Skip to main content

दिपज्योती

लेखक माहीराज यांनी बुधवार, 11/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल फीरते कधी माघारी या वाटेवर चालताना.. आसु दाटले डोळ्यांमध्ये चुकून कधी हसताना.. सर्व जाणतो तरीही का मी चुकून ही चुकतो.. शब्द सुचेना आता मजला रूसुन मी बसतो... येते सारे मलाच म्हणुनी गर्वाने मी फुललो.. सोडून मी कार्य माझे भासांना भुलून फसलो... ध्यास कोणता..लक्ष कोणते ..काहीच आठवेना.. शुन्यातुन मी घडलेलो पुन्हा शुन्यातच विरलो... वेळीच मला समजावणारा साथी थकुन गेला... आज नको उद्या करु यात वेळ ही निघुन गेला... आता नव्याने सुरवात करू..पण आज नको रे उद्याच करू.. आळसाचा डोंगर आधीच होता पण आता कळस केला ... शोक करणे पुरे आता रडणे ही खुप झाले. निश्चय कर पण नित्याचा अंतर्मन हे बोले.. लेखनी मजसोबत आली कागदच पुन्हा हाती.. मिळवीन पुन्हा मी वैभव माझे लिहुन पुन्हा दिपज्याती....
लेखनविषय:

वाचने 804
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया