कळली तर कळवा
लेखनविषय:
काव्यरस
कळली तर कळवा
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर
यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर
भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर
स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर
किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, ’अभय’ असेल तर
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
3054
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वाह छान ... शेतकऱ्याचे संपूर्ण आत्मचरित्र एका कवितेत वाचल्या सारखे वाटले.
In reply to वाह छान ... शेतकऱ्याचे by माहीराज
धन्यवाद सर.
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धरम्हणजे ? नक्की काय म्हणायचंय ? आयत्या बिळात नागोबा म्हण कधी ऐकली नाही का . साप कधीही वारूळ स्वतः तयार करत नाही . जबरदस्तीनेच घुसत असतो
In reply to जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी by तुडतुडी
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर
नक्की जे म्हणायचंय, ते वरील ओळीतच आले आहे. त्यामुळे वेगळे स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही.
शिवाय तुम्हाला जे कळले नाही त्याविषयी विचारले असते तर काही सांगताही आले असते.तुम्ही काही न विचारता स्वतःचे जे मत आहे तेच ठाम व अंतिम समजून ठाम विधान केलेले आहे.
ख्ररं तर कोणत्याही कविवर त्याच्या कवितेचा अर्थ उलगडून दाखवण्याची वेळ येऊच नये. तो इतर कुणीतरी उलगडून दाखवला पाहिजे, असे मला वाटते.
पटली तर पळवा
http://www.misalpav.com/node/33279
वाह छान ... शेतकऱ्याचे