घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत
रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस
एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही
सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे
चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2193
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोनच्या लढाईतल म्हणायच तुमी?
प्रोत्साहनात्मक काव्य छान आहे
कविता जमली नाही.
अपर्णा,आदेश, वल्लीजी धन्यवाद,