II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II
लेखनविषय:
भ्रम कैवल्याचा साधला
भक्ती नामातच तू बांधला
कुणी पहिला रे तुला
दगडामध्येच अडकला
खांब सोनेरी रुपेरी
तरी उभा विटेवरी
बडवे मातले ते सारे
उगा भक्तांसी छळे ऱे
दावुनी कोरी नोट त्यांसी
उभे माउली दर्शनासी
बनवून माऊलीस दासी
बडवे राजभोग भोगती
तुझा दरबार पातला,
दुर्लभ भक्त दर्शनासी
स्वतः समजून ते राजे
शिवीगाळ गाभारा माजे
कैसी शिस्त नाही जाण
कोऱ्या नोटेस फक्त मान
तुझ्या दरबारी विठुराया
फक्त लक्षुमीची छाया
हात सोड कटेवरचे
उचल बडव्यांशी लढावया
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
वाचने
3166
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
छान कविता.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद एस साहेब ........ आषाढीच्या सर्व मिपा बंधू भगिनींना शुभेच्छा
आवडली
आशय आवडला...
तुझ्या दरबारी विठुराया
फक्त लक्षुमीची छाया
असे जरी वाटत असले तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचं असे देवस्थान आहे जिथे प्रत्येकाला पांडुरंगाच्या थेट पायावर डोके ठेवायला मिळते. क्वचितच असे इतर मोठ्या देवस्थानी पाहायला मिळते.
आवडली
छान लिहिलंय हो सिविपासी.
छान कविता. आवडली!!
आवडली कविता.
उचल बडव्यांशी लढावया ऐवजी उचल अन्यायाशी लढाया चालले असते का ?
In reply to छान कविता. by बबन ताम्बे
त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत की ब ऐवजी भ सुद्धा चालू शकले असते. बाकी कवीश्वर समर्थ आहेत.
In reply to त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत by विशुमित
तुमचे कवितेचे रसग्रहण माझ्यापेक्षा भारी :-)
वत्स विशुमिता,
पुरे आता
का उगा चाळविता ?
भावना ज्या लोपल्या
अभिप्राय वाचून विखारी
लाव्हासम उसळल्या
ब जरी भ मी केला
फरक त्यात पडेल काय ?
"ब"डव्यापासूनच "भ"डवा आला
निर्विवाद सत्य ह्हाय
मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप
आम्हीच केले सादर कवनि , सर्वश्रुत म्हणुनी
ठेवूनिया आलासी माथा जरी तिथे विटेवरी
का उगा बाळगी ताप ? व्यक्त होऊनि
आज पासून चातुर्मासारंभ झालेला आहे .. तेव्हा विडी कि दिंडी हे ज्याचे त्याने ठरवावे ... मला या संपूर्ण चातुर्मासात शांत राहायला आवडेल ...
ज्याला कुणाला मृदूंग वाजवायचा असेल त्याने ते जरूर करावे ...आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न जरूर करू पण ...
आम्ही जर काही बोललो तर ते या संस्थळी सर्वांसी मान्य व्हावे ... हीच आमची इच्छा आणि तुम्हा सर्वाना आषाढीच्या लाख लाख शुभेच्छा ......
In reply to वत्स विशुमिता, by सिद्धेश्वर विल…
""""मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप""""
==>> तुमचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. मला तुमचे नाही, बडव्यांचे उपद्व्याप अभिप्रेत होते.
तुमचे चालू द्यात.
फक्त थोडे जरा जपून नाहीतर तुमचा पण संक्षी होईल.
बडव्यांची कर्मे बडवे भोगतीलच अशी व्यवस्था विट्ठलाने केलेली असल्याने तो कशाला हात उचलून स्वतः साठी कर्म करील ?
होय विशुमित साहेब माझा गैरसमज झाला होता . दूर केल्याबद्दल धन्यवाद ....
मध्यंतरी बडव्यांच्या नेमणूकांची पद्धत वगैरे बदलली होती त्या बद्दल मिपावर चर्चाही झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडला नाही का ? कि या कवितेतील बडव्यांवरील आक्षेप जुन्या अनुभवावर आधारीत आहे ?
In reply to सद्य स्थिती काय आहे ? by माहितगार
उद्गम काहीही असला तरी आता बडवे हे आडनाव झालेले आहे. त्यांच्याकडे वंशपरंपरागत असलेले विठ्ठलसेवेचे अन उत्पात, परिचारक, डिंगरे आदी सेवकांचे रुक्मिणीमातेच्या सेवेचे व नित्योपचाराचे अधिकार सध्या नाहीत. ते सरकारी नेमणुकानुसार होणार्या कर्मचार्यांचे कर्तव्य आहे.
बडवे हे जसे पांडुरंगाला असत तसे बार्शीच्या भगवंताच्या सेवेतही आहेत पण तेथे अद्याप सरकारी हस्तक्षेप नाहीये.
In reply to उद्गम काहीही असला तरी आता by अभ्या..
कवितेतला अनुभव तेथे बराच पुर्वी घेतला आहे, पण सरकारी हस्त़क्षेपानंतर परिस्थिती कितपत बदलू/सुधारू शकली आहे ? याची माहिती नाही म्हणून प्रश्न विचारला
In reply to कवितेतला अनुभव तेथे बराच by माहितगार
फरक इल्ला.
जोपर्यंत पांडुरंग आहे तोपर्यंत पडणार नाही, तो नसला की बडवेही नसतील.
In reply to फरक इल्ला. by अभ्या..
अवघड आहे !
तो नसला की बडवेही नसतील.:))
मला आता पर्यंत फक्त तीनच देवस्थाने भेटली जिथे कोणी हिडीसफिडीस करताना दिसले नाही ते म्हणजे-- अमृतसर, वैष्णोदेवी आणि आपल्या महाराष्ट्रातील शेगाव.
इतर तीर्थक्षेत्री ठिकाणी मी फक्त दर्शन करतो बाकी षड्रिपूंकडे लक्ष देत नाही.
मला असं वाटत
कि दानपेटीत सारंकाही असत
दानपेटी/दक्षिणा काढा .. बडवे आपोआप जातील
उरेल तो फक्त आणि फक्त पांडुरंग
छान कविता.