तुझी खुप आठवण आली तर काय करु?
तुलाही माझी आठवण करुण देऊ
की एकटीच तुझ्या आठवणीत झरु
तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु?
स्वत:शीच गप्पा मारु
की अबोल राहुन मौन व्रत धरु
तुला बघावस वाटलं तर काय करु?
तुला शोधत राहू
की स्वत:ला एकांतात नेऊ
तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु?
तुझा पहिला स्पर्श आठवू
की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ
तुझी आठवण घेऊन जाऊ
की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4796
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
करूण वरूण
अहो कविता कल्पनात्मक आहे
होय तै!
In reply to अहो कविता कल्पनात्मक आहे by Bhagyashri sat…
होय तै!
In reply to अहो कविता कल्पनात्मक आहे by Bhagyashri sat…
कसं काय सुचतं हो असं लिहायला?
दुसरा भाग पण येतोय कवितेचा,
छान लिहिलयंस.
धन्यवाद