मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुमीपुत्र...

अंकुश चव्हाण · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भुमीपुत्रच भूमीहीन झालाय, दाही दिशांना वणवण फिरतोय. लोकांचे पोट भरणाराच आज उपासमारीने मरतोय. शेतक-याचा पोर उपाशी शेतक-याच्या देशामध्ये. कुपोषणाच्या वेषात बालमृत्यू थैमान घालतोय. बँकांकडून कर्ज घेतले दुष्काळाने लादली नादारी. घाव हा दुहेरी प्रवृत्त आत्महत्येला करतोय. सरकारी अनुदाने होत आहेत मंत्र्यांच्या तिजोरीत बंद. कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या घरादारावर नांगर फिरतोय. श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी नवस सायास केले जातात. गरीब शेतक-याला आपण पद्धतशीर विसरतोय.

वाचने 1381 वाचनखूण प्रतिक्रिया 0