघून मनाशीच हसला मीत्राशीवाय करमेना आई जवळ मन रमेना लवकरच येतो म्हणून डोंगराला भेटायला गेला भेट झाली मीत्रांची दोघा पण खुश झाले अधंळी कोशीबिरीचा खेळ पुन्हा खेळू लागले आंधार पडला धरणीवर गार वारा सुटला पुन्हा भांडण होईल म्हणून बळी वाट बघत बसला १६-१२-२०

वाचन 3235 प्रतिक्रिया 0