Skip to main content

दुष्काळाच्या मरणकळा

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 12/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आस लागली पाण्याची ती कणकण उरात भरली काही पेरलेले जाळून गेले मयत झाली जमीन सारी होरपळलेल्या मयतावरती लाल उन्हाचा कपडा भारी उघडे चोच एखादा दाणा कोरडा घास त्याच्या दारी किती हरपले किती करपले कोण कोणास ना तारी थरथरना-या काळजावरती जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी उन्मळलेले मूळ उठले हंबरडा फोडी नभाच्या कानी नभानेही मग सूर लावला मरणकळाच्या सोडून तानी
लेखनविषय:

वाचने 1128
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

लिहित राहा. (बाकी, अमित सांगलीशी किंचित सहमत) -दिलीप बिरुटे

छान रचना. फक्त 'मयत झाली जमीन सारी' हि वाक्यरचना बरोबर आहे कां?