मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वरुण राजाला साकडं

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या) श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. साकडं घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर साकडं घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.

वाचने 1416 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 14:01
सगळी कडे उत्तम पाऊस होत आहे महाराष्टात. अगदी मराठवाड्यात सुद्धा गेल्या आठवड्यात चांगला पाउस झाला. उगाच कशाला वरुणराजाला साकडे घालताय. तसे ही मान्सुन कधी दगा देत नाही. ८०% च्या खाली तर कधीच जात नाही. सगळीकडे उस लावुन पाणी उधळायचे. सरकारनी रोटेशन मधे तालुक्यांवर उस लागवड बंदी च केली पाहीजे. सर्व पाण्याचा प्रॉब्लेम बंद होईल.