मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतता

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ----- परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली ---- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फार जीवघेणी असते नाही? ------ किनार्‍यावर एकटचं भटकतांना 'तो' खडक दिसला पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली तासन् तास त्या खडकावर सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं आता कां कोण जाणे 'तो' खडक खुपच ओबडधोबड वाटला बेढब दिसला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ---- शेवटी काय पाऊस जाण्यासाठीच येतो जीवघेणी शांतता तेवढी राहते सोबतीला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०८/२०१६)

वाचन 5381 प्रतिक्रिया 32